शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पुणे कसोटी: गोलंदाजांचा टिच्चून मारा, कांगारूंच्या शेपटाची वळवळ

By admin | Updated: February 23, 2017 16:54 IST

भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-याच्या जोरावर कांगारूंच्या संघाला 250 धावांचा टप्पा ओलांडतानाही नाकीनऊ

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23- भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-याच्या जोरावर कांगारूंच्या संघाला  250 धावांचा टप्पा ओलांडतानाही नाकीनऊ आले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 9 गडी बाद 256 धावा केल्या आहेत. शेवटच्या गड्यासाठी मिचेल स्टार्क आणि जॉश हेझलवूड यांनी 51 धावांची भागीदारी रचत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यास मदत केली. 
 
ऑस्ट्रेलियाकडून सलामिवीर एम. रेनशॉ आणि तळाचा खेळाडू मिचेल स्टार्क व्यतिरिक्त एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मिचेल मार्श अर्धशतक फटकावून 57 धावांवर खेळत आहे. तर  रेनशॉने 68 धावांची खेळी केली. अश्विनने त्याला मुरली विजयकडे झेल देण्यास भाग पाडले. भारताकडून उमेश यादवने भेदक मारा करत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 2 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.  जयंत यादवनेही एक विकेट मिळवली.   
 
त्यापुर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने घेतला होता. सलामीविर डेव्हिड वॉर्नर आणि  एम. रेनशॉ यांनी संघाला सावध सुरूवात करून दिली. मात्र, लंचपूर्वी 28 व्या षटकात उमेश यादवने डेव्हिड वॉर्नरला (38) त्रिफळाचीत करत भारताला मोठं यश मिळवून दिलं.  पुढच्याच चेंडूवर दुसरा सलामिवीर  रेनशॉ(36) हा रिटायर्ड हर्ट झाला.  त्यानंतर मात्र कांगारूंचे ठरावीक अंतराने गडी बाद होत गेले. चार विकेट पडल्यावर रेनशॉ पुन्हा खेळायला आला मात्र चांगली भागीदारी रचण्यात कांगारूंना अपयश आलं.  
 
गेल्या तब्बल 19 सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केलेल्या भारतीय संघाचं या सामन्यात पारडं जड मानलं जात आहे.  ही लढत जिंकून विजयी मालिका कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे भारताच्या भूमीवर तब्बल एक तपानंतर विजयी पताका फडकवण्यासाठी कांगारू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. 
 
कर्णधार विराट कोहलीचा संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली या संघाने अलीकडे बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज या संघांना पाणी पाजले आहे. 2015  पासून भारताने सलग 6 मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. ही मालिका जिंकून सातवी मालिकाही खिशात घालण्यासाठी भारत  प्रयत्नशील असणार आहे.