शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई स्पर्धेसाठी नेमबाज सज्ज

By admin | Updated: September 24, 2015 23:45 IST

येथील डॉ. कर्णसिंग शूटिंग रेंजवर २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या आशियाई एअर गन चॅम्पियनशिपसाठी भारतीय नेमबाज सज्ज आहेत.

नवी दिल्ली : येथील डॉ. कर्णसिंग शूटिंग रेंजवर २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या आशियाई एअर गन चॅम्पियनशिपसाठी भारतीय नेमबाज सज्ज आहेत. आॅलिम्पिक कोटा मिळविण्यासाठी धडपडत असलेल्या भारतीयांसाठी ही स्पर्धा मोलाची ठरेल, असे मत स्टार नेमबाज अभिनव बिंद्रा, जितू रॉय अणि भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रानिंदरसिंग यांनी गुरुवारी व्यक्त केले.रानिंदर म्हणाले, ‘‘या स्पर्धेचे आयोजन भारतीय आणि आशियाई नेमबाजीसाठी मोलाचे आहे. २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर भारतात आयोजित होणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.’’भारताने रिओ आॅलिम्पिकसाठी आतापर्यंत ८ कोटे मिळविले आहेत. लंडन आॅलिम्पिकमधील कामगिरीमुळे भारताला आॅलिम्पिकमध्ये ११ पर्यंत कोटा मिळविण्याची संधी असेल. चार दिवसांच्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत १४ देशांमधील १८० नेमबाज सहभागी होतील. यजमान भारताचे ५६ नेमबाज सिनियर, युवा आणि ज्युनियर गटात सहभागी होतील. पाक आणि चीनमध्ये आॅलिम्पिकसाठी चाचणी स्पर्धेचे आयोजन सुरू असल्याने दोन्ही देश या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत, असे रानिंदरसिंग यांनी सांगितले. जितू राय याला या स्पर्धेद्वारे अधिक अनुभव मिळवायचाय, तर चैनसिंग याच्यासाठी आशियाई स्पर्धा तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहील. बिंद्राशिवाय आॅलिम्पिक कोटा मिळविणारे नेमबाज आणि आॅलिम्पिक कांस्यविजेता गगन नारंग, पिस्तुल नेमबाज जितू रॉय, गुरप्रीतसिंग, प्रकाश नांजप्पा, चैनसिंग तसेच अपूर्वी चंदेला हे स्पर्धेत आव्हान सादर करणार आहेत. चंदेला म्हणाली, ‘‘ही स्पर्धा आॅलिम्पिक तयारीचा भाग आहे. मी रायफलसह काही वस्तू बदलून घेतल्या. ही स्पर्धा भारताच्या यजमानपदाखाली होत असल्याने येथे खेळणे अभिमानास्पद आहे.’’ पिस्तुल नेमबाज श्वेता सिंग म्हणाली, ‘‘मला या स्पर्धेत आत्मविश्वास उंचावण्यासाठी पदक जिंकायचे आहे.’’ एका प्रसिद्ध शॉटगन नेमबाजाविरुद्ध अन्य एका महिला नेमबाजाच्या आईने रायफल संघाकडे गंभीर तक्रार केली. याबाबत विचारताच रानिंदर म्हणाले, ‘‘हा दोन्ही खेळाडूंमधील वाद आहे. हा वाद आम्ही अ‍ॅथलिट आयोगाकडे सोपविला असून, सावधपणा बाळगला जात आहे. या प्रकारात कुणालाही पाठीशी घालायचे नाही, असे आमचे धोरण आहे.’’ (वृत्तसंस्था)रिओच्या तयारीसाठी ही चांगली संंधी असेल. भविष्यातील तयारीसाठी हे महत्त्वाचे आहे. यासाठी दररोज सराव करीत असून, रेंजवर घाम गाळत आहे. भारताने सलग तीन आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याने आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंची उणीव नाही, याची खात्री पटली.- अभिनव बिंद्रा