शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

नवे वर्ष-नवे पर्व...!

By admin | Updated: December 31, 2014 23:50 IST

महेंद्रसिंग धोनीने कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच टीम इंडियात अनुभवी असा कुठलाही खेळाडू राहिलेला नाही.

टीम इंडिया : धोनीनंतर ईशांत शर्मा हाच एकमेव दीर्घानुभवीनवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच टीम इंडियात अनुभवी असा कुठलाही खेळाडू राहिलेला नाही. ३२ सामन्यांचा अनुभव असलेला विराट कोहली हा नेतृत्व करणार असेल तरी ६१ सामने खेळलेला ईशांत शर्मा हा एकमेव खेळाडू त्याच्याहून मुरब्बी ठरतो.धोनी ९० सामने खेळलेला एकमेव दिग्गज होता. सचिन, द्रविड, लक्ष्मण, गांगुली, सेहवाग, गंभीर, जहीर, युवराज आणि हरभजन हे कसोटी क्रिकेटपासून दूर गेले आहेत. आता धोनीही गेला तेव्हा ईशांत शर्मा हाच एकमेव दीर्घानुभवी उरला. त्याला विराटच्या नेतृत्वात खेळायचे असल्याने टीम इंडियाचे नव्या वर्षात नवे पर्व सुरू होईल. ६ जानेवारीपासून सिडनीत सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत कोहलीकडे नेतृत्वाची धुरा राहणार आहे.अन्य खेळाडूंवर नजर टाकल्यास त्यात मुरली विजय ३०, चेतेश्वर पूजारा २७, रविचंद्रन अश्विन २३ आणि सलामीचा शिखर धवन हा १३ कसोटी सामने खेळला आहे. अजिंक्य रहाणे १३, मोहम्मद शमी ११ आणि उमेश यादवदेखील ११ सामने खेळला. रोहित शर्मा याने नऊ, वरुण अ‍ॅरोनने पाच आणि यष्टिरक्षक रिद्धिमान साहा तीन सामने खेळला. या मालिकेत पदार्पण करणारे कर्ण शर्मा आणि राहुल लोकेश यांच्याकडे केवळ एका सामन्याचा अनुभव आहे.जखमी होताच मालिकेबाहेर झालेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ११ आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा याने १२ तर डावखुरा गोलंदाज सुरेश रैना याला १७ सामने खेळल्याचा अनुभव आहे. अर्थात सिडनी येथे जो संघ उतरेल तो आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवहीन असेल. पण याच संघाला भारताचे कसोटी क्रिकेट पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. (वृत्तसंस्था)कॅप्टन ‘कूल’ची निवृत्तीही ‘कूल’!नवी दिल्ली : या शहरात फिरोजशाह कोटला मैदानावर २००८ साली अनिल कुंबळेने निवृत्ती जाहीर केली तेव्हा त्याला आपल्या खांद्यावर बसवून सहकाऱ्यांसह एका खेळाडूने अर्ध्या मैदानाला वेढा घातला होता. तो होता महेंद्रसिंग धोनी. नंतर त्याने नेतृत्वाची धुरा सांभाळली आणि ६० सामन्यात कर्णधारपद भूषविल्यानंतर तडकाफडकी कसोटी क्रिकेटला अलविदाही केले.हा निर्णय घेतेवेळी त्याने कसोटीचे शतक गाठण्याचा आणि यष्टीमागे ३०० बळी पूर्ण करण्याचा मोह बाळगला नाही. हा निर्णय थंड डोक्याने केला असेच म्हणावे लागेल. यामागे बीसीसीआयचा दबाव असावा. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचा अडथळा वाटत असावा किंवा विदेशात सलग पराभवामुळे तो खचला असावा, असा कयास लावला जात आहे. तथापि धोनीने साहसी निर्णय घेतला तसेच हा निर्णय बीसीसीआय सचिव संजय पटेल यांना विनम्रपणे कळविला होता.४तो दोन-तीन वर्षे आणखी खेळू शकला असता. कर्णधारपद सोडले असते आणि यष्टिरक्षक म्हणून संघात कायम राहिला असता तरी चालले असते. पण धोनी हा शब्दावर कायम राहणारा आहे. त्यासाठी टीका झाली तरी डगमगत नाही. त्यामुळेच निवृत्ती जाहीर करतेवेळी टीकाकार काय म्हणतील याचीही त्याने पर्वा केली नाही. ‘मी टेस्ट क्रिकेटला अलविदा करीत आहे आणि माझा हा निर्णय अंतिम असल्याचे त्याने पत्रपरिषदेतही ठासून सांगितले होते.’असाही योगायोग!महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीत ४८ या आकड्याला मोठे महत्त्व राहिले आहे. धोनीचे नाव इंग्रजी वर्णमालेनुसार डी पासून सुरू होते आणि चौथ्या क्रमांकावर एच येतो. डीएच म्हणजे ४८...धोनीच्या पहिल्या कसोटी शतकात १४८ धावा होत्या. पहिल्या वन डे शतकातही १४८ धावाच होत्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च खेळी ४८ आहे...धोनीच्या सर्वोच्च कसोटी धावा २२४ आहेत. या आकड्यातील पहिल्या दोन ने नंतरच्या २४ ला गुणल्यास बेरीज होते ४८...धोनीने अखेरच्या कसोटी डावात २४ धावा केल्या. ही संख्या ४८ ची आधारसंख्या आहे. २४ धावांवर क्रिकेटला अलविदा करणारा धोनी शुद्ध २४ कॅरेट सोन्यासारखा चकाकणारा खेळाडू ठरला.