शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

आमच्यापेक्षा भारतीय संघावर जास्त दबाव - बांगलादेश कर्णधार

By admin | Updated: June 15, 2017 08:08 IST

शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे. जो संघ चांगला क्रिकेट खेळेल तो संघ जिंकेल. मी माझ्या सहका-यांना या लढतीकडे उपांत्यफेरी म्हणून नव्हे तर, फक्त एक सामना म्हणून पाहण्यास सांगितले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

बर्मिंगहॅम, दि. 15 - प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीची उपांत्यफेरी खेळणा-या बांगलादेश संघाचा कर्णधार  मशरफी मुर्तजाने आपल्या संघावर दबाव असल्याचे कबूल केले. आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेमध्ये प्रथमच बांगलादेशच्या संघाने उपांत्यफेरीत मजल मारली आहे. आम्ही उपांत्यफेरीचा सामना खेळतोय त्यामुळे निश्चित दबाव असणार. पण आमच्यावर जसा दबाव आहे तसाच किंबहुना त्यापेक्षा जास्त दबाव भारतावर आहे. 
 
भारताची लोकसंख्या आणि क्रिकेटची लोकप्रियता यामुळे भारतावर आमच्यापेक्षा जास्त दबाव असेल असे मुर्तजा म्हणाला. सामन्यापूर्वी आयोजित पत्रकारपरिषदेत त्याने हे विधान केले. 4 बाद 33 असा डाव अडचणीत बांगलादेशने 265 धावांचे लक्ष्य पार करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडसारख्या बलाढय संघावर विजय मिळवून उपांत्यफेरीत पोहोचल्याने बांगलादेशातील क्रिकेटप्रेमींच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत तसेच त्यांचा आत्मविश्वासही कमालीचा उंचावला आहे. 
 
दोन्ही संघांवर अपेक्षांचा दबाव आहे. शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे. जो संघ चांगला क्रिकेट खेळेल तो संघ जिंकेल. मी माझ्या सहका-यांना या लढतीकडे उपांत्यफेरी म्हणून नव्हे तर, फक्त एक सामना म्हणून पाहण्यास सांगितले आहे. कारण तुम्ही मनातून उपांत्यफेरीत खेळत आहात असा विचार केला तर नक्कीच तुमच्यावर दबाव वाढेल पण तुम्ही याकडे फक्त एक मॅच म्हणून पाहिले तर तुम्ही अधिक चांगला खेळ करु शकता असे मुर्तजा म्हणाला. 
 
आणखी वाचा 
 
कागदावर भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे बांगलादेशला विजयाचा दावेदार न समजणे चुकीचे ठरेल. भारतीय संघ या शेजारी देशाच्या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. बांगलादेशने साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्ध दमदार पुनरागमन करताना विजय मिळवला होता, त्यामुळे या संघाला कमकुवत लेखणे चुकीचे ठरेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. 
 
भारतीय कामगिरीत सातत्य राखत बांगलादेशला धडा शिकविण्यास प्रयत्नशील राहील. भारतीय फलंदाज फॉर्मात असून गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत, क्षेत्ररक्षणही चांगले आहे. एकूण विचार करता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ खेळाच्या सर्वच विभागत अव्वल भासत आहे.