शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

पावसामुळे सामना रद्द, भारताचा मालिका विजय

By admin | Updated: June 19, 2014 20:40 IST

यजमान बांग्लादेशविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला असून भारताने या मालिकेत २-० असा विजय मिळवत सहारा कपवर नाव कोरले आहे.

ऑनलाइन टीम

ढाका, दि. १९ -  यजमान बांग्लादेशविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला असून भारताने या मालिकेत २-० असा विजय मिळवत सहारा कपवर नाव कोरले आहे. बांग्लादेश दौ-यात चमकदार कामगिरी करणा-या स्टुअर्ट बिन्नीला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. 
तीन सामन्यांच्या सहारा कप मालिकेत भारताने सलग दोन विजय मिळवत मालिकेत खिशात घातली. तिस-या सामन्यात बांग्लादेशवर मात करत भारताला निर्भेळ यश मिळवून देण्याचा कर्णधार सुरेश रैनाचा प्रयत्न होता. तर तिस-या सामन्यात विजय मिळवून संघाची अब्रू वाचवण्याच्या इराद्याने बांग्लादेश संघ मैदानात उतरला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  मात्र लागोपाठ दुस-या सामन्यात भारताची फलंदाजी ढेपाळली.  भारताचे सलामीचे फलंदाज उथप्पा (५), रहाणे (३) आणि रायडु (१) स्वस्तात तंबूत परतले. यानंतर कर्णधार रैनाने पुजाराच्या साथीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र २५ धावांवर असताना रैनाही बाद झाला. रैनापाठोपाठ पुजारा २७ धावांवर पायचीत झाला. रैना, पुजारा व बिन्नीवगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.  पावसापूर्वी खेळ थांबला तेव्हा भारताने ३४ षटकांत नऊ विकेटच्या मोबदल्यात ११९ धावा केल्या होत्या. बांग्लादेशतर्फे शाकिब हसनने तीन, अल अमीन हुसैन व तास्किन अहमद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.  मुसळधार पावसामुळे तीन वेळा थांबवण्यात आला होता. अखेरीस पंचांनी मैदानाची पाहणी केल्यावर दोन्ही कर्णधारांशी चर्चा केली. यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दुस-या एकदिवसीय सामन्यात सहा धावात चार विकेट घेणा-या स्टुअर्ट बिन्नीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.