शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कमजोर बचावामुळे ‘पलटन’ तळाला

By admin | Updated: August 16, 2014 00:04 IST

प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सत्रात पुणेरी पलटन संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.

अमोल मचाले, पुणेप्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सत्रात पुणेरी पलटन संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, सुमार कामगिरीमुळे हा संघ सध्या तळाला फेकला गेला आहे. बचावाच्या क्षेत्रात कमजोर ठरल्यामुळे पुणेरी पलटन संघ अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याची कबुली संघाचा कर्णधार वजीरसिंग आणि प्रशिक्षक रामफल वजीर यांनी दिली.जयपूर पिंक पँथर्स संघाविरुद्धच्या लढतीपूर्वी ‘लोकमत’सोबत संवाद साधताना वजीर म्हणाला, ‘‘पुण्यातील पाठीराख्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आम्ही अपयशी ठरलोय, याची जाणीव आहे. बचावात कमजोर पडल्यामुळे काही सामन्यांत महत्त्वाच्या क्षणी आम्हाला नुकसान पत्करावे लागले. या खेळात आक्रमणासोबतच बचावदेखील महत्त्वाचा ठरतो. अव्वल स्थानावरील यू मुंबासह इतर संघांकडे चांगले बचावपटू आहेत. इतर संघ आणि आमच्या संघातील कामगिरीमध्ये याचमुळे फरक पडलाय.’’ वजीरसिंग हा ‘वन मॅन आर्मी’प्रमाणे एकटाच झुंजतोय. मात्र त्याला इतर खेळाडूंकडून पहिजे तशी साथ लाभू शकलेली नाही. हे मान्य करतानाच आपल्या सहकाऱ्यांना सांभाळून घेत तो म्हणाला, ‘‘इतर खेळाडू आपल्या परीने प्रयत्न करताहेत. मात्र, ते पुरेसे नाहीत. आव्हान कायम राखण्यासाठी आता आम्हाला यापुढील प्रत्येक लढत जिंकणे अनिवार्य झाले आहे. संघातील सर्व खेळाडूंना याची जाणीव आहे. प्रत्येक लढत महत्त्वाची असल्याने आम्ही उर्वरित लढतींत सर्वस्व पणाला लावून खेळ करू.’’