शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

2007 टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील अनेक गोष्टींमध्ये साम्य

By admin | Updated: June 17, 2017 11:02 IST

रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भिडणार आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भिडणार आहेत. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. मात्र 10 वर्षानंतर होत असलेल्या या सामन्याकडे पाहिलं तर अनेक घटनांमध्ये साम्य असल्याचं दिसत आहे. यामध्ये फक्त एकच मोठा फरक आहे तो म्हणजे, तो टी-20 वर्ल्डकप होता आणि ही चॅम्पिअन्स ट्रॉफी आहे. 
 
दक्षिण अफ्रिकेत पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ लीगमधील पहिल्याच सामन्यात एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली होती. विशेष म्हणजे चॅम्पिअन्स ट्रॉफीकडे पाहिलं तर नेमका अशाच प्रकारचा घटनाक्रम असल्याचं दिसत आहे. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत पहिला टी-20 वर्ल्डकप आपल्या नावे केला आणि भारतीयांची मान उंचावली. 
 
यावेळी आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीतही दोन्ही संघांनी आपला पहिला सामना एकमेकांविरोधातच खेळला. विशेष म्हणजे या सामन्यातही भारताचाच विजय झाला. यानंतर दोन्ही संघांनी इतर संघांवर मात करत अंतिम फेरी गाठली. यावेळी अंतिम सामन्यात कोण बाजी मारतं हे रविवारी पाहायला मिळेल. 
 
तसंच यावेळी बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये काही गोष्टींवरुन वाद सुरु आहे, तशीच परिस्थिती 2007 मध्ये होती. यावेळी भारत चॅम्पिअन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत होता. त्यावेळीही बीसीसीआय वर्ल्ड टी-20 स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं होतं. मात्र ऐनवेळी भारताने खेळण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोर्डाच्या महसूलावरुन 9-1 मतं मिळाल्यानंतर स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचं ठरलं होतं. मात्र यावेळी भारताने ऐनवेळी सहभागी होण्याच निर्णय घेतला. 
 
2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेल्या इरफान पठाणने भारतीय संघ 10 वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.