शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

भारतीय पंचांना ‘शिकवणी’ची गरज : के़ हरिहरन

By admin | Updated: April 17, 2017 01:17 IST

भारतीय पंचांच्या कामगिरीचा दर्जा खालावत चालला आहे, आयपीएलमध्ये पंचांकडून होणाऱ्या चुकांमुळे त्या सर्वांच्या नजरेत येत आहेत

नवी दिल्ली : भारतीय पंचांच्या कामगिरीचा दर्जा खालावत चालला आहे, आयपीएलमध्ये पंचांकडून होणाऱ्या चुकांमुळे त्या सर्वांच्या नजरेत येत आहेत. यावर उपाय म्हणून भारतीय पंचांच्या कामगिरीचे मूल्यमापन त्यावर मार्गदर्शन करणारी व्यवस्था उभारण्याची गरज माजी आंतरराष्ट्रीय पंच के़ हरिहरन यांनी व्यक्त केली.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हरिहरन यांनी म्हटले आहे, की ज्याप्रमाणे निवड समितीचे सदस्य खेळाडूंच्या कामगिरीवर नजर ठेवून असतात, तसे पंचांसाठी मेंटॉरची गरज आहे. सामन्यातील पंचांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्याचे आणि सामन्यातील चुकांवर आणि कामगिरीवर पंचांना मार्गदर्शन करण्याचे काम हे मेंटॉर करतील, असे हरिहरन यांचे म्हणणे आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत पंचांकडून मोठ्या चुका झाल्या आहेत. या चुका टाळता आल्या असत्या. आयपीएलला जागतिक पातळीवर मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने या चुका ठळकपणे निदर्शनास येत आहेत. त्याची सोशल मीडियावर मोठी चर्चाही रंगली आहे. आपल्याकडे देशांतर्गत पंचांसाठी मार्गदर्शन करणारी कार्यप्रणाली नाही. त्याचा तोटा होत आहे. हरिहरन यांनी दोन कसोटी आणि ३४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी केली असून ते बीसीसीआयच्या समीक्षा समितीचे सदस्य आहेत. पंचगिरीचा स्तर सुधारण्यासाठी वेळोवेळी बदल करण्याचा प्रस्ताव देण्याचे काम ही समिती करीत असते. पॅनेलमध्ये हरिहरन यांच्याशिवाय माजी पंच विजय चोपडा, आय. शिवराम आणि व्ही. के. रामास्वामी यांचा समावेश आहे. सध्या देशात ११० बीसीसीआय मान्यताप्राप्त पंच आहेत. हरिहरन यांनी सांगितले, की देशातील आघाडीच्या २५ पंचांसाठी मेंटॉर नियुक्तीचा प्रस्ताव आम्ही बीसीसीआयला दिला आहे. याबाबतीत आता बीसीसीआयच्या पुढाकाराची गरज आहे.आयपीएलमधील खराब पंचगिरी...मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात १२ एप्रिलला झालेल्या सामन्याच्या पहिल्या डावातील पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात म्हणजे सहाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरने बुमराहला चौकार ठोकला. यानंतर नियमाप्रमाणे पुढील षटकातील पहिला चेंडू शिखर धवनने खेळणे अपेक्षित होते. परंतु, सातव्या षटकातील पहिला चेंडूदेखील वॉर्नरनेच खेळला आणि त्यावर एक धाव घेतली. विशेष म्हणजे, पंचांच्या लक्षात ही बाब आली तेव्हा खूप उशीर झाला होता.पंचांच्या खराब कामगिरीचा फटका मुंबई इंडियन्सच्या जोस बटलर, रोहित शर्मा यांनाही बसला. बॅटला चेंडू चाटून गेला असताना त्यांना पायचित दिले़