शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

नवे वर्ष-नवे पर्व...!

By admin | Updated: December 31, 2014 23:50 IST

महेंद्रसिंग धोनीने कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच टीम इंडियात अनुभवी असा कुठलाही खेळाडू राहिलेला नाही.

टीम इंडिया : धोनीनंतर ईशांत शर्मा हाच एकमेव दीर्घानुभवीनवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच टीम इंडियात अनुभवी असा कुठलाही खेळाडू राहिलेला नाही. ३२ सामन्यांचा अनुभव असलेला विराट कोहली हा नेतृत्व करणार असेल तरी ६१ सामने खेळलेला ईशांत शर्मा हा एकमेव खेळाडू त्याच्याहून मुरब्बी ठरतो.धोनी ९० सामने खेळलेला एकमेव दिग्गज होता. सचिन, द्रविड, लक्ष्मण, गांगुली, सेहवाग, गंभीर, जहीर, युवराज आणि हरभजन हे कसोटी क्रिकेटपासून दूर गेले आहेत. आता धोनीही गेला तेव्हा ईशांत शर्मा हाच एकमेव दीर्घानुभवी उरला. त्याला विराटच्या नेतृत्वात खेळायचे असल्याने टीम इंडियाचे नव्या वर्षात नवे पर्व सुरू होईल. ६ जानेवारीपासून सिडनीत सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत कोहलीकडे नेतृत्वाची धुरा राहणार आहे.अन्य खेळाडूंवर नजर टाकल्यास त्यात मुरली विजय ३०, चेतेश्वर पूजारा २७, रविचंद्रन अश्विन २३ आणि सलामीचा शिखर धवन हा १३ कसोटी सामने खेळला आहे. अजिंक्य रहाणे १३, मोहम्मद शमी ११ आणि उमेश यादवदेखील ११ सामने खेळला. रोहित शर्मा याने नऊ, वरुण अ‍ॅरोनने पाच आणि यष्टिरक्षक रिद्धिमान साहा तीन सामने खेळला. या मालिकेत पदार्पण करणारे कर्ण शर्मा आणि राहुल लोकेश यांच्याकडे केवळ एका सामन्याचा अनुभव आहे.जखमी होताच मालिकेबाहेर झालेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ११ आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा याने १२ तर डावखुरा गोलंदाज सुरेश रैना याला १७ सामने खेळल्याचा अनुभव आहे. अर्थात सिडनी येथे जो संघ उतरेल तो आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवहीन असेल. पण याच संघाला भारताचे कसोटी क्रिकेट पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. (वृत्तसंस्था)कॅप्टन ‘कूल’ची निवृत्तीही ‘कूल’!नवी दिल्ली : या शहरात फिरोजशाह कोटला मैदानावर २००८ साली अनिल कुंबळेने निवृत्ती जाहीर केली तेव्हा त्याला आपल्या खांद्यावर बसवून सहकाऱ्यांसह एका खेळाडूने अर्ध्या मैदानाला वेढा घातला होता. तो होता महेंद्रसिंग धोनी. नंतर त्याने नेतृत्वाची धुरा सांभाळली आणि ६० सामन्यात कर्णधारपद भूषविल्यानंतर तडकाफडकी कसोटी क्रिकेटला अलविदाही केले.हा निर्णय घेतेवेळी त्याने कसोटीचे शतक गाठण्याचा आणि यष्टीमागे ३०० बळी पूर्ण करण्याचा मोह बाळगला नाही. हा निर्णय थंड डोक्याने केला असेच म्हणावे लागेल. यामागे बीसीसीआयचा दबाव असावा. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचा अडथळा वाटत असावा किंवा विदेशात सलग पराभवामुळे तो खचला असावा, असा कयास लावला जात आहे. तथापि धोनीने साहसी निर्णय घेतला तसेच हा निर्णय बीसीसीआय सचिव संजय पटेल यांना विनम्रपणे कळविला होता.४तो दोन-तीन वर्षे आणखी खेळू शकला असता. कर्णधारपद सोडले असते आणि यष्टिरक्षक म्हणून संघात कायम राहिला असता तरी चालले असते. पण धोनी हा शब्दावर कायम राहणारा आहे. त्यासाठी टीका झाली तरी डगमगत नाही. त्यामुळेच निवृत्ती जाहीर करतेवेळी टीकाकार काय म्हणतील याचीही त्याने पर्वा केली नाही. ‘मी टेस्ट क्रिकेटला अलविदा करीत आहे आणि माझा हा निर्णय अंतिम असल्याचे त्याने पत्रपरिषदेतही ठासून सांगितले होते.’असाही योगायोग!महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीत ४८ या आकड्याला मोठे महत्त्व राहिले आहे. धोनीचे नाव इंग्रजी वर्णमालेनुसार डी पासून सुरू होते आणि चौथ्या क्रमांकावर एच येतो. डीएच म्हणजे ४८...धोनीच्या पहिल्या कसोटी शतकात १४८ धावा होत्या. पहिल्या वन डे शतकातही १४८ धावाच होत्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च खेळी ४८ आहे...धोनीच्या सर्वोच्च कसोटी धावा २२४ आहेत. या आकड्यातील पहिल्या दोन ने नंतरच्या २४ ला गुणल्यास बेरीज होते ४८...धोनीने अखेरच्या कसोटी डावात २४ धावा केल्या. ही संख्या ४८ ची आधारसंख्या आहे. २४ धावांवर क्रिकेटला अलविदा करणारा धोनी शुद्ध २४ कॅरेट सोन्यासारखा चकाकणारा खेळाडू ठरला.