शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

कोहली - कुंबळे वादाने लक्ष वेधले

By admin | Updated: June 1, 2017 00:32 IST

सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानकपणे टीम इंडियावर वादाचे काळे ढग जमा झाले. गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये

- अयाझ मेमन -सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानकपणे टीम इंडियावर वादाचे काळे ढग जमा झाले. गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामध्ये दरी पडली असल्याचे वृत्त येत असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे वळले आहे. विशेष म्हणजे कोहली - कुंबळे यांनी एकत्रितपणे गतवर्ष गाजवले असल्याने या दोघांमध्ये वाद असल्याच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.कुंबळेची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर भारतीय संघाची विजयी मार्गावर वेगात आगेकूच सुरू झाली. यामुळे कुंबळे - कोहली ही भागीदारी भारतीय क्रिकेटसाठी सुवर्णक्षण ठरल्याचेही सिद्ध झाले. कसोटीमध्ये भारताने अग्रस्थान मिळवले. तसेच एकदिवसीय व टी-२० मध्येही भारताचे अग्रस्थान फार दूर नाही. कर्णधार कोहलीची महत्त्वाकांक्षा, त्याचे आक्रमक नेतृत्व यासह प्रशिक्षक कुंबळेचा अनुभव, त्याचे कौशल्य आणि निर्णयक्षमता हे भारतीय संघाच्या यशाचे सूत्र बनले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उंबरठ्यावर सर्व काही सुरळीत दिसत असताना या सर्व वृत्तानंतर भारतीय संघातील चैतन्य कमी होण्याची शक्यता आहे. मुळात जेव्हा बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन पाठविण्याची मागणी केली, तेव्हाच काहीतरी गडबड असल्याची शंका आली. गेल्या १२ महिन्यांतील भारतीय संघाच्या कामगिरीचा आलेख बघितल्यास नक्कीच कुंबळेच्या कार्यकाळात वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र, यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे, बीसीसीआयने नियमाप्रमाणे प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागितले असणार. कारण, कुंबळेची निवड ही एक वर्षाच्या कार्यकाळापुरती झाली होती. पण, त्याचवेळी दुसरी चर्चाही रंगत आहे. कुंबळेने स्वत:सह खेळाडूंच्या मानधनवाढीचीही मागणी केल्याने बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले, अशी चर्चाही होत आहे. मात्र, बीसीसीआयने आपण केवळ पारदर्शी कार्य करत असल्याचे स्पष्ट करतानाच कुंबळेच्या अर्जाला थेट प्रवेश मिळेल, असेही सांगितले. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीला रवाना झाल्यानंतर बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागितले. यामुळे, आॅस्टे्रलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर दोन महिन्यांतच बीसीसीआयने ही प्रक्रिया का केली नाही? असा प्रश्नही विचारला जात आहे. मात्र, या सर्व घडामोडींना कोहली - कुंबळे वादाचे कारण दिले जात आहे. जर का हे खरं असेल, तर बीसीसीआयने मागितलेल्या प्रशिक्षकपदाच्या अर्ज प्रक्रियेला नवे वळण लागेल. या सव कथित वृत्तानुसार बीसीसीआयचे काही अधिकारी जाणून आहेत, की भारतीय संघाच्या डे्रसिंग रूममध्ये काहीच आलबेल नाही. त्यामुळेच त्यांनी प्रशिक्षकपदासाठी नवे अर्ज मागवले आहेत. दरम्यान, प्रशिक्षकपदाचा निर्णय नक्कीच बीसीसीआयवर अवलंबून आहे. सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या दिग्गजांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीकडे ही जबाबदारी असेल. त्याचवेळी एकीकडे भारताचा कर्णधार आणि दुसरीकडे भारताचा प्रशिक्षक या दोघांची निवड एक वर्षापूर्वीच करण्यात आली होती. तसेच, सल्लागार समितीच्या तिन्ही सदस्यांना ग्रेग चॅपेल यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात कशा प्रकारे संघातील वातावरण ढवळून निघाले होते, याची जाणीव असल्याने त्यांचा निर्णयही महत्त्वपूर्ण ठरेल. मुळात कोण बरोबर आणि कोण चुकीचे, हे ठरवण्याइतपत ही समस्या फार मोठी नाही. जर हा वाद खरंच असेल, तर बोर्डाने दाखवलेला विश्वास नाहीसा होईल. या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीसीसीआय, सीओए आणि सल्लागार समितीला हे सर्व वाद मिटवून सुरळीत आणि परिणामकारक कार्य करण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याचवेळी, कोहली व कुंबळे यांनी एकत्रितपणे चर्चा करून हे सर्व वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा.