शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

पाकसोबत क्रिकेट खेळण्याचा प्रश्नच उदभवत नाही : ठाकूर

By admin | Updated: September 24, 2016 05:22 IST

पाकिस्तानसोबत भविष्यात द्विपक्षीय क्रिकेट संबंध सुरळीत होण्याची शक्यता फेटाळून लावताना बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत विचार करणेही योग्य नसल्याचे म्हटले आहे.

कोझिकोड : पाकिस्तानसोबत भविष्यात द्विपक्षीय क्रिकेट संबंध सुरळीत होण्याची शक्यता फेटाळून लावताना बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत विचार करणेही योग्य नसल्याचे म्हटले आहे. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीसाठी येथे आलेले ठाकूर म्हणाले,‘भारत कुठल्याही क्षणी पाकिस्तानला नेस्तनाबूत करू शकतो, पण त्यांना जागतिक पातळीवर एकाकी पाडणे महत्त्वाचे आहे.’ ठाकूर यांना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या योजनेबाबत विचारले असता त्यांनी उरी दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना म्हटले की,‘जे काही घडले ते बघता याबाबत विचारही करणे योग्य नाही. पाकिस्तानसोबत यंदाच्या मोसमात मालिकेचा कुठलाही कार्यक्रम नाही.’उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांमधील तणाव वाढला आहे. शेजारी देशाला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी होत आहे. भारताने पाकिस्तानला १९६५, १९७१ आणि कारगिल युद्धांमध्ये पराभूत केले होते. भारताने विश्व क्रिकेट स्पर्धेतील सर्वंच लढतींमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे, असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले. जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडणे महत्त्वाचे ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था)