शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सिंधू, सायनाची विजयी सलामी

By admin | Updated: March 30, 2017 01:16 IST

पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या स्टार भारतीय शटलर्सनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सकारात्कम सुरुवात

नवी दिल्ली : पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या स्टार भारतीय शटलर्सनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सकारात्कम सुरुवात करताना विजयी सलामी नोंदवली. त्याचवेळी, पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्माने सुरुवातीलाच धक्कादायक निकाल नोंदवताना कोरियाच्या कसलेल्या सोन वान हो याला सरळ सेटमध्ये नमवून लक्ष वेधले. सिंधूने सहज विजयी सलामी देताना आपल्या देशाच्या अरुंधती पंटावनेला २१-१७, २१-६ असे पराभूत केले. पहिल्या गेममध्ये चांगला खेळ केलेल्या अरुंधतीचा दुसऱ्या गेममध्ये सिंधूच्या धडाक्यापुढे काहीच निभाव लागला नाही. त्याचवेळी, दुसरीकडे स्टार खेळाडू सायनाने चीनी तैपईच्या चिया सिन ली हिचे आव्हान सहज परतावताना २१-१०, २१-१७ असा सरळ दोन गेममध्ये सामना जिंकला. गुडघा दुखापतीतून सावरल्यानंतर सिंधूने नेट जवळ केलेला आक्रमक खेळ लक्षवेधी ठरला. दरम्यान पुरुष गटामध्ये समीरने सर्वांचे लक्ष्य वेधले. त्याने ४५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात चौथ्या मानांकीत कोरियाच्या सोन वानचे आव्हान २१-१७, २१-१० असे संपुष्टात आणून खळबळ माजवली. समीरचा पुढील सामना हाँगकाँगच्या हु युनविरुद्ध होईल. अन्य सामन्यात भारताच्या साई प्रणीतनेही विजयी सलामी देताना जपानच्या केंटा निशिमोटोचे आव्हान १६-२१, २१-१२, २१-१९ असे परतावले. पुढील सामन्यात त्याच्यापुढे सातव्या मानांकीत चोई टिएन चेन याचे तगडे आव्हान असेल. महिला दुहेरीमध्ये अश्विनी पोनप्पा - एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीने चांगली सुरुवात करताना इंग्लंडच्या गॅब्रिएल एडकोक - जेसिका पुग यांना २१-१६, २१-१६ असे नमवले. (वृत्तसंस्था)