शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

2007 टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील अनेक गोष्टींमध्ये साम्य

By admin | Updated: June 17, 2017 11:02 IST

रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भिडणार आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भिडणार आहेत. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. मात्र 10 वर्षानंतर होत असलेल्या या सामन्याकडे पाहिलं तर अनेक घटनांमध्ये साम्य असल्याचं दिसत आहे. यामध्ये फक्त एकच मोठा फरक आहे तो म्हणजे, तो टी-20 वर्ल्डकप होता आणि ही चॅम्पिअन्स ट्रॉफी आहे. 
 
दक्षिण अफ्रिकेत पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ लीगमधील पहिल्याच सामन्यात एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली होती. विशेष म्हणजे चॅम्पिअन्स ट्रॉफीकडे पाहिलं तर नेमका अशाच प्रकारचा घटनाक्रम असल्याचं दिसत आहे. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत पहिला टी-20 वर्ल्डकप आपल्या नावे केला आणि भारतीयांची मान उंचावली. 
 
यावेळी आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीतही दोन्ही संघांनी आपला पहिला सामना एकमेकांविरोधातच खेळला. विशेष म्हणजे या सामन्यातही भारताचाच विजय झाला. यानंतर दोन्ही संघांनी इतर संघांवर मात करत अंतिम फेरी गाठली. यावेळी अंतिम सामन्यात कोण बाजी मारतं हे रविवारी पाहायला मिळेल. 
 
तसंच यावेळी बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये काही गोष्टींवरुन वाद सुरु आहे, तशीच परिस्थिती 2007 मध्ये होती. यावेळी भारत चॅम्पिअन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत होता. त्यावेळीही बीसीसीआय वर्ल्ड टी-20 स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं होतं. मात्र ऐनवेळी भारताने खेळण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोर्डाच्या महसूलावरुन 9-1 मतं मिळाल्यानंतर स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचं ठरलं होतं. मात्र यावेळी भारताने ऐनवेळी सहभागी होण्याच निर्णय घेतला. 
 
2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेल्या इरफान पठाणने भारतीय संघ 10 वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.