शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महामुकाबल्यासाठी भारत-पाक संघाला सचिननं दिला सल्ला

By admin | Updated: June 18, 2017 17:14 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज होत असलेल्या ओव्हल मैदानावरील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम आज जगभरातून प्रेक्षक श्वास रोखून पाहतील

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 18 - भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज होत असलेल्या ओव्हल मैदानावरील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जगभरातून प्रेक्षक श्वास रोखून पाहतील. विशेष म्हणजे क्रिकेट चाहत्यांसह या सामन्यामुळे क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरच्या हृदयाचीही धडधड वाढली आहे. या सामन्यात भारत पाकिस्तानवर भारी पडेल, अशी शक्यता सचिन तेंडुलकरनं वर्तवली आहे. पाकिस्तानच्या विरोधात अनेक सामन्यांत भारताला विजय मिळवून दिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही या सामन्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, जगभरात ज्या पद्धतीनं लोकांना या सामन्याची उत्कंठा लागली आहे, त्याप्रमाणेच मीसुद्धा या सामन्याची वाट पाहतो आहे. पाकिस्तानविरोधातल्या महामुकाबल्यात भारताचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. माझी इच्छा आहे की, भारतानं चांगलं खेळावं. जेणेकरून सामन्यानंतर आपण सर्व मिळून जल्लोष करू. क्रिकेटच्या देवानं या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत विराट कोहलीनं कर्णधार म्हणून निभावलेल्या भूमिकेसह इतरही खेळाडूंच्या प्रदर्शनाची प्रशंसा केली आहे. (भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरीजबद्दल काय म्हणाले अमित शहा)(पाकिस्तान : बेभरवशाचा आणि धोकादायक! )सचिन म्हणाला, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत विराट कोहलीचं नेतृत्व जबरदस्त राहिलं आहे. विराटसह रोहित शर्मा आणि शिखर धवननंही चांगली फलंदाजी केली आहे. युवराज सिंगनेही शानदार खेळाचा नजराणा पेश केला होता. वेगवान गोलंदाजांनीही भेदक चेंडू टाकले होते. तर फिरकी गोलंदाजांनीही चांगलं प्रदर्शन केलं आहे. आता बस्स, आजही यांनी असंच प्रदर्शन करावं. आपण एक अभेद्य टीम आहोत. मास्टर ब्लास्टरच्या मते, भारतीय संघ या सामन्यात पूर्ण तयारीनिशी उतरला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत भारतानं चांगला खेळ केला आहे. पाकिस्तान संघाची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली नसल्यानं भारत नक्कीच वरचढ ठरेल, असंही भाकित सचिन तेंडुलकरनं केलं आहे.