शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

...म्हणून महात्मा गांधींनी ३० वर्ष क्रिकेटला केला विरोध

By admin | Updated: July 5, 2016 13:46 IST

महत्मा गांधींनी जवळपास तीस वर्ष भारतातील एका क्रिकेट स्पर्धेचा जोरदार विरोध केला होता.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी शालेय जीवनात स्वत: क्रिकेटपटू होते तसेच क्रिकेटचे चाहतेही होते. तरीही महात्मा गांधींनी जवळपास तीस वर्ष भारतातील एका क्रिकेट स्पर्धेचा जोरदार विरोध केला होता. त्याकाळी भारतात पेंटेंगुलर क्रिकेट स्पर्धा खेळली जायची. या स्पर्धेत एकूण पाच संघ खेळायचे. त्याकाळी क्रिकेट विश्वातील ही लोकप्रिय स्पर्धा होती. 
 
या स्पर्धेत क्रिकेटपेक्षा धर्म अधिक प्रभावी झाल्याने महात्मा गांधींनी या स्पर्धेला विरोध केला होता. या स्पर्धेची सुरुवात १८७७ साली बॉम्बे जिमखान्यावर झाली. इंग्रज आणि झोरास्ट्रियन क्रिकेट क्लब (पारसी संघ)मधील दोन दिवसीय सामन्याने झाली. दोन संघांमध्ये होणारी ही स्पर्धा १९०७ साली हिंदू क्रिकेट संघाच्या प्रवेशानंतर तीन संघांमध्ये बदलली. 
 
१९१२ साली मुस्लिमांनी धर्माच्या आधारावर मोहम्मद जिमखाना बनवून मुस्लिम क्रिकेट संघ बनवला. त्यानंतर पेंटेंगुलर स्पर्धेचे स्वरुप चौरंगी झाले. पण क्रिकेटपेक्षा धर्माचा प्रभाव वाढला. धर्माच्या आधारावर संघ बनवून खेळली जाणारी ही स्पर्धा इतकी लोकप्रिय होती की, पहिल्या विश्वयुध्दाच्या दरम्यानही ही स्पर्धा सुरु होती. 
 
लाहोर, इस्लामाबाद, ढाका श्रीलंका इथून लोकही स्पर्धा बघायला यायचे. त्याच दरम्यान स्वातंत्र्याच्या मागणीनेही जोर धरला होता. त्यावेळी गांधींजी स्वातंत्र्य लढयाचे नेतृत्व करत होते. धर्माच्या आधारावर फूट पाडा आणि राज्य करा ही इंग्रजांची रणनिती होती. म्हणून इंग्रज या स्पर्धेला प्रोत्साहन देत होते. हळूहळू या स्पर्धेत जाती-पातीचा समावेश झाला. 
 
गांधींच्या स्वातंत्र्य लढाईची धार कमी करणे हा त्यामागे उद्देश होता. गांधींना इंग्रजांचा हेतू आधीपासूनच माहित होता. त्यामुळे ही स्पर्धा बंद करण्यासाठी गांधींजी आग्रही होते. अखेर १९४६ साली ही स्पर्धा कायमची बंद केल्याची घोषणा करण्यात आली.