शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भारत-पाक अंतिम सामना पाहणार 32 कोटींहून अधिक प्रेक्षक, बनणार नवा रेकॉर्ड

By admin | Updated: June 18, 2017 13:19 IST

भारत-पाकिस्तानच्या आजच्या आयसीसी चॅम्पियन्सच्या अंतिम सामन्याची राजकीय वर्तुळापासून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

ऑनलाइन लोकमत ओव्हल, दि. 18 - भारत-पाकिस्तानच्या आजच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याची राजकीय वर्तुळापासून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या दोन प्रतिस्पर्धी देशांमधला अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांचीही लक्षणीय उपस्थिती दिसून येईल. भारत-पाक महामुकाबला लंडनच्या थेट ओव्हल ग्राऊंडवर जाऊन पाहणा-या प्रेक्षकांशिवाय इतरही टीव्हीच्या माध्यमातून हा सामना पाहतील. जगभरातील क्रिकेटचे चाहते आज टीव्हीसमोरच बसतील. आज पूर्ण जगभरात जवळपास 32 कोटी 40 लाख प्रेक्षक आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा सामना पाहतील, असा अंदाज आयसीसी(इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल)नं वर्तवला आहे. जर असे झाल्यास हा क्रिकेट इतिहासातला सर्वात जास्त पाहण्यात आलेला महामुकाबला ठरेल. खरं तर 2011मधला वर्ल्ड कप अंतिम सामना सर्वाधिक पाहण्यात आला होता. तो सामना जवळपास 55 कोटी 80 लाख लोकांनी पाहिला होता. त्याच वेळी दुस-या स्थानावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान खेळण्यात आलेला वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीचा सामना होता. तो सामना 49 कोटी 50 लाख प्रेक्षकांनी पाहिला होता. 

तसेच भारत-पाकिस्तानदरम्यानच्या वर्ल्ड कप 2015चा सामना 31 कोटी 30 लाख प्रेक्षकांनी पाहिला होता. तसेच भारत आणि श्रीलंका या संघांदरम्यान झालेला वर्ल्ड कप 2011चा सामना 30 कोटी जनतेनं पाहिला होता. आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात होत असलेला अंतिम सामना टीव्हीवरील प्रेक्षक संख्येचे इतर सर्व रेकॉर्ड तोडतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.