शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

मानसिकदृष्ट्या दोन्ही संघ बरोबरीत

By admin | Updated: March 21, 2017 01:05 IST

रांचीमध्ये झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. शेवटचा दिवस उजाडला, तेव्हा भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते.

रांचीमध्ये झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. शेवटचा दिवस उजाडला, तेव्हा भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते. कारण, चौथा दिवस संपता संपता भारताने आॅस्ट्रेलियाचे दोन गडी बाद करुन, त्यांच्यावर थोडे दडपण आणले होते. त्यात सकाळी पहिल्या सत्रात भारतासाठी या मालिकेत सर्वांत मोठी डोकेदुखी ठरलेला स्टिव्ह स्मिथ आणि सलामीवीर रेनशॉ हे दोघेही लवकर बाद झाले, त्यामुळे भारतीय गोलंदाज आज जलवा दाखवणार असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही. शॉन मार्श आणि पीटर हॅँड्सकोंब यांच्यात झालेल्या जबरदस्त भागीदारीमुळे भारताला विजयापासून वंचित राहावे लागले. हँड्सकोब, रेनशॉ, कमिन्स यासारखे युवा खेळाडू हे भारत दौऱ्यातून आॅस्ट्रेलियाला मिळालेली देणगी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करुन ते संघात आपले स्थान पक्के करीत आहेत. आॅस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णीत ठेवून मोठे यश तर मिळवले आहेच, शिवाय बंगलोर कसोटीतील विजयामुळे भारताला जी मानसिक आघाडी मिळाली होती, ती आता बरोबरीत आली आहे. त्यामुळे चौथ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी दोन्ही संघ जेव्हा धरमशाला येथे जातील तेव्हा दोघेही समान पातळीवर असतील.कसोटी अनिर्णीत राहिल्यामुळे भारतीय चमू निराश झाला असला, तरी या सामन्यातून भारताला बरेच काही गवसले आहे. चेतेश्वर पुजारा हा खेळाडू किती महान आहे, याची प्रचिती या सामन्यातून आली. दबावाच्या वेळी तो मैदानात तंबू ठोकून उभा राहिला नसता, तर आॅस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळाली असती, अशी परिस्थिती होती. परंतु, त्याने आपल्या फलंदाजीने आॅस्ट्रेलियाची धावसंख्या मागे टाकून भारताला दीडशेच्यावर आघाडी मिळवून दिली. यावरुन तो किती मोठा खेळाडू आहे त्याची कल्पना येते. याशिवाय वृद्धिमान साहा हा सुध्दा या मालिकेतून भरवशाचा फलंदाज म्हणून उदयास येत आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या मोठ्या खेळाडूची जागा त्याला भरुन काढायची जबाबदारी त्याच्यावर आहे. पण, संपूर्ण हंगामात त्याने चांगली कामगिरी करुन धोनीची उणीव जाणवणार नाही याची काळजी घेतली आहे. रवींद्र जडेजाने आपली अष्टपैलू खेळाडू म्हणून छाप आणखी पक्की केली आहे. या खेळपट्टीवर ९ बळी घेणे कठीण कामगिरी आहे. परंतु, गोलंदाजीतील सातत्य त्याने दाखवून दिले आहे. त्याचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार होत असते, फलंदाजीत तो परिस्थितीनुसार गिअरअप करतो. त्याचे चौथ्या दिवसाचे जलद अर्धशतक भारतासाठी महत्त्वपूर्ण होते. तो अष्टपैलू म्हणून प्रगल्भ होत आहे, हे मात्र निश्चित. रविचंद्रन आश्विनला या मालिकेत जास्त बळी मिळवता आले नसले तरी गेल्या दोन हंगामात त्याने केलेली कामगिरी विसरुन चालणार नाही. त्याला लगेच दोषी ठरवून चालणार नाही, पुढे धरमशालामध्ये काय होतंय ते पाहुया.