शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

सूर गवसल्याने समाधान : युवराज

By admin | Updated: March 3, 2016 04:12 IST

श्रीलंकेविरुद्ध ५ गडी राखून मिळवलेल्या विजयात ३५ धावांची आक्रमक खेळी करणारा भारताचा डावखुरा शैलीदार फलंदाज युवराजसिंग याने सूर गवसला असल्याचे म्हटले आहे.

मिरपूर : श्रीलंकेविरुद्ध ५ गडी राखून मिळवलेल्या विजयात ३५ धावांची आक्रमक खेळी करणारा भारताचा डावखुरा शैलीदार फलंदाज युवराजसिंग याने सूर गवसला असल्याचे म्हटले आहे. या वर्षी जानेवारीत टी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या युवराजने विराट कोहली (नाबाद ५६ धावा) याच्या साथीने महत्त्वपूर्ण ५१ धावांची भागीदारी केली. युवराज म्हणाला, ‘‘पुन्हा सूर गवसला असल्याचे वाटत आहे. मला आता सकारात्मक असल्याची जाणीव होते. मी माझा खेळ पुन्हा करीत आहे. मला खेळपट्टीवर वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता होती. मी जास्तीत जास्त फलंदाजी करण्याचा प्रयत्न करीत होतो. हळूहळू लय मिळवत असल्याचे मला जाणवते.’’युवराजने १८ चेंडूंत ३५ धावा केल्या. त्यांत ३ षटकार आणि ३ चौकार मारले. युवराजने म्हटले, ‘‘कोणत्या गोलंदाजांवर हल्ला करायचा अथवा नाही, याची मी योजना आखत होतो. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांवर हल्ला करायचा, हे मी ठरवले. कारण, डावखुरा कोणताही फलंदाज अशा गोलंदाजांवर षटकार ठोकू शकतो. त्यामुळे मीही असेच केले.’’(वृत्तसंस्था)> संघासाठी योगदान दिल्याचा आनंद : विराटभारतीय क्रिकेटचा ‘हिरो’ आणि आशिया कपमध्ये सलग दुसऱ्यांदा सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीने आपला फॉर्म आणि संघाच्या विजयातील महत्त्वाची भूमिका पार पाडल्याने खूष असल्याचे सांगितले.विराट म्हणाला, ‘‘१६ धावांत २ विकेट पडल्याने पुन्हा एकदा प्रतिकूल स्थिती होती. चेंडूला चांगल्या रीतीने स्ट्राइक करीत असल्याची आपल्याला जाणीव होती. त्यामुळे मी चेंडूला फटकावून अन्य फलंदाजांवरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. या सामन्यात नुवान कुलशेखरा आणि अँजेलो मॅथ्यूज खूप चांगली गोलंदाजी करीत होते. त्यामुळे क्रीझबाहेर येऊन खेळण्याची आमची योजना होती.’’> पराभवाने आत्मविश्वास कमी होतोय.. : मॅथ्यूजमीरपूर : श्रीलंकेचा कार्यवाहक कर्णधार अँजोलो मॅथ्यूज याने टी-२0 वर्ल्डकपआधी सलग पराभवाने संघाचा आत्मविश्वास कमी होत असल्याचे म्हटले आहे.भारताकडून पाच गड्यांनी झालेल्या पराभवानंतर मॅथ्यूज म्हणाला, ‘‘पराभवाने विशेष नुकसान होत आहे. विशेषत: आमच्या संघाच्या आत्मविश्वास आणि मनोधैर्यावर. सलग पराभव पचवणे कठीण आहे. आम्ही अजूनही आपली सर्वोत्तम कामगिरी केली नाही. फलंदाजांची फळीही अपयशी ठरली आहे. टी-२0 वर्ल्डकप उंबरठ्यावर आहे, त्यामुळे आम्हाला लवकरच चुकीतून धडा घ्यावा लागेल.’’ टी-२0 तील भारताच्या यशाचे गुपित हे योग्य खेळाडूंची निवड असल्याचेही मॅथ्यूजने सांगितले.(वृत्तसंस्था)