शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

मुंबई विजयी मार्गावर

By admin | Updated: February 6, 2016 03:12 IST

झारखंडचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्टात आणून २४४ धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर बलाढ्य मुंबईने दुसऱ्या डावात २४५ धावांची मजल मारून झारखंडला विजयासाठी ४९० धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले.

मुंबई : झारखंडचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्टात आणून २४४ धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर बलाढ्य मुंबईने दुसऱ्या डावात २४५ धावांची मजल मारून झारखंडला विजयासाठी ४९० धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना झारखंडने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २८ अशी सुरुवात केली. श्रेयश अय्यरने दुसऱ्या डावात शानदार ८१ धावांची खेळी केली.म्हैसूर येथे सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सुरुवातीलाच मुंबईने आवश्यक २ बळी घेत झारखंडला १७२ धावांत गुंडाळले. यानंतर मुंबईकरांनी दुसऱ्या डावाची आक्रमक सुरुवात करताना झारखंडवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमणाच्या नादात बळी गेल्याने मुंबईकरांचा डाव मर्यादित राहिला. पुन्हा एकदा श्रेयश अय्यरने शानदार खेळी करताना १०६ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ८१ धावांची खेळी केली. तर कर्णधार अभिषेक नायरने ७७ चेंडूंत ७ चौकार मारताना ४३ धावांची उपयुक्त खेळी केली. या दोघांच्या निर्णायक फटकेबाजीमुळे मुंबईला दुसऱ्या डावात दोनशेचा टप्पा गाठता आला. समर कद्री याने आपल्या फिरकीच्या जोरावर ६२ धावांत ५ खंदे फलंदाज बाद करताना मुंबईच्या धावसंख्येला वेसण घातली. तर राहुल शुक्ला आणि कौशल सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. दुसऱ्या डावात सावध सुरुवात करताना झारखंडने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २८ अशी सुरुवात केली. फिरकीपटू इक्बाल अब्दुल्लाने सलामीवीर आनंद सिंगचा बळी मिळवला. तत्पूर्वी ८ बाद १५० या धावसंख्येवरून सुरुवात करताना झारखंडचा डाव झटपट गुंडाळण्यात मुंबईकरांना यश आले. शार्दुल ठाकूरने झारखंडचे शेपूट जास्त वेळ वळवळणार नाही याची दखल घेत नाबाद फलंदाज कौशल सिंग व शेवटचा फलंदाज समर कद्री यांना बाद केले. ठाकूरने हेरवाडकर व अब्दुल्लाप्रमाणे ३ बळी घेत मुंबईसाठी मोलाची कामगिरी केली.संक्षिप्त धावफलक : मुंबई (पहिला डाव) : ११४.४ षटकांत सर्वबाद ४१६ धावा. झारखंड (पहिला डाव) : ७१.५ षटकांत सर्वबाद १७२ धावा (कौशल सिंग ४३, आनंद सिंग ३९; अखिल हेरवाडकर ३/२६, शार्दुल ठाकूर ३/३७, अब्दुल्ला ३/५०). मुंबई (दुसरा डाव) : ६३.१ षटकांत सर्वबाद २४५ धावा (श्रेयश अय्यर ८१, नायर ४३; समर कद्री ५/६५). झारखंड (दुसरा डाव) : १३ षटकांत १ बाद २८ (शिव गौतम खेळत आहे १२, आनंद सिंग १२, विराट सिंग खेळत आहे ४; इक्बाल अब्दुल्ला १/११)