शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

आशियाई स्पर्धेसाठी नेमबाज सज्ज

By admin | Updated: September 24, 2015 23:45 IST

येथील डॉ. कर्णसिंग शूटिंग रेंजवर २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या आशियाई एअर गन चॅम्पियनशिपसाठी भारतीय नेमबाज सज्ज आहेत.

नवी दिल्ली : येथील डॉ. कर्णसिंग शूटिंग रेंजवर २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या आशियाई एअर गन चॅम्पियनशिपसाठी भारतीय नेमबाज सज्ज आहेत. आॅलिम्पिक कोटा मिळविण्यासाठी धडपडत असलेल्या भारतीयांसाठी ही स्पर्धा मोलाची ठरेल, असे मत स्टार नेमबाज अभिनव बिंद्रा, जितू रॉय अणि भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रानिंदरसिंग यांनी गुरुवारी व्यक्त केले.रानिंदर म्हणाले, ‘‘या स्पर्धेचे आयोजन भारतीय आणि आशियाई नेमबाजीसाठी मोलाचे आहे. २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर भारतात आयोजित होणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.’’भारताने रिओ आॅलिम्पिकसाठी आतापर्यंत ८ कोटे मिळविले आहेत. लंडन आॅलिम्पिकमधील कामगिरीमुळे भारताला आॅलिम्पिकमध्ये ११ पर्यंत कोटा मिळविण्याची संधी असेल. चार दिवसांच्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत १४ देशांमधील १८० नेमबाज सहभागी होतील. यजमान भारताचे ५६ नेमबाज सिनियर, युवा आणि ज्युनियर गटात सहभागी होतील. पाक आणि चीनमध्ये आॅलिम्पिकसाठी चाचणी स्पर्धेचे आयोजन सुरू असल्याने दोन्ही देश या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत, असे रानिंदरसिंग यांनी सांगितले. जितू राय याला या स्पर्धेद्वारे अधिक अनुभव मिळवायचाय, तर चैनसिंग याच्यासाठी आशियाई स्पर्धा तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहील. बिंद्राशिवाय आॅलिम्पिक कोटा मिळविणारे नेमबाज आणि आॅलिम्पिक कांस्यविजेता गगन नारंग, पिस्तुल नेमबाज जितू रॉय, गुरप्रीतसिंग, प्रकाश नांजप्पा, चैनसिंग तसेच अपूर्वी चंदेला हे स्पर्धेत आव्हान सादर करणार आहेत. चंदेला म्हणाली, ‘‘ही स्पर्धा आॅलिम्पिक तयारीचा भाग आहे. मी रायफलसह काही वस्तू बदलून घेतल्या. ही स्पर्धा भारताच्या यजमानपदाखाली होत असल्याने येथे खेळणे अभिमानास्पद आहे.’’ पिस्तुल नेमबाज श्वेता सिंग म्हणाली, ‘‘मला या स्पर्धेत आत्मविश्वास उंचावण्यासाठी पदक जिंकायचे आहे.’’ एका प्रसिद्ध शॉटगन नेमबाजाविरुद्ध अन्य एका महिला नेमबाजाच्या आईने रायफल संघाकडे गंभीर तक्रार केली. याबाबत विचारताच रानिंदर म्हणाले, ‘‘हा दोन्ही खेळाडूंमधील वाद आहे. हा वाद आम्ही अ‍ॅथलिट आयोगाकडे सोपविला असून, सावधपणा बाळगला जात आहे. या प्रकारात कुणालाही पाठीशी घालायचे नाही, असे आमचे धोरण आहे.’’ (वृत्तसंस्था)रिओच्या तयारीसाठी ही चांगली संंधी असेल. भविष्यातील तयारीसाठी हे महत्त्वाचे आहे. यासाठी दररोज सराव करीत असून, रेंजवर घाम गाळत आहे. भारताने सलग तीन आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याने आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंची उणीव नाही, याची खात्री पटली.- अभिनव बिंद्रा