शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

एकेरीत विजयी सुरुवात करावी लागेल : सायना

By admin | Updated: May 15, 2014 04:17 IST

भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालने उबेर चषक स्पर्धेत आपल्यालाच विजयी सुरुवात करावी लागेल,असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालने उबेर चषक स्पर्धेत आपल्यालाच विजयी सुरुवात करावी लागेल, असे म्हटले आहे. येथील सिरीफ फोर्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये १८ ते २५ मे दरम्यान उबेर कपची अंतिम फेरी होणार आहे. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सायना म्हणाली, ‘दुसर्‍या एकेरीत खेळणार्‍या सिंधूवरील दबाव कमी करण्यासाठी या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात विजय मिळविणे माझ्यासाठी अत्यंत जरुरी आहे. सांघिक सामन्यात विजय मिळविणे नेहमीच गरजेचे असते’. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेली सायना म्हणाली, ‘पहिल्या एकेरीतील सामना महत्त्वाचा असतो. माझे काम चांगली कामगिरी करणे हेच आहे. मी माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न करणार आहे. आमच्या संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे नॉकआउट फेरीत पोहोचण्याची मला पूर्ण खात्री आहे’. पत्रकार परिषदेत उबेर चषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी सायना नेहवाल, तर थॉमस कप स्पर्धेसाठी कर्णधारपदी परुपल्ली कश्यप यांच्या नावाची घोषणा भारतीय बॅडमिंटन संघटना (बाई) चे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांनी केली. थॉमस आणि उबेर कप स्पर्धेत जगातील पहिले १६ संघ सहभागी होणार आहेत. सायना म्हणाली, ‘उबेर कपमध्ये भारताला तुलनेत सोपे आव्हान असणार आहे. मात्र, आम्हाला चांगली तयारी करावी लागणार आहे. चांगल्या सुरुवातीचा फायदा दुसर्‍या खेळाडूंनी उठवला, तर संघ नक्कीच जिंकेल. (वृत्तसंस्था)