शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 115 वर्षांनंतर झाली या विक्रमाची पुनरावृत्ती

By admin | Updated: March 7, 2017 20:48 IST

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.  या कसोटीत गोलंदाजांचा दबदबा दिसून आला. त्यामुळे यातील अनेक विक्रम गोलंदाजांच्या नावावर नोंदले गेले आहेत.  त्यातच या कसोटीत तब्बल 115 वर्षांनंतर एका विक्रमाची पुनरावृत्ती झाली आहे. एकाच कसोटीत चारही डावात गोलंजाजांनी सहा किंवा त्यापेक्षा अधिक बळी टिपण्याच्या विक्रम आज नोंदवला गेला. 1902 नंतर असा अनोखा विक्रम पहिल्यांदाच नोंदवला गेला आहे. 
या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनने 8 बळी टिपले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीस आल्यावर भारताच्या रवींद्र जडेजाने 6 बळी टिपत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने 6 विकेट घेतल्या. तर अखेरच्या डावात भारताच्या रवीचंद्रन अश्विनने सहा बळी टिपले. त्याबरोबरच 115 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. 
याआधी कसोटी क्रिकेटमध्ये चारही डावात एका गोलंदाजाने सहाहून अधिक बळी टिपण्याच्या विक्रमाची नोंद दोन वेळा झाली आहे. 1896 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हलवर झालेल्या कसोटीत पहिल्यांदा असा विक्रम नोंदवला गेला. त्यानंतर 1902 साली मेलबर्नमध्ये झालेल्या या विक्रमाची पुनरावृत्ती झाली होती.  आता 115 वर्षांनंतर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर या विक्रमाची पुनरावृत्ती झाली.
दरम्यान, पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवाची भारताने आज सव्याज परतफेड केली.  रविचंद्रन अश्विनने टिपलेले सहा बळी आणि त्याला उमेश यादव आणि रवींद्र जडेजाकडून मिळालेल्या सुरेख साथीच्या जोरावर भारताने बंगळुरू कसोटी ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. त्याबरोबरच चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली.