शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

रहाणेमुळे अतिरिक्त गोलंदाज खेळविण्याची संधी : विराट

By admin | Updated: June 27, 2017 00:53 IST

अजिंक्य रहाणेच्या उपस्थितीमुळे संघ समतोल बनतो. तसेच, त्याच्यामुळे अतिरिक्त गोलंदाज खेळविण्याची संधीही मिळते

पोर्ट आॅफ स्पेन : अजिंक्य रहाणेच्या उपस्थितीमुळे संघ समतोल बनतो. तसेच, त्याच्यामुळे अतिरिक्त गोलंदाज खेळविण्याची संधीही मिळते, अशा शब्दांत कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सामनावीर रहाणेचे कौतुक केले. विंडीजवर १०५ धावांनी विजय मिळविल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कोहलीने सांगितले की, ‘गेल्या काही काळापासून रहाणे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटचा भाग आहे आणि सर्वांना माहीत आहे की, आघाडीच्या क्रमांकासाठी त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. तो कायम तिसऱ्या सलामीवीराच्या रूपामध्ये सज्ज असतो. या मालिकेतील आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात त्याने आपल्या खेळीला चांगला वेग दिला. तो कसोटी क्रिकेटमध्ये स्थिर झालेला असून, मर्यादित क्रिकेटमध्ये छाप पाडण्यास तो उत्सुक आहे.’‘त्याने स्वत:वरील दबाव कमी करण्यास सुरुवात केली असून तो आपल्या खेळीचा आनंद घेत आहे. रहाणे मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो. विश्वचषक २०१९ सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याची संधी देईल. विशेष म्हणजे रहाणे डावाची सुरुवातही करू शकतो आणि मधल्या फळीतही खेळू शकतो.’

कुलदीप यादवने जबरदस्त मारा केला. त्याचे क्रॉस सीम चेंडू दोन्ही बाजूला फिरकी घेऊ शकतात. आयपीएलमध्ये मी त्याचा सामना केला आहे. या सामन्यातील सुक्या खेळपट्टीवर त्याने अप्रतिम मारा केला. या कौशल्यामुळेच तो धोकादायक गोलंदाज बनतो. यासाठी त्याला श्रेय दिले गेले पाहिजे. - विराट कोहली