शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

युवांसह अनुभवी खेळाडूंनी साधला यशाचा नेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2015 03:02 IST

यंदाच्या वर्षी नेमबाजीमध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंनी आपली चमक दाखवताना भारतासाठी चमकदार कामगिरी केली

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी नेमबाजीमध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंनी आपली चमक दाखवताना भारतासाठी चमकदार कामगिरी केली. या वर्षी युवा खेळाडूंनी देशात आणि परदेशात शानदार कामगिरी करताना आपली दखल घेण्यास भाग पाडले, तर दुसऱ्या बाजूला सात दिग्गज निशाणेबाजांनी रिओ आॅलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केला. स्वप्निल कुसाळे, सुमेध कुमार, अनंत जीतसिंग नरुका आणि आंचल प्रतापसिंग ग्रेवाल, पुजा घाटकर या युवा खेळाडूंनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली असून, आॅलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा, जीतू राय, गगन नारंग आणि अपूर्वी चंदेला यांनी आॅलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे. विशेष म्हणजे भारतीय निशाणेबाजीची कमजोरी मानल्या जात असलेल्या स्कीट प्रकारातही मेराज अहमद खान याने रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिला कोटा मिळवून आपली छाप पाडली. त्याचबरोबर या वर्षी अटलांटा आॅलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते एनियो फाल्को यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने स्कीट प्रकारात अनेक स्पर्धा गाजवल्या. नुकताच जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेत १७ वर्षीय अनंत जीतने सुवर्ण जिंकताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.भारताला पहिले वैयक्तिक आॅलिम्पिक गोल्डमेडल मिळवून देणाऱ्या अभिनव बिंद्राच्या कामगिरीवर भारतीय निशाणेबाजी संघ अवलंबून आहे. मागील काही स्पर्धांपासून सातत्याने चमकदार कामगिरी करून बिंद्राने भारतीय संघाच्या आशाही उंचावल्या आहेत. त्याच वेळी गतवर्षी तब्बल ७ आंतरराष्ट्रीय पदके जिंकणारा जीतू रायही कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. तर बिंद्रानंतरचा बलाढ्य निशाणेबाज गगन नारंग याने अमेरिकेत झालेल्या आयएसएसएफ रायफल आणि पिस्तूल विश्वकप स्पर्धेत कांस्य जिंकून भारताला तिसरा कोटा मिळवून दिला होता.अनुभवी बिंद्राने आपला दर्जा सिद्ध करताना भारताला चौथा कोटा मिळवून दिला. तर अपूर्वी, गुरप्रीत सिंग, प्रकाश नाजंप्पा, चैन सिंग आणि मेराज यांनी देखील आॅलिम्पिक तिकीट पक्के केले. त्याच वेळी दखल घेण्याची बाब म्हणजे लंडन आॅलिम्पिक रौप्यविजेता विजय कुमार, जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल निशाणेबाज मानवजितसिंग संधू आणि हीना सिद्धू, संजीव राजपूर व आयोनिका पाल या कसलेल्या निशाणेबाजांना अजून आॅलिम्पिक कोटा मिळवण्यात अपयश आले आहे. (वृत्तसंस्था)