ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. १५ - बेंगळुरु येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामधील दुस-या कसोटीतील दुस-या दिवसाचा खेळ पाण्यामुळे रद्द झाला. उद्या हवामान चांगले असल्यास सकाळी सव्वा नऊ वाजता खेळ सुरु करण्यात येणार आहे.
बेंगळुरु येथील दुस-या कसोटीत भारताच्या फिरकी मा-यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली व आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या २१४ धावांमध्ये संपुष्टात आला होता. भारतानेही पहिल्या दिवस अखेर बिनबाद ८० धावा करत दमदार सुरुवात केली होती. बेंगळुरुत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने दुस-या दिवशीचा खेळ सुरु होण्यास विलंबाने सुरु होईल असे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र लंचनंतरही पाऊस न थांबल्याने पंचांनी दुस-या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.