शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
5
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
6
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
7
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
8
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
10
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
11
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
12
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
13
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
14
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
15
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
16
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
18
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
20
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

मुंबईला ठेंगा... फायनल बंगलोरमध्येच !

By admin | Updated: May 19, 2014 04:30 IST

आयपीएल संचलन परिषदेच्या सर्व अटी मान्य करण्याची तयारी दाखवूनही यंदाची फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार नाही,

मुंबई : आयपीएल संचलन परिषदेच्या सर्व अटी मान्य करण्याची तयारी दाखवूनही यंदाची फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार नाही, हे अखेर स्पष्ट झाले. संचलन परिषदेने मुंबईला ठेंगा दाखवत आयपीएल-७ची फायनल बंगलोरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर घेण्याचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवला. काल, शनिवारी रात्री संचालन परिषदेच्या सदस्यांनी दीर्घ चर्चा करून अंतिम लढत बंगलोरमध्येच खेळवण्याचा निर्णय बदलण्याची आवश्यकता नसल्याचा निष्कर्ष काढला. ‘मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) मागणीवर संचलन परिषदेच्या सर्व सदस्यांनी विचार केला. मात्र, आयपीएलच्या सातव्या मोसमाची फायनल बंगलोरमध्येच खेळवण्यात यावी, याबाबत परिषदेने सर्वसंमतीने निर्णय घेतला. मुंबईने सर्व अटी मानण्याची तयारी दर्शवली असली तरी सोमवार वा मंगळवारपर्यंत थांबण्याइतपत वेळ आमच्याकडे नाही, हेदेखील अंतिम लढत वानखेडे स्टेडियमवर न खेळवण्याचे एक कारण आहे,’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले. आपल्या पूर्वीच्या निर्णयांबाबत लवचिक भूमिका घेत संचलन परिषदेच्या सर्व १४ अटी मान्य करण्याची तयारी दर्शवूनही अखेर एमसीएच्या पदरी निराशाच आली. १ जूनला ही फायनल होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सला २३ व २५ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर सामने खेळायचे आहेत. शिवाय ३० मे रोजी दुसरी क्वालिफायर लढत याच मैदानावर होईल. २८ मे रोजी होणारी एलिमिनेटर लढत मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)