शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

तब्बल 115 वर्षांनंतर झाली या विक्रमाची पुनरावृत्ती

By admin | Updated: March 7, 2017 20:48 IST

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.  या कसोटीत गोलंदाजांचा दबदबा दिसून आला. त्यामुळे यातील अनेक विक्रम गोलंदाजांच्या नावावर नोंदले गेले आहेत.  त्यातच या कसोटीत तब्बल 115 वर्षांनंतर एका विक्रमाची पुनरावृत्ती झाली आहे. एकाच कसोटीत चारही डावात गोलंजाजांनी सहा किंवा त्यापेक्षा अधिक बळी टिपण्याच्या विक्रम आज नोंदवला गेला. 1902 नंतर असा अनोखा विक्रम पहिल्यांदाच नोंदवला गेला आहे. 
या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनने 8 बळी टिपले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीस आल्यावर भारताच्या रवींद्र जडेजाने 6 बळी टिपत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने 6 विकेट घेतल्या. तर अखेरच्या डावात भारताच्या रवीचंद्रन अश्विनने सहा बळी टिपले. त्याबरोबरच 115 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. 
याआधी कसोटी क्रिकेटमध्ये चारही डावात एका गोलंदाजाने सहाहून अधिक बळी टिपण्याच्या विक्रमाची नोंद दोन वेळा झाली आहे. 1896 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हलवर झालेल्या कसोटीत पहिल्यांदा असा विक्रम नोंदवला गेला. त्यानंतर 1902 साली मेलबर्नमध्ये झालेल्या या विक्रमाची पुनरावृत्ती झाली होती.  आता 115 वर्षांनंतर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर या विक्रमाची पुनरावृत्ती झाली.
दरम्यान, पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवाची भारताने आज सव्याज परतफेड केली.  रविचंद्रन अश्विनने टिपलेले सहा बळी आणि त्याला उमेश यादव आणि रवींद्र जडेजाकडून मिळालेल्या सुरेख साथीच्या जोरावर भारताने बंगळुरू कसोटी ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. त्याबरोबरच चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली.