शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुजारा, आश्विन यांचा चमकदार खेळ

By admin | Updated: October 12, 2016 07:12 IST

तिसऱ्या आणी अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताने न्यूझीलंडविरुद्ध एक दिवस राखून मोठ्या अंतराने बाजी मारली. कदाचित खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळाली

तिसऱ्या आणी अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताने न्यूझीलंडविरुद्ध एक दिवस राखून मोठ्या अंतराने बाजी मारली. कदाचित खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळाली. मात्र, तरीही रविचंद्रन आश्विनने केलेल्या उच्चस्तरीय फिरकी गोलंदाजीचे श्रेय कमी होत नाही. त्याने, रवींद्र जडेजासह न्यूझीलंड संघाला तंबूत धाडले. याच खेळपट्टीवर सकाळच्या सत्रामध्ये चेतेश्वर पुजारा आणि गौतम गंभीर यांनी ज्या प्रकारे मोकळेपणे फलंदाजी केली त्याने खूप प्रसन्न वाटले. आधी त्यांनी स्थिरावण्यास चांगला वेळ घेतला आणि खेळपट्टीचा योग्य अंदाज आल्यानंतर काही अप्रतिम फटके मारताना भारताला मजबूत स्थितीत आणले. कोहलीने पुजाराचे शतक होण्याची प्रतीक्षा केली. त्याने खूप वेळाने शतक झळकावले. किवींना दुसऱ्यांदा बाद करण्यासाठी आपल्याकडे बराच वेळ असल्याची जाणीव कोहलीला होती. शिवाय, खेळ इतका लवकर संपेल, याची खुद्द कोहलीलाही कल्पना नव्हती; परंतु आश्विनने फलंदाजांवर अधिक दबाव टाकून त्यांना फिरकीच्या जाळ्यात अडकवून पुन्हा एकदा सर्वाधिक बळी घेताना सामन्यात १३ बळी मिळविले. या वेळी त्याने आणखी एकदा मालिकावीर पुरस्कार मिळवताना सामनावीरचा किताबही पटकावला.पुजाराने मालिकेमध्ये चांगली फलंदाजी केली; पण या चांगल्या सुरुवातीचे प्रथम श्रेणीप्रमाणे शतकामध्ये रूपांतर करण्यात त्याला यश आले नाही. या वेळी त्याने कोणताही धोका न पत्करताना काही अप्रतिम फटके मारून शतक झळकावले. यामुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतसाठी त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत मिळेल. गंभीरदेखील चांगला खेळला. त्यामुळे यापुढे सलामीवीरच्या निवडीसाठी निवडकर्त्यांची चांगली परीक्षा लागेल. कारण इंग्लंड मालिकेपर्यंत धवन आणि राहुल दोघेही दुखापतीतून सावरले असतील. जर किवी फलंदाजांनी पुजाराच्या फलंदाजीचा अभ्यास केला असता, तर त्यांनी भारताला टक्कर दिली असती. टॉम लॅथमने मालिकेच चमकदार फलंदाजी केली. परंतु, पुजाराप्रमाणेच तोही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला पहिल्या डावात अर्धशतक झळकावण्याची संधी होती; पण उमेश यादवचा वेगवान मारा ‘अ‍ॅक्रॉस द लाईन’ खेळल्याचा फटका त्याला बसला आणि तो सहजपणे पायचीत झाला. विल्यम्सनदेखील काहीसा चाचपडताना दिसला. शिवाय, फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तो आश्विनचा चार वेळा शिकार ठरला. आॅफ स्टम्पच्या अधिक बाहेर जाऊन खेळल्याने त्याने स्वत:लाच अडचणीत टाकले. त्यामुळे वळत असलेले चेंडू अधिक आतमध्ये आल्याने त्याने विकेट बहाल केली. गुप्टिलला काहीशी लय मिळाली होती; पण संघाचा पराभव टाळण्यात ते पुरेसे नाही ठरले. तर, इतर फलंदाज जणू काही मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत असल्याचे भासले. आश्विनने केवळ संयमी फिरकी मारा करून त्यांना माघारी धाडले. मैदानात न्यूझीलंडने चांगली चिकाटी दाखविली; पण हीच चिकाटी त्यांनी फलंदाजीत दाखवली असती, तर त्यांचा धावफलक अधिक चांगला दिसला असता. (पीएमजी)