शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
5
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
7
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
8
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
9
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
10
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
11
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
12
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
13
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
14
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
15
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
16
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
19
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
20
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

मुंबईकरांनो, तुमचा पाठिंबा मोलाचा

By admin | Updated: May 26, 2015 01:49 IST

हा क्षण तुमच्यसोबत साजरा केल्याचा आनंद शब्दांत सांगू शकत नाही, असे भावनिक आभार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आयपीएल विजेतेपद पटकवल्यानंतर मुंबईकरांचे मानले.

सचिनने मानले आभार : मुंबई इंडियन्सचे जल्लोषात स्वागतमुंबई : नमस्कार मुंबई... तुमचा पाठिंब खुप मोलाचा होता.. त्याशिवाय आम्हाला यश मिळणे शक्य नव्हते. असे आनंदाचे क्षण फार कमी येतात, मात्र हा क्षण तुमच्यसोबत साजरा केल्याचा आनंद शब्दांत सांगू शकत नाही, असे भावनिक आभार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आयपीएल विजेतेपद पटकवल्यानंतर मुंबईकरांचे मानले.सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजल्यापासूनच वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींची गर्दी होत होती. कोणताही सामना नसताना वानखेडे स्टेडियमवर होणारी गर्दी पाहून सामान्य मुंबईकरांना देखील आश्चर्य वाटत होते. मात्र खरे कारण कळाल्यानंतर आपसूकच त्यांची पावले देखील वानखेडेच्या दिशेने वळाले. कारण यंदाच्या आयपीएल सत्राचे दिमाखदार विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडीयन्स संघाचे आगमन घरच्या मैदानावर होणार होते.रात्री ८ वाजून २४ मिनिटांनी टीम मुंबई इंडियन्स वानखेडे मैदानात उतरली ती सामना खेळण्यासाठी नाही तर अडखळत्या सुरुवातीनंतरही ज्या चाहत्यांनी साथ न सोडता प्रोत्साहन दिले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि यावेळी आपल्या लाडक्या संघाला पाहताच उपस्थित चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडले.तासभर चाललेल्या या सोहळ्यामध्ये मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात आपल्या विजयी संघाचे दमदार स्वागत केले. सलग चार सामने गमावल्यानंतर क्वालिफायर गाठण्याची देखील शक्यता नसताना संघाने थेट विजेतेपदाला गवसणी घातल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. सर्वप्रथम संघाने संपुर्ण स्टेडियमवर फेरीमारुन मुंबईकरांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले. यावेळी भज्जी, पोलाडसह साऱ्याच खेळाडूंनी स्टेडियम गाजवले. भज्जीने मी पंजाबीपेक्षा स्वत:ला मुंबईकर समजत असल्याचे सांगून मुंबईकरांना जिंकले.दरम्यान यावेळी सर्वाधिक जयघोष झाला तो सचिनचा. सचिनने देखील आपल्या चहत्यांचे मनापासून आभार मानताना विजेतेपदाचे सारे श्रेय चाहत्यांना दिले. विशेष म्हणजे सचिनने मराठीतून संवाद साधल्याने स्टेडियममध्ये जबरदस्त जोश दिसून आला. रात्री ९ वाजून ४ मिनिटांनी लहान मुलांच्या हस्ते ‘आयपीएल ट्रॉफी’ मैदानात आणली गेली.चाहत्यांचा पाठिंबा अप्रतिम होता. संघाची एकूण सुरुवात पाहता त्यांनी आमची साथ कधीच सोडली नाही. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाल प्रोत्साहन मिळाले. या संपुर्ण सत्रात शालेय विद्यार्थ्यांना मुंबईच्या सामन्यासाठी निमंत्रित केले होते. तो क्षण अवर्णनिय आहे. त्यांचे शुभेच्छा देखील खुप मोलाचे होते.- नीता अंबानी ,मुंबई इंडियन्स संघमालकीणनिराशाजनक सुरुवातीनंतर मिळवलेली विजयी लय महत्त्वाची ठरली. यासाठी संघातील प्रत्येकाने खुप मेहनत घेतली. विशेष म्हणजे चाहत्यांनी आमच्यवरील विश्वास ढासळू दिला नाही. त्यामुळे हे विजेतेपद खास मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आहे.- रोहित शर्मा,कर्णधार