शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

पराभवाचा बदला घेण्याची पाकिस्तानला हीच सुवर्णसंधी - इमरान खान

By admin | Updated: June 17, 2017 22:20 IST

पाकिस्तानला भारताकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे असे मत पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू इमरान खान यांनी व्यक्त केले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 17 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या निमित्ताने पाकिस्तानला भारताकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे असे मत पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू इमरान खान यांनी व्यक्त केले आहे. पहिल्या सामन्यात भारताने ज्या प्रकारे पराभव केला ते पाहता अंतिम मुकाबला म्हणजे पाकिस्तानला सन्मान परत मिळवण्याची चांगली संधी आहे असे इमरान म्हणाले. 
 
समा या पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. पहिल्या सामन्यात भारताने आपला अत्यंत वाईट पद्धतीने पराभव केला आता आपल्याला वचपा काढण्याची संधी मिळाली आहे असे इमरान म्हणाले. इमरान खान यांना पाकिस्तानचे सर्वोत्तम कर्णधार समजले जाते. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1992 साली वर्ल्डकप जिंकला होता. 
 
भारताबरोबरच्या सामन्यात ज्या चुका केल्या त्या चूकांमधून पाकिस्तानने धडा घेतला पाहिजे असे ते म्हणाले. नाणेफेक जिंकली तर, भारताला पहिली फलंदाजीची संधी देऊ नका असा सल्ला त्यांनी सर्फराज अहदमला दिला. भारताकडे फलंदाजांची चांगली फळी असून त्यांनी धावांचा डोंगर उभारला तर आपल्यावर दबाव येईल. अन्य संघांविरुद्ध पहिली गोलंदाजी करण्याच्या रणनितीला यश मिळाले. पण भारता विरुद्ध नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घ्या असा सल्ला त्यांनी दिला. 
 
भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळू असे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने म्हटले आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना सर्फराजने आक्रमक क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. युवा खेळाडूंची चांगली कामगिरी हे संघासाठी चांगेल चिन्ह असल्याचे त्याने सांगितले. 
 
फहीम अश्रफ, रुमान रईस आणि फाखार झामान या तिघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पाकिस्तानी संघ मॅच फिक्सिंग करुन अंतिम फेरीत पोहोचलाय या आमिर सोहेलच्या आरोपाबद्दल विचारले असता सर्फराजने आम्ही आता या गोष्टीचा विचार करत नाहीय असे उत्तर दिले.