शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

मुंबईला ठेंगा... फायनल बंगलोरमध्येच !

By admin | Updated: May 19, 2014 04:30 IST

आयपीएल संचलन परिषदेच्या सर्व अटी मान्य करण्याची तयारी दाखवूनही यंदाची फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार नाही,

मुंबई : आयपीएल संचलन परिषदेच्या सर्व अटी मान्य करण्याची तयारी दाखवूनही यंदाची फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार नाही, हे अखेर स्पष्ट झाले. संचलन परिषदेने मुंबईला ठेंगा दाखवत आयपीएल-७ची फायनल बंगलोरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर घेण्याचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवला. काल, शनिवारी रात्री संचालन परिषदेच्या सदस्यांनी दीर्घ चर्चा करून अंतिम लढत बंगलोरमध्येच खेळवण्याचा निर्णय बदलण्याची आवश्यकता नसल्याचा निष्कर्ष काढला. ‘मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) मागणीवर संचलन परिषदेच्या सर्व सदस्यांनी विचार केला. मात्र, आयपीएलच्या सातव्या मोसमाची फायनल बंगलोरमध्येच खेळवण्यात यावी, याबाबत परिषदेने सर्वसंमतीने निर्णय घेतला. मुंबईने सर्व अटी मानण्याची तयारी दर्शवली असली तरी सोमवार वा मंगळवारपर्यंत थांबण्याइतपत वेळ आमच्याकडे नाही, हेदेखील अंतिम लढत वानखेडे स्टेडियमवर न खेळवण्याचे एक कारण आहे,’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले. आपल्या पूर्वीच्या निर्णयांबाबत लवचिक भूमिका घेत संचलन परिषदेच्या सर्व १४ अटी मान्य करण्याची तयारी दर्शवूनही अखेर एमसीएच्या पदरी निराशाच आली. १ जूनला ही फायनल होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सला २३ व २५ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर सामने खेळायचे आहेत. शिवाय ३० मे रोजी दुसरी क्वालिफायर लढत याच मैदानावर होईल. २८ मे रोजी होणारी एलिमिनेटर लढत मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)