शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

महामुकाबल्यासाठी भारत-पाक संघाला सचिननं दिला सल्ला

By admin | Updated: June 18, 2017 17:14 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज होत असलेल्या ओव्हल मैदानावरील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम आज जगभरातून प्रेक्षक श्वास रोखून पाहतील

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 18 - भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज होत असलेल्या ओव्हल मैदानावरील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जगभरातून प्रेक्षक श्वास रोखून पाहतील. विशेष म्हणजे क्रिकेट चाहत्यांसह या सामन्यामुळे क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरच्या हृदयाचीही धडधड वाढली आहे. या सामन्यात भारत पाकिस्तानवर भारी पडेल, अशी शक्यता सचिन तेंडुलकरनं वर्तवली आहे. पाकिस्तानच्या विरोधात अनेक सामन्यांत भारताला विजय मिळवून दिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही या सामन्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, जगभरात ज्या पद्धतीनं लोकांना या सामन्याची उत्कंठा लागली आहे, त्याप्रमाणेच मीसुद्धा या सामन्याची वाट पाहतो आहे. पाकिस्तानविरोधातल्या महामुकाबल्यात भारताचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. माझी इच्छा आहे की, भारतानं चांगलं खेळावं. जेणेकरून सामन्यानंतर आपण सर्व मिळून जल्लोष करू. क्रिकेटच्या देवानं या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत विराट कोहलीनं कर्णधार म्हणून निभावलेल्या भूमिकेसह इतरही खेळाडूंच्या प्रदर्शनाची प्रशंसा केली आहे. (भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरीजबद्दल काय म्हणाले अमित शहा)(पाकिस्तान : बेभरवशाचा आणि धोकादायक! )सचिन म्हणाला, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत विराट कोहलीचं नेतृत्व जबरदस्त राहिलं आहे. विराटसह रोहित शर्मा आणि शिखर धवननंही चांगली फलंदाजी केली आहे. युवराज सिंगनेही शानदार खेळाचा नजराणा पेश केला होता. वेगवान गोलंदाजांनीही भेदक चेंडू टाकले होते. तर फिरकी गोलंदाजांनीही चांगलं प्रदर्शन केलं आहे. आता बस्स, आजही यांनी असंच प्रदर्शन करावं. आपण एक अभेद्य टीम आहोत. मास्टर ब्लास्टरच्या मते, भारतीय संघ या सामन्यात पूर्ण तयारीनिशी उतरला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत भारतानं चांगला खेळ केला आहे. पाकिस्तान संघाची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली नसल्यानं भारत नक्कीच वरचढ ठरेल, असंही भाकित सचिन तेंडुलकरनं केलं आहे.