शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या नव्या धोरणाचा नेमबाजांना फटका

By admin | Updated: August 7, 2015 22:32 IST

गेल्या काही आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकांची हमखास कमाई करून देणाऱ्या शूटिंग या खेळाकडे क्रीडा मंत्रालयाने विशेष लक्ष्य केंद्रित केले आहे. नव-नवे धोरण राबवून नेमबाजांना योग्य त्या संधी

नाशिक : गेल्या काही आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकांची हमखास कमाई करून देणाऱ्या शूटिंग या खेळाकडे क्रीडा मंत्रालयाने विशेष लक्ष्य केंद्रित केले आहे. नव-नवे धोरण राबवून नेमबाजांना योग्य त्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. मात्र भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ऐन आॅलिम्पिकच्या तोंडावरच नवे धोरण अंमलात आणल्याने त्याचा फटका एका गुणवंत नेमबाजाला बसला आहे. आॅलिम्पिकची पूर्वतयारी समजल्या जाणाऱ्या शूटिंग वर्ल्डकपमध्ये निवड झाल्यानंतरही या नेमबाजाला केवळ क्रीडा प्राधिकरणाच्या नव्या धोरणामुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. ५ ते १५ आॅगस्टदरम्यान अजरबैजान या देशात चौथी शूटिंग वर्ल्डकप स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारतातून गुरप्रित सिंग, विजयकुमार व अक्षय अष्टपुत्रे या तीन नेमबाजांची निवड करण्यात आली होती. पुढील वर्षी होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्यादृष्टीने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जात असल्याने या तिन्ही नेमबाजांना आॅलम्पिक कोटा जिंकण्याची सुवर्णसंधीच चालून आली होती. मात्र भारतीय क्रीडा प्राधिकरण व राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने ऐन आॅलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावरच नवे धोरण अंमलात आणल्याने त्याचा परिणाम वर्ल्डकपसाठी निवड झालेल्या या नेमबाजांवर झाला आहे. नव्या धोरणानुसार देशांतर्गत खेळलेल्या नेमबाजी स्पर्धांमध्ये ‘मिनिमम ट्रायव्हलिंग स्कोर’ (एमटीएस) मिळविलेल्या नेमबाजांनाच शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याचे जाहीर केल्याने, ‘स्व-खर्चाने स्पर्धेत सहभागी व्हा अन्यथा माघार घ्या’ हा एकमेव पर्याय या नेमबाजांसमोर होता. दरम्यान, या नव्या धोरणामध्ये गुरप्रित सिंग यांचाच समावेश करण्यात आल्याने अन्य दोन नेमबाज स्पर्धेला मुकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र विजयकुमार यांना आर्मी कोट्यातून आर्थिक सहाय्य मिळाल्याने त्यांना या स्पर्धेत भाग घेता आला, तर अक्षय अष्टपुत्रे या गुणवंत नेमबाजाला केवळ आर्थिक सहाय्य न मिळाल्याने स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारच्या या भूमिकेमुळे अक्षय अष्टपुत्रे या नेमबाजाचे पर्यायाने देशाचे नुकसान झाले, अशा प्रतिक्रिया आता व्यक्त केल्या जात आहेत.