शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

2007 टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील अनेक गोष्टींमध्ये साम्य

By admin | Updated: June 17, 2017 11:02 IST

रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भिडणार आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भिडणार आहेत. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. मात्र 10 वर्षानंतर होत असलेल्या या सामन्याकडे पाहिलं तर अनेक घटनांमध्ये साम्य असल्याचं दिसत आहे. यामध्ये फक्त एकच मोठा फरक आहे तो म्हणजे, तो टी-20 वर्ल्डकप होता आणि ही चॅम्पिअन्स ट्रॉफी आहे. 
 
दक्षिण अफ्रिकेत पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ लीगमधील पहिल्याच सामन्यात एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली होती. विशेष म्हणजे चॅम्पिअन्स ट्रॉफीकडे पाहिलं तर नेमका अशाच प्रकारचा घटनाक्रम असल्याचं दिसत आहे. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत पहिला टी-20 वर्ल्डकप आपल्या नावे केला आणि भारतीयांची मान उंचावली. 
 
यावेळी आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीतही दोन्ही संघांनी आपला पहिला सामना एकमेकांविरोधातच खेळला. विशेष म्हणजे या सामन्यातही भारताचाच विजय झाला. यानंतर दोन्ही संघांनी इतर संघांवर मात करत अंतिम फेरी गाठली. यावेळी अंतिम सामन्यात कोण बाजी मारतं हे रविवारी पाहायला मिळेल. 
 
तसंच यावेळी बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये काही गोष्टींवरुन वाद सुरु आहे, तशीच परिस्थिती 2007 मध्ये होती. यावेळी भारत चॅम्पिअन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत होता. त्यावेळीही बीसीसीआय वर्ल्ड टी-20 स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं होतं. मात्र ऐनवेळी भारताने खेळण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोर्डाच्या महसूलावरुन 9-1 मतं मिळाल्यानंतर स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचं ठरलं होतं. मात्र यावेळी भारताने ऐनवेळी सहभागी होण्याच निर्णय घेतला. 
 
2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेल्या इरफान पठाणने भारतीय संघ 10 वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.