शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून महात्मा गांधींनी ३० वर्ष क्रिकेटला केला विरोध

By admin | Updated: July 5, 2016 13:46 IST

महत्मा गांधींनी जवळपास तीस वर्ष भारतातील एका क्रिकेट स्पर्धेचा जोरदार विरोध केला होता.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी शालेय जीवनात स्वत: क्रिकेटपटू होते तसेच क्रिकेटचे चाहतेही होते. तरीही महात्मा गांधींनी जवळपास तीस वर्ष भारतातील एका क्रिकेट स्पर्धेचा जोरदार विरोध केला होता. त्याकाळी भारतात पेंटेंगुलर क्रिकेट स्पर्धा खेळली जायची. या स्पर्धेत एकूण पाच संघ खेळायचे. त्याकाळी क्रिकेट विश्वातील ही लोकप्रिय स्पर्धा होती. 
 
या स्पर्धेत क्रिकेटपेक्षा धर्म अधिक प्रभावी झाल्याने महात्मा गांधींनी या स्पर्धेला विरोध केला होता. या स्पर्धेची सुरुवात १८७७ साली बॉम्बे जिमखान्यावर झाली. इंग्रज आणि झोरास्ट्रियन क्रिकेट क्लब (पारसी संघ)मधील दोन दिवसीय सामन्याने झाली. दोन संघांमध्ये होणारी ही स्पर्धा १९०७ साली हिंदू क्रिकेट संघाच्या प्रवेशानंतर तीन संघांमध्ये बदलली. 
 
१९१२ साली मुस्लिमांनी धर्माच्या आधारावर मोहम्मद जिमखाना बनवून मुस्लिम क्रिकेट संघ बनवला. त्यानंतर पेंटेंगुलर स्पर्धेचे स्वरुप चौरंगी झाले. पण क्रिकेटपेक्षा धर्माचा प्रभाव वाढला. धर्माच्या आधारावर संघ बनवून खेळली जाणारी ही स्पर्धा इतकी लोकप्रिय होती की, पहिल्या विश्वयुध्दाच्या दरम्यानही ही स्पर्धा सुरु होती. 
 
लाहोर, इस्लामाबाद, ढाका श्रीलंका इथून लोकही स्पर्धा बघायला यायचे. त्याच दरम्यान स्वातंत्र्याच्या मागणीनेही जोर धरला होता. त्यावेळी गांधींजी स्वातंत्र्य लढयाचे नेतृत्व करत होते. धर्माच्या आधारावर फूट पाडा आणि राज्य करा ही इंग्रजांची रणनिती होती. म्हणून इंग्रज या स्पर्धेला प्रोत्साहन देत होते. हळूहळू या स्पर्धेत जाती-पातीचा समावेश झाला. 
 
गांधींच्या स्वातंत्र्य लढाईची धार कमी करणे हा त्यामागे उद्देश होता. गांधींना इंग्रजांचा हेतू आधीपासूनच माहित होता. त्यामुळे ही स्पर्धा बंद करण्यासाठी गांधींजी आग्रही होते. अखेर १९४६ साली ही स्पर्धा कायमची बंद केल्याची घोषणा करण्यात आली.