शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

पुणे कसोटी: गोलंदाजांचा टिच्चून मारा, कांगारूंच्या शेपटाची वळवळ

By admin | Updated: February 23, 2017 16:54 IST

भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-याच्या जोरावर कांगारूंच्या संघाला 250 धावांचा टप्पा ओलांडतानाही नाकीनऊ

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23- भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-याच्या जोरावर कांगारूंच्या संघाला  250 धावांचा टप्पा ओलांडतानाही नाकीनऊ आले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 9 गडी बाद 256 धावा केल्या आहेत. शेवटच्या गड्यासाठी मिचेल स्टार्क आणि जॉश हेझलवूड यांनी 51 धावांची भागीदारी रचत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यास मदत केली. 
 
ऑस्ट्रेलियाकडून सलामिवीर एम. रेनशॉ आणि तळाचा खेळाडू मिचेल स्टार्क व्यतिरिक्त एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मिचेल मार्श अर्धशतक फटकावून 57 धावांवर खेळत आहे. तर  रेनशॉने 68 धावांची खेळी केली. अश्विनने त्याला मुरली विजयकडे झेल देण्यास भाग पाडले. भारताकडून उमेश यादवने भेदक मारा करत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 2 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.  जयंत यादवनेही एक विकेट मिळवली.   
 
त्यापुर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने घेतला होता. सलामीविर डेव्हिड वॉर्नर आणि  एम. रेनशॉ यांनी संघाला सावध सुरूवात करून दिली. मात्र, लंचपूर्वी 28 व्या षटकात उमेश यादवने डेव्हिड वॉर्नरला (38) त्रिफळाचीत करत भारताला मोठं यश मिळवून दिलं.  पुढच्याच चेंडूवर दुसरा सलामिवीर  रेनशॉ(36) हा रिटायर्ड हर्ट झाला.  त्यानंतर मात्र कांगारूंचे ठरावीक अंतराने गडी बाद होत गेले. चार विकेट पडल्यावर रेनशॉ पुन्हा खेळायला आला मात्र चांगली भागीदारी रचण्यात कांगारूंना अपयश आलं.  
 
गेल्या तब्बल 19 सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केलेल्या भारतीय संघाचं या सामन्यात पारडं जड मानलं जात आहे.  ही लढत जिंकून विजयी मालिका कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे भारताच्या भूमीवर तब्बल एक तपानंतर विजयी पताका फडकवण्यासाठी कांगारू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. 
 
कर्णधार विराट कोहलीचा संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली या संघाने अलीकडे बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज या संघांना पाणी पाजले आहे. 2015  पासून भारताने सलग 6 मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. ही मालिका जिंकून सातवी मालिकाही खिशात घालण्यासाठी भारत  प्रयत्नशील असणार आहे.