शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

तब्बल 115 वर्षांनंतर झाली या विक्रमाची पुनरावृत्ती

By admin | Updated: March 7, 2017 20:48 IST

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.  या कसोटीत गोलंदाजांचा दबदबा दिसून आला. त्यामुळे यातील अनेक विक्रम गोलंदाजांच्या नावावर नोंदले गेले आहेत.  त्यातच या कसोटीत तब्बल 115 वर्षांनंतर एका विक्रमाची पुनरावृत्ती झाली आहे. एकाच कसोटीत चारही डावात गोलंजाजांनी सहा किंवा त्यापेक्षा अधिक बळी टिपण्याच्या विक्रम आज नोंदवला गेला. 1902 नंतर असा अनोखा विक्रम पहिल्यांदाच नोंदवला गेला आहे. 
या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनने 8 बळी टिपले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीस आल्यावर भारताच्या रवींद्र जडेजाने 6 बळी टिपत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने 6 विकेट घेतल्या. तर अखेरच्या डावात भारताच्या रवीचंद्रन अश्विनने सहा बळी टिपले. त्याबरोबरच 115 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. 
याआधी कसोटी क्रिकेटमध्ये चारही डावात एका गोलंदाजाने सहाहून अधिक बळी टिपण्याच्या विक्रमाची नोंद दोन वेळा झाली आहे. 1896 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हलवर झालेल्या कसोटीत पहिल्यांदा असा विक्रम नोंदवला गेला. त्यानंतर 1902 साली मेलबर्नमध्ये झालेल्या या विक्रमाची पुनरावृत्ती झाली होती.  आता 115 वर्षांनंतर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर या विक्रमाची पुनरावृत्ती झाली.
दरम्यान, पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवाची भारताने आज सव्याज परतफेड केली.  रविचंद्रन अश्विनने टिपलेले सहा बळी आणि त्याला उमेश यादव आणि रवींद्र जडेजाकडून मिळालेल्या सुरेख साथीच्या जोरावर भारताने बंगळुरू कसोटी ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. त्याबरोबरच चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली.