शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनो, तुमचा पाठिंबा मोलाचा

By admin | Updated: May 26, 2015 01:49 IST

हा क्षण तुमच्यसोबत साजरा केल्याचा आनंद शब्दांत सांगू शकत नाही, असे भावनिक आभार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आयपीएल विजेतेपद पटकवल्यानंतर मुंबईकरांचे मानले.

सचिनने मानले आभार : मुंबई इंडियन्सचे जल्लोषात स्वागतमुंबई : नमस्कार मुंबई... तुमचा पाठिंब खुप मोलाचा होता.. त्याशिवाय आम्हाला यश मिळणे शक्य नव्हते. असे आनंदाचे क्षण फार कमी येतात, मात्र हा क्षण तुमच्यसोबत साजरा केल्याचा आनंद शब्दांत सांगू शकत नाही, असे भावनिक आभार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आयपीएल विजेतेपद पटकवल्यानंतर मुंबईकरांचे मानले.सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजल्यापासूनच वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींची गर्दी होत होती. कोणताही सामना नसताना वानखेडे स्टेडियमवर होणारी गर्दी पाहून सामान्य मुंबईकरांना देखील आश्चर्य वाटत होते. मात्र खरे कारण कळाल्यानंतर आपसूकच त्यांची पावले देखील वानखेडेच्या दिशेने वळाले. कारण यंदाच्या आयपीएल सत्राचे दिमाखदार विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडीयन्स संघाचे आगमन घरच्या मैदानावर होणार होते.रात्री ८ वाजून २४ मिनिटांनी टीम मुंबई इंडियन्स वानखेडे मैदानात उतरली ती सामना खेळण्यासाठी नाही तर अडखळत्या सुरुवातीनंतरही ज्या चाहत्यांनी साथ न सोडता प्रोत्साहन दिले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि यावेळी आपल्या लाडक्या संघाला पाहताच उपस्थित चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडले.तासभर चाललेल्या या सोहळ्यामध्ये मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात आपल्या विजयी संघाचे दमदार स्वागत केले. सलग चार सामने गमावल्यानंतर क्वालिफायर गाठण्याची देखील शक्यता नसताना संघाने थेट विजेतेपदाला गवसणी घातल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. सर्वप्रथम संघाने संपुर्ण स्टेडियमवर फेरीमारुन मुंबईकरांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले. यावेळी भज्जी, पोलाडसह साऱ्याच खेळाडूंनी स्टेडियम गाजवले. भज्जीने मी पंजाबीपेक्षा स्वत:ला मुंबईकर समजत असल्याचे सांगून मुंबईकरांना जिंकले.दरम्यान यावेळी सर्वाधिक जयघोष झाला तो सचिनचा. सचिनने देखील आपल्या चहत्यांचे मनापासून आभार मानताना विजेतेपदाचे सारे श्रेय चाहत्यांना दिले. विशेष म्हणजे सचिनने मराठीतून संवाद साधल्याने स्टेडियममध्ये जबरदस्त जोश दिसून आला. रात्री ९ वाजून ४ मिनिटांनी लहान मुलांच्या हस्ते ‘आयपीएल ट्रॉफी’ मैदानात आणली गेली.चाहत्यांचा पाठिंबा अप्रतिम होता. संघाची एकूण सुरुवात पाहता त्यांनी आमची साथ कधीच सोडली नाही. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाल प्रोत्साहन मिळाले. या संपुर्ण सत्रात शालेय विद्यार्थ्यांना मुंबईच्या सामन्यासाठी निमंत्रित केले होते. तो क्षण अवर्णनिय आहे. त्यांचे शुभेच्छा देखील खुप मोलाचे होते.- नीता अंबानी ,मुंबई इंडियन्स संघमालकीणनिराशाजनक सुरुवातीनंतर मिळवलेली विजयी लय महत्त्वाची ठरली. यासाठी संघातील प्रत्येकाने खुप मेहनत घेतली. विशेष म्हणजे चाहत्यांनी आमच्यवरील विश्वास ढासळू दिला नाही. त्यामुळे हे विजेतेपद खास मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आहे.- रोहित शर्मा,कर्णधार