शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

श्रीलंकेला २०१ धावांत गुंडाळले, भारत ३ बाद २१ धावा

By admin | Updated: August 30, 2015 17:59 IST

तिस-या व निर्णायक कसोटीत ईशांत शर्माचा भेदक मा-याने श्रीलंकेचा डाव अवघ्या २०१ धावांवर आटोपला आहे. तर दुस-या डावात भारताची स्थिती ३ बाद २१ धावा अशी झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि. ३० - तिस-या व निर्णायक कसोटीत ईशांत शर्माच्या भेदक मा-यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव २०१ डावांवर आटोपला असून भारताला १११ धावांची आघाडी घेतली आहे. मात्र दुस-या डावात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत भारताची अवस्था ३ बाद २१ धावा अशी झाली आहे. 

तिस-या दिवशी ८ बाद २९२ धावांवरुन पुढे खेळताना श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताच्या तळाच्या फलंदाजांना झटपट बाद केले. ईशांत शर्मा ६ तर उमेश यादव ४ धावांवर बाद झाल्याने भारताचा डाव ३१२ धावांवर आटोपला. सलामीवीर चेतेश्वर पुजारा १४५ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेतर्फे धम्मिका प्रशादने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर रंगना हेराथने तीन विकेट घेतल्या.

फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक मा-यापुढे शरणागती पत्कारली  सलामीवीर उपूल थरंगा ४, कौशल सिल्वा ३ धावांवर बाद झाले. तर दिनेश चंडिमल २३ आणि अँजेलो मॅथ्यूज १ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ करुणारत्ने व लाहिरु थिरीमानेही स्वस्तात बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ६ बाद ४७ धावा अशी झाली होती. मात्र त्यानंतर कुशल परेराने ५५ धावांची खेळी करत लंकेचा डाव सावरला. धम्मिका प्रसाद जायबंदी झाल्याने तो माघारी परतला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रंगना हेराथने ४९ धावांची खेळी करत परेराला मोलाची साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर प्रसाद पुन्हा मैदानात आला. तो २७ धावांवर बाद झाला. भारतातर्फे ईशांत शर्माने पाच विकेट घेतल्या. ईशांतने कसोटीत पाच विकेट घेण्याची ही सातवी वेळ आहे. स्टुअर्ट बिन्नी व अमित मिश्राने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. उमेश यादवने एक विकेट घेतली. 

दुस-या डावात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. त्यापाठोपाठ लोकेश राहुल २ तर अजिंक्य रहाणे ४ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद २१ अशी झाली.पावसामुळे तिस-या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. त्यामुळे आघाडी घेऊनही भारताचे सलामीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने सामन्याला कलाटणी मिळाली आहे.