शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

खेळपट्टीनेच घेतली ‘फिरकी’

By admin | Updated: February 11, 2016 03:26 IST

पहिल्या टी-टष्ट्वेन्टी सामन्यात तयार करण्यात आलेली खेळपट्टी फिरकी गोलंदाजांऐवजी जलदगती गोलंदाजांना अनुकूल होती. आॅस्ट्रेलियात पाहायला मिळणारी खेळपट्टी पाहून अवाक् झालो

पुणे : पहिल्या टी-टष्ट्वेन्टी सामन्यात तयार करण्यात आलेली खेळपट्टी फिरकी गोलंदाजांऐवजी जलदगती गोलंदाजांना अनुकूल होती. आॅस्ट्रेलियात पाहायला मिळणारी खेळपट्टी पाहून अवाक् झालो. खेळपट्टी फिरकीला साथ देईल, अशी आम्ही अटकळ बांधल्याचे फिरकी गोलंदाज सचित्रा सेनानायके याने सांगितले. मंगळवारी गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारताला नमवून १-०ने आघाडी घेतली आहे. याविषयी सेनानायके म्हणाला, ‘‘पुण्याची खेळपट्टी आॅस्ट्रेलियातील खेळपट्टीसारखी उसळी घेणारी होती. अशा खेळपट्टीची आम्ही कल्पनादेखील केली नव्हती. आमच्या युवा खेळाडूंनी आॅस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाला गारद करणाऱ्या संघावर विजय मिळविला आहे. आमच्या संघात जवळपास एकही वरिष्ठ खेळाडू नसतानाही विजय मिळविल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे.’’बऱ्याच कालावधीपासून आम्ही अशा पद्धतीच्या खेळपट्टीवर खेळलो नव्हतो. यानिमित्ताने आगामी विश्वचषक स्पर्धेपूर्वी संघाची फलंदाजी पारखण्याची संधी मिळाली. अनेकदा पहिल्या काही क्रमांकांवरील फलंदाजांनी खेळल्यास इतरांना संधी मिळत नाही. आता आम्हाला टी-टष्ट्वेन्टी प्रकारात स्वत:ला सामावून घ्यावे लागेल, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी म्हणाला. (वृत्तसंस्था)टी-टष्ट्वेन्टी प्रकारात १०१ धावांत संपूर्ण संघ बाद होण्याची शक्यता कमी असते. या प्रकारात २ चेंडूंत १० धावा वसूल करणाऱ्यास चांगली खेळी म्हणतात. भारताने या सामन्यात केवळ ७२ धावांत ८ गडी गमावले. हा क्रीडाप्रकार वेगळा असून, त्याला एकदिवसीय सामन्याप्रमाणे घेऊन चालणार नाही. त्या प्रकारात तुम्हाला स्वत:ला सामावून घ्यावे लागेल. - महेंद्रसिंह धोनी, भारतीय संघाचा कर्णधार भारतीय संघावरील विजयाचे श्रेय गोलंदाजांना जाते. आमच्या युवा संघाने चांगली कामगिरी केली. त्यांनी वरिष्ठ खेळाडूंची कमतरता जाणवू दिली नाही. मालिकेची विजयी सुरुवात करणे संघाचा उत्साह वाढविणारे आहे. - दिनेश चंडीमल, कर्णधार श्रीलंका