शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पुणे, गुजरात संघांमुळे स्पर्धेत नवा उत्साह

By admin | Updated: April 20, 2016 03:21 IST

जीवनात सर्वांत महत्त्वाची बाब आहे आव्हानाला संधी समजण्याची क्षमता असणे. काही चुकीचे घडले तर नकारात्मक विचार मनात घर करतात

जीवनात सर्वांत महत्त्वाची बाब आहे आव्हानाला संधी समजण्याची क्षमता असणे. काही चुकीचे घडले तर नकारात्मक विचार मनात घर करतात. पण, यात काही वेगळे करून मार्ग शोधला तर परिस्थिती सोपी होते आणि सकारात्मक निकाल मिळतात. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास जर एखादा गोलंदाज तुमच्यावर बाऊन्सरचा मारा करीत असेल तर त्या चेंडूला सीमारेषा दाखविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्या वेळी आयपीएलचे दोन चॅम्पियन संघ चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली त्या वेळी आयोजक अडचणीत आले होते. पण, आयोजक परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे गेले आणि चोख प्रत्युत्तर दिले. त्यासाठी त्यांची प्रशंसा करायलाच पाहिजे. आयपीएलच्या नवव्या पर्वाला जवळजवळ १० दिवस झाले असून, दोन नव्या फ्रॅन्चायसी संघांमुळे स्पर्धेत नवा उत्साह संचारला आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्समध्ये चेन्नईची झलक दिसते. धोनीच्या नेतृत्वाखालील कुठलाही संघ नेहमीच तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतो. या संघात अजिंक्य रहाणे, फाफ डू प्लेसिस, केविन पीटरसन, धोनी आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यासारखे अव्वल पाच फलंदाज आहेत, तर गोलंदाजी आक्रमणही संतुलित आहे. गुजरात लायन्स संघातही जागतिक दर्जाच्या फलंदाजांचा समावेश आहे. अ‍ॅरोन फिंच, ब्रँडन मॅक्युलम, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजा या पाच फलंदाजांनी आपली छाप सोडली आहे. काही दिग्गज फ्रॅन्चायसी संघांनी या स्पर्धेत संथ सुरुवात केली आहे, पण प्रत्येक संघ तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. ही स्पर्धा म्हणजे स्प्रिंट नसून मॅरेथॉन आहे. येथे सामन्यागणिक तुम्हाला रणनीती तयार करावी लागते. जो संघ फार पुढचा विचार करतो त्या संघाला त्याची झळ सोसावी लागू शकते. टी-२० क्रिकेटमध्ये अनुभवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वेगवान क्रिकेटमध्ये काही चेंडू जय-पराजयातील अंतर स्पष्ट करतात. त्यामुळे प्रत्येक संघाला अडचणीच्या स्थितीत संयम राखून संघाला पैलतीर गाठून देणाऱ्या खेळाडूंची गरज असते. झहीर खान त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याने २०००मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटपटू म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्याने ९२ कसोटी आणि २०० वन-डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. आता वयाच्या ३७व्या वर्षी तो दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी चांगला कर्णधार ठरत आहे. आरसीबीचा विचार करता आम्ही ‘झहीर अ‍ॅण्ड कंपनी’विरुद्ध पराभूत झाल्यामुळे निराश झालो आहोत, पण आयपीएलच्या नवव्या पर्वात यशस्वी ठरण्यासाठी कशाची गरज आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे.(टीसीएम)