शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

कोहली - कुंबळे वादाने लक्ष वेधले

By admin | Updated: June 1, 2017 00:32 IST

सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानकपणे टीम इंडियावर वादाचे काळे ढग जमा झाले. गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये

- अयाझ मेमन -सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानकपणे टीम इंडियावर वादाचे काळे ढग जमा झाले. गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामध्ये दरी पडली असल्याचे वृत्त येत असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे वळले आहे. विशेष म्हणजे कोहली - कुंबळे यांनी एकत्रितपणे गतवर्ष गाजवले असल्याने या दोघांमध्ये वाद असल्याच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.कुंबळेची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर भारतीय संघाची विजयी मार्गावर वेगात आगेकूच सुरू झाली. यामुळे कुंबळे - कोहली ही भागीदारी भारतीय क्रिकेटसाठी सुवर्णक्षण ठरल्याचेही सिद्ध झाले. कसोटीमध्ये भारताने अग्रस्थान मिळवले. तसेच एकदिवसीय व टी-२० मध्येही भारताचे अग्रस्थान फार दूर नाही. कर्णधार कोहलीची महत्त्वाकांक्षा, त्याचे आक्रमक नेतृत्व यासह प्रशिक्षक कुंबळेचा अनुभव, त्याचे कौशल्य आणि निर्णयक्षमता हे भारतीय संघाच्या यशाचे सूत्र बनले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उंबरठ्यावर सर्व काही सुरळीत दिसत असताना या सर्व वृत्तानंतर भारतीय संघातील चैतन्य कमी होण्याची शक्यता आहे. मुळात जेव्हा बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन पाठविण्याची मागणी केली, तेव्हाच काहीतरी गडबड असल्याची शंका आली. गेल्या १२ महिन्यांतील भारतीय संघाच्या कामगिरीचा आलेख बघितल्यास नक्कीच कुंबळेच्या कार्यकाळात वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र, यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे, बीसीसीआयने नियमाप्रमाणे प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागितले असणार. कारण, कुंबळेची निवड ही एक वर्षाच्या कार्यकाळापुरती झाली होती. पण, त्याचवेळी दुसरी चर्चाही रंगत आहे. कुंबळेने स्वत:सह खेळाडूंच्या मानधनवाढीचीही मागणी केल्याने बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले, अशी चर्चाही होत आहे. मात्र, बीसीसीआयने आपण केवळ पारदर्शी कार्य करत असल्याचे स्पष्ट करतानाच कुंबळेच्या अर्जाला थेट प्रवेश मिळेल, असेही सांगितले. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीला रवाना झाल्यानंतर बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागितले. यामुळे, आॅस्टे्रलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर दोन महिन्यांतच बीसीसीआयने ही प्रक्रिया का केली नाही? असा प्रश्नही विचारला जात आहे. मात्र, या सर्व घडामोडींना कोहली - कुंबळे वादाचे कारण दिले जात आहे. जर का हे खरं असेल, तर बीसीसीआयने मागितलेल्या प्रशिक्षकपदाच्या अर्ज प्रक्रियेला नवे वळण लागेल. या सव कथित वृत्तानुसार बीसीसीआयचे काही अधिकारी जाणून आहेत, की भारतीय संघाच्या डे्रसिंग रूममध्ये काहीच आलबेल नाही. त्यामुळेच त्यांनी प्रशिक्षकपदासाठी नवे अर्ज मागवले आहेत. दरम्यान, प्रशिक्षकपदाचा निर्णय नक्कीच बीसीसीआयवर अवलंबून आहे. सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या दिग्गजांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीकडे ही जबाबदारी असेल. त्याचवेळी एकीकडे भारताचा कर्णधार आणि दुसरीकडे भारताचा प्रशिक्षक या दोघांची निवड एक वर्षापूर्वीच करण्यात आली होती. तसेच, सल्लागार समितीच्या तिन्ही सदस्यांना ग्रेग चॅपेल यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात कशा प्रकारे संघातील वातावरण ढवळून निघाले होते, याची जाणीव असल्याने त्यांचा निर्णयही महत्त्वपूर्ण ठरेल. मुळात कोण बरोबर आणि कोण चुकीचे, हे ठरवण्याइतपत ही समस्या फार मोठी नाही. जर हा वाद खरंच असेल, तर बोर्डाने दाखवलेला विश्वास नाहीसा होईल. या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीसीसीआय, सीओए आणि सल्लागार समितीला हे सर्व वाद मिटवून सुरळीत आणि परिणामकारक कार्य करण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याचवेळी, कोहली व कुंबळे यांनी एकत्रितपणे चर्चा करून हे सर्व वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा.