शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

2007 टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील अनेक गोष्टींमध्ये साम्य

By admin | Updated: June 17, 2017 11:02 IST

रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भिडणार आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भिडणार आहेत. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. मात्र 10 वर्षानंतर होत असलेल्या या सामन्याकडे पाहिलं तर अनेक घटनांमध्ये साम्य असल्याचं दिसत आहे. यामध्ये फक्त एकच मोठा फरक आहे तो म्हणजे, तो टी-20 वर्ल्डकप होता आणि ही चॅम्पिअन्स ट्रॉफी आहे. 
 
दक्षिण अफ्रिकेत पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ लीगमधील पहिल्याच सामन्यात एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली होती. विशेष म्हणजे चॅम्पिअन्स ट्रॉफीकडे पाहिलं तर नेमका अशाच प्रकारचा घटनाक्रम असल्याचं दिसत आहे. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत पहिला टी-20 वर्ल्डकप आपल्या नावे केला आणि भारतीयांची मान उंचावली. 
 
यावेळी आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीतही दोन्ही संघांनी आपला पहिला सामना एकमेकांविरोधातच खेळला. विशेष म्हणजे या सामन्यातही भारताचाच विजय झाला. यानंतर दोन्ही संघांनी इतर संघांवर मात करत अंतिम फेरी गाठली. यावेळी अंतिम सामन्यात कोण बाजी मारतं हे रविवारी पाहायला मिळेल. 
 
तसंच यावेळी बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये काही गोष्टींवरुन वाद सुरु आहे, तशीच परिस्थिती 2007 मध्ये होती. यावेळी भारत चॅम्पिअन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत होता. त्यावेळीही बीसीसीआय वर्ल्ड टी-20 स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं होतं. मात्र ऐनवेळी भारताने खेळण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोर्डाच्या महसूलावरुन 9-1 मतं मिळाल्यानंतर स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचं ठरलं होतं. मात्र यावेळी भारताने ऐनवेळी सहभागी होण्याच निर्णय घेतला. 
 
2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेल्या इरफान पठाणने भारतीय संघ 10 वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.