शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंड-मुंबई सराव सामना आजपासून

By admin | Updated: September 15, 2016 23:34 IST

न्यूझीलंडसाठी भारत दौरा आव्हानात्मक ठरणार आहे. कारण वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या फिरोजशाह कोटलाच्या खेळपट्टीवर आज, शुक्रवारपासून मुंबईविरुद्ध खेळल्या

नवी दिल्ली : न्यूझीलंडसाठी भारत दौरा आव्हानात्मक ठरणार आहे. कारण वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या फिरोजशाह कोटलाच्या खेळपट्टीवर आज, शुक्रवारपासून मुंबईविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव सराव सामन्यात त्यांच्या फलंदाजांना फिरकीविरुद्ध खेळण्याची अधिक संधी मिळणार नाही. खेळपट्टीचे स्वरूप बघितल्यानंतर तीन दिवसीय सराव सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना सिनिअर खेळाडू रॉस टेलर म्हणाला,‘कोटलाच्या खेळपट्टीवर चेंडू अधिक वळणार नसल्याचे संकेत मिळत आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत मात्र अशी परिस्थिती राहणार नाही, हे नक्की.’कोटलाच्या खेळपट्टीवर थोडी हिरवळ आहे. टेलरने कोटलाच्या खेळपट्टीचा उल्लेख करताना म्हटले की,‘कसोटी क्रिकेट कसे खेळल्या जाते त्याचा हा एक भाग आहे. तुम्ही न्यूझीलंडमध्ये आले असते तर यापेक्षा वेगळे नसते. आमच्या येथील खेळपट्टीवर थोडी हिरवळ असते. मायदेशात खेळण्याचा लाभ मिळत असतो. आम्हाला खेळपट्टी फिरकीला अनुकूल असण्याची आशा आहे. कसोटी मालिकेत कोटलाच्या खेळपट्टीप्रमाणे खेळपट्ट्या मिळणार नाहीत, हे नक्की.’ भारतात २०१२ मध्ये एकमेव कसोटी शतक झळकावणारा टेलर पुढे म्हणाला,‘विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान आम्ही दिल्लीत खेळलेल्या सामन्यातील खेळपट्टीवर अन्य स्थळांच्या तुलनेत अधिक हिरवळ होती. सराव सामना सराव सामना असतो. या लढतीच्या निमित्ताने भारतीय वातावरणासोबत जुळवून घेण्याची संधी मिळते. न्यूझीलंडच्या तुलनेत येथे अधिक उष्णता आहे. त्यामुळे सराव करणे चांगले आहे. मुंबईविरुद्धचा सराव सामना खडतर होण्याची आशा आहे.’रणजी चॅम्पियन मुंबई संघाला कसोटी संघाविरुद्ध खेळून मोसमाची चांगली सुरुवात करण्याची संधी आहे. अखिल हेरवादकर, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व धवल कुलकर्णी आॅस्ट्रेलियात भारत ‘अ’ संघासोबत आहेत. मुंबई संघाला त्यांची उणिव भासणार आहे, पण त्यामुळे त्यांना राखीव खेळाडूंची क्षमता तपासण्याची संधी मिळणार आहे. रोहित शर्मा दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम लढतीत सहभागी झाला होता. तो या लढतीत खेळणार आहे. कर्णधार आदित्य तारेने न्यूझीलंड संघापुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे. मुंबई संघाने यापूर्वीही दौऱ्यावर येणाऱ्या संघाला अडचणीत आणले आहे.मालिकेचा निकाल फिरकीपटूंवर अवलंबून : गंभीरनवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या आगामी तीन कसोटी सामन्यांचा निकाल फिरकीपटूंच्या कामगिरीवर अवलंबून राहील, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले. मालिकेतील पहिली लढत २२ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळल्या जाणार आहे. यजमान संघाने पाहुण्या न्यूझीलंड संघाला कमी लेखण्याची चूक करू नये. उभय संघांत दर्जेदार फिरीकपटूंचा समावेश असून मालिकेचा निकाल फिरकीपटू निश्चित करतील, असेही गंभीर म्हणाला.न्यूझीलंड संघ तुल्यबळ आहे. त्यांच्या संघात तीन फिरकीपटूंचा (मिशेल सँटनर, ईश सोढी आणि मार्क क्रेग) समावेश आहे. ज्या संघाचे फिरकीपटू चांगली कामगिरी करतील तो संघ मालिकेत बाजी मारेल.असेही गंभीरने यावेळी सांगितले.