शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

भारतापुढे मलेशियाचे आव्हान

By admin | Updated: July 1, 2015 02:53 IST

साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभूत झालेल्या भारतीय संघाला बुधवारी मलेशियाविरुद्ध झुुंजावे लागेल.

एंटवर्प (बेल्जियम) : साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभूत झालेल्या भारतीय संघाला बुधवारी मलेशियाविरुद्ध झुुंजावे लागेल. उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात बचाव फळीतील कमजोरी दूर करण्याचे आव्हान भारतीय संघापुढे आहे.बेल्जियममध्ये खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड हॉकी लीग सेमिफायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन आॅस्ट्रेलियाकडून भारताला ६ गोल खावे लागले. बुधवारी केएचसी ड्रॅगन्स स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यात भारतीय बचाव फळीची मलेशियन आक्रमणापुढे कसोटी लागणार आहे. मलेशियासाठी हा महत्त्वपूर्ण सामना असून, आॅलिम्पिक तिकीट मिळविण्यासाठी ते उद्या कोणतीही कसर सोडणार नाहीत. भारताने या स्पर्धेत युवा संघ उतरवला आहे. भारत गेल्या वर्षी इंचियोन आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवून २०१६च्या आॅलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरला आहे. त्यामुळे या संघात अनेक युवा खेळाडूंना पारखण्याची संधी मिळाली आहे. डिसेंबरमध्ये भारतात होणाऱ्या लीगच्या फायनलमध्ये विजेतेपद मिळविण्यासाठी भारत उत्सुक असेल. त्यामुळे मलेशियाला सहजासहजी विजय मिळणे अशक्य आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला २-६ असा पराभव पत्करावा लागला होता. या निकालाने भारतीय प्रशिक्षक पॉल वॉन ऐस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताला स्टार ड्रॅगफ्लिकर रूपिंदरपाल सिंगची कमतरता जाणवत आहे. तो सराव सामन्यात जखमी झाला आहे. त्याची दुखापत सुधारली आहे; पण त्याला कोणत्याही सामन्यात खेळवलेले नाही. परंतु, भारतीय संघासोबत तो सराव करताना दिसत आहे. भारतीय संघ मलेशियाला हलक्यात घेत नाही. कर्णधार सरदार म्हणाला, की मलेशियाचा संघ मजबूत आहे. त्यांच्याविरुद्ध आम्हाला सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे लागणार आहे. आम्हाला प्रत्येक संधीचा फायदा घ्यावा लागेल. आम्हाला रूपिंदरसिंगची कमतरता जाणवत आहे. एप्रिलमध्ये इपोह येथे झालेल्या सामन्यात भारत मलेशियाकडून हारला होता; परंतु त्या वेळेचा त्यांचा संघ आताच्या तुलनेत मजबूत होता. या स्पर्धेतून ३ संघ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात. सेमिफायनलमध्ये न पोहोचणाऱ्या संघालाही पात्रतेची संधी मिळू शकते. खंडीय स्पर्धा जिंकून पात्र ठरलेला संघ सेमिफायनलमध्ये पोहोचल्यास या स्पर्धेतील पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघही आॅलिम्पिक पात्रता मिळवू शकतो.