शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

पाकिस्तान : बेभरवशाचा आणि धोकादायक!

By admin | Updated: June 17, 2017 20:46 IST

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार हे निश्चित झाल्यापासून दोन्ही देशांच्या क्रिकेट जगतातील वातावरण चांगलेच तापलेय.

 बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार हे निश्चित झाल्यापासून दोन्ही देशांच्या क्रिकेट जगतातील वातावरण चांगलेच तापलेय. वास्तव जगाची आभासी प्रतिकृती बनलेल्या सोशल मीडियावर त्याचे प्रतिबिंब ठळकपणे दिसून येतेय. भारतात तर पाकिस्तानला चिरडण्याची आणखी एक संधी मिळाल्याचे मानून ऐन पावसाळ्यात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू झालीय. 
 
भारतीय क्रिकेटप्रेमींचा विराटसेनेवर असलेला विश्वास त्यातून जाणवतोय. पण मैदान युद्धाचे असो वा खेळाचे आपल्या प्रतिस्पर्ध्याला गृहीत धरून चालत नाही. त्यात समोर पाकिस्तानसारखा प्रतिस्पर्धी असला म्हणजे थोडी जास्तच खबरदारी घ्यावी लागते.
 
आता तुम्ही म्हणाल भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जागतिक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची कामगिरी धवन, रोहित आणि कोहली प्रतिस्पर्धी गोलंदाजीसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. एक सामना वगळता संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी चांगली झालीय. मग भारतीय संघ आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद यात अडचण ती कोणती? खरंच अडचण काहीच नाही. पण पाकिस्तानचा बेभरवाशीपणा हेच विराटसेनेसमोरचे खरे आव्हान असेल. 
 
एखाद्या दिवशी हा संघ अगदी सुमार संघासमोर गारद होऊ शकतो. तर दिवशी पाकिस्तानी संघ जगातील सर्वोत्तम संघाला पराभूत करू शकतो. यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्यांनी असा चमत्कार करून दाखवलाय. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इंग्लंडला ते पराभूत असे सामना सुरू होण्यापूर्वी खुद्द पाकिस्तानच्या कर्णधारालाही वाटलं नसेल, पण त्यांंनी ते करून दाखवले. सध्याचा त्यांचा संघ इम्रान खान, वासिम अक्रम यांच्या काळातील तुल्यबळ संघांसारखा नाही. पण त्या संघासारखी थोडीफार लढाऊवृत्ती त्यांच्याकडे जरूर आहे.
 
शोएब मलिक मोहम्मद हाफीजसारखे अनुभवी खेळाडू आणि सर्फराझ अहमद, बाबर आझम, फकर झमान, अझर अली, मोहम्मद आमीर असे गुणवान युवा खेळाडू आहेत त्यांच्याकडे. ते पूर्वीप्रमाणे विध्वंसक नसले तरी धोकादायक जरूर आहेत. थोडीशी संधी मिळाली तरी ते आपली डोकेदुखी वाढवू शकतात. त्यामुळे विराट कोहली आणि कंपनीला या सामन्यात अजिबात बेफिकिरी दाखवून चालणार नाही.