शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान : बेभरवशाचा आणि धोकादायक!

By admin | Updated: June 17, 2017 20:46 IST

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार हे निश्चित झाल्यापासून दोन्ही देशांच्या क्रिकेट जगतातील वातावरण चांगलेच तापलेय.

 बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार हे निश्चित झाल्यापासून दोन्ही देशांच्या क्रिकेट जगतातील वातावरण चांगलेच तापलेय. वास्तव जगाची आभासी प्रतिकृती बनलेल्या सोशल मीडियावर त्याचे प्रतिबिंब ठळकपणे दिसून येतेय. भारतात तर पाकिस्तानला चिरडण्याची आणखी एक संधी मिळाल्याचे मानून ऐन पावसाळ्यात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू झालीय. 
 
भारतीय क्रिकेटप्रेमींचा विराटसेनेवर असलेला विश्वास त्यातून जाणवतोय. पण मैदान युद्धाचे असो वा खेळाचे आपल्या प्रतिस्पर्ध्याला गृहीत धरून चालत नाही. त्यात समोर पाकिस्तानसारखा प्रतिस्पर्धी असला म्हणजे थोडी जास्तच खबरदारी घ्यावी लागते.
 
आता तुम्ही म्हणाल भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जागतिक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची कामगिरी धवन, रोहित आणि कोहली प्रतिस्पर्धी गोलंदाजीसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. एक सामना वगळता संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी चांगली झालीय. मग भारतीय संघ आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद यात अडचण ती कोणती? खरंच अडचण काहीच नाही. पण पाकिस्तानचा बेभरवाशीपणा हेच विराटसेनेसमोरचे खरे आव्हान असेल. 
 
एखाद्या दिवशी हा संघ अगदी सुमार संघासमोर गारद होऊ शकतो. तर दिवशी पाकिस्तानी संघ जगातील सर्वोत्तम संघाला पराभूत करू शकतो. यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्यांनी असा चमत्कार करून दाखवलाय. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इंग्लंडला ते पराभूत असे सामना सुरू होण्यापूर्वी खुद्द पाकिस्तानच्या कर्णधारालाही वाटलं नसेल, पण त्यांंनी ते करून दाखवले. सध्याचा त्यांचा संघ इम्रान खान, वासिम अक्रम यांच्या काळातील तुल्यबळ संघांसारखा नाही. पण त्या संघासारखी थोडीफार लढाऊवृत्ती त्यांच्याकडे जरूर आहे.
 
शोएब मलिक मोहम्मद हाफीजसारखे अनुभवी खेळाडू आणि सर्फराझ अहमद, बाबर आझम, फकर झमान, अझर अली, मोहम्मद आमीर असे गुणवान युवा खेळाडू आहेत त्यांच्याकडे. ते पूर्वीप्रमाणे विध्वंसक नसले तरी धोकादायक जरूर आहेत. थोडीशी संधी मिळाली तरी ते आपली डोकेदुखी वाढवू शकतात. त्यामुळे विराट कोहली आणि कंपनीला या सामन्यात अजिबात बेफिकिरी दाखवून चालणार नाही.