शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

राहुल, जडेजा, यादव चमकले

By admin | Updated: March 31, 2017 00:51 IST

आॅस्ट्रेलियाविरुध्दची ही कसोटी मालिका भारतासाठी अनेक अंगांनी महत्त्वपुर्ण ठरली. भारतीय संघ काही प्रमाणात

- हर्षा भोगले  -आॅस्ट्रेलियाविरुध्दची ही कसोटी मालिका भारतासाठी अनेक अंगांनी महत्त्वपुर्ण ठरली. भारतीय संघ काही प्रमाणात कोहली आणि अश्विन यांच्यावर विसंबुन राहत होता. मात्र आता या मालिकेत के.एल. राहूल, रविंद्र जाडेजा आणि उमेश यादव यांची कामगिरी सुखावणारी ठरली. एखाद्या समुद्र किनाऱ्यावर शांतपणे लाटा येतात. त्याच प्रमाणे वेळ गेल्यावर या मालिकेत निर्माण झालेले वाद मिटतील. क्रिकेट हा खेळ शानदार आहे. काही काळ निर्माण झालेले तणाव, हे खेळात होत असतात अणि हे बराच काळ लक्षातही राहतील. ही मालिका सुरू होण्याआधी, बरेच जण विचार करत होते की, भारतीय संघ आॅस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवेल. हा संघ कमकुवत आहे. इंग्लंडला भारताने ४ -० असे पराभूत केले होते आणि त्यांचा भारतीय उपखंडात खेळण्याचा अनुभवही चांगला होता. पण आपण पाहिले की जसे अनुमान काढले  गेले होते, त्यापेक्षा आॅस्ट्रेलियाचा  संघ चांगला खेळला. आॅस्ट्रेलियाने चांगल्या दर्जाचा खेळ केला.  एकाच बाजुने बोलणे हे फॅशनेबल ठरेल. पण कालच सौरभ  गांगुलीने म्हटल्याप्रमाणे मान्य केले पाहिजे की, आॅस्ट्रेलियाने चांगला खेळ केला.  भारतीय संघही विकसीत  झाला आणि संघातील राहूल,  उमेश यादव, रविंद्र जाडेजा हे  खेळाडू देखील चांगले विकसीत  झाले आहेत. भारत कोहली  आणि अश्विन यांच्यावर विसंबून  राहू लागला होता. हे भारतीय क्रिकेटसाठी फारसे चांगले लक्षण नव्हते. कोहली हा कर्णधार म्हणून सर्वत्र होता. मात्र फलंदाज म्हणून त्याने फारसे योगदान दिले नाही. या मालिकेने दाखवून दिले की कोहली खेळला नाही, तरी भारतीय फलंदाजीत दम आहे. गोलंदाजीतही आश्विन याने  २१ गडी बाद केले असले तरी या मालिकेत यादव अणि जडेजा यांची कामगिरी सरस ठरली आणि मोक्याच्या क्षणी भारतीय संघासाठी कुलदीप यादवही चमकला. कर्णधाराकडे  चेंडु वळणारे आणि गडी बाद करणारे एकापेक्षा जास्त गोलंदाज असतील, तर त्या संघाचे भविष्य चांगले असते हेच भारतीय संघासोबत झाले आहे.  आता आयपीएलची वेळ  आली असून या स्पर्धेत खेळणे हे सोपे नसेल. या बहुआयामी स्पर्धेत खेळण्याची या खेळाडूंची ही अनोखी कसोटी असेल.