शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ईशांतने धाडला निम्मा संघ तंबूत

By admin | Updated: August 7, 2015 22:37 IST

वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे संकेत देताना आज श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादशच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना एकापाठोपाठ

कोलंबो : वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे संकेत देताना आज श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादशच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना एकापाठोपाठ माघारी परतवले. ईशांतच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने तीन दिवसीय सराव सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर पकड मजबूत केली. ईशांतने पहिल्या स्पेलमध्ये चार षटकांत पाच धावांच्या मोबदल्यात पाच फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. दिल्लीच्या या वेगवान गोलंदाजाने एकूण सात षटकांत २३ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. रविचंद्रन अश्विन व वरुण अ‍ॅरोन यांनी प्रत्येकी २ बळी घेत श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादशचा डाव १२१ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने पहिल्या डावात २३० धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. त्याआधी, भारताने अजिंक्य रहाणेच्या (१०९) शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३५१ धावांची मजल मारली.फलंदाजांना सराव मिळावा यासाठी विराट कोहलीने फॉलोआॅन न देता रोहित शर्माच्या साथीने स्वत: डावाची सुरुवात केली, पण हे दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. भारताने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद ११२ धावांची मजल मारली. भारताकडे एकूण ३४२ धावांची आघाडी आहे. आजचा खेळ थांबविण्यात आला त्यावेळी के.एल. राहुल (४७) आणि चेतेश्वर पुजारा (३१) खेळपट्टीवर होते.या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८४ धावांची अभेद्य भागीदारी केली. कोहली पहिल्या डावात केवळ ८ धावा काढून बाद झाला होता. आज त्याने डावाची सुरुवात केली, पण ३४ चेंडूंना सामोरे जाताना केवळ १८ धावा काढून माघारी परतला. पहिल्या डावात ७ धावा काढणारा रोहित दुसऱ्या डावात ८ धावा काढून बाद झाला. फलंदाजीचा सराव करण्यासाठी यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली, पण त्याचा त्याला लाभ घेता आला नाही. साहा बाद झाला त्यावेळी भारताची ३ बाद २८ अशी अवस्था होती.त्यानंतर राहुल व पुजारा यांनी डाव सावरला. पुजारा सुरुवातीला चाडपडत खेळत होता. राहुलने मात्र संघव्यस्थापनला जर मुरली विजय फिट नसेल तर पहिल्या कसोटीसाठी त्याचे स्थान घेण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास दिला. भारताने सकाळी पहिला डाव ६ बाद ३१४ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. रहाणे फलंदाजीसाठी उतरला नाही. अश्विनने २३ तर हरभजनने १५ धावा फटकावल्या. मध्यमगती गोलंदाज रजिताने सकाळच्या सत्रात दोन्ही विकेट घेतल्या. रजिताने ६८ धावांच्या मोबदल्यात पाच फलंदाजांना माघारी परतवले. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंका एकादशच्या फलंदाजांवर ईशांतने वर्चस्व गाजवले. उपाहाराला खेळ थांबला त्यावेळी श्रीलंका अध्यक्ष एकादश संघाची ५ बाद ३५ अशी अवस्था होती. उपाहारानंतर वरुण अ‍ॅरोनने (२-४२) शेहान जयसूर्या (७) आणि मिलिंद श्रीवर्धने (३२) यांना लागोपाठच्या षटकांमध्ये माघारी परतवले. निरोसन डिकवाला (४१) आणि धुनष गुणतिलक (२८) यांनी आठव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करीत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. अश्विनने गुणतिलकला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर श्रीलंका एकादशचा डाव गुंडाळण्यासाठी अधिक वेळ लागला नाही. भारत पहिला डाव : लोकेश राहुल झे. गुणतिलका गो. निसाला थरका ४३, शिखर धवन झे. परेरा गो. कासुन रजिता ६२, रोहित शर्मा त्रि. गो. के. रजिता ०७, विराट कोहली झे. एम. श्रीवर्धने गो. रजिता ०८, अजिंक्य रहाणे (निवृत्त) १०९, चेतेश्वर पुजारा झे. एस. पथिराना गो. जे. वंडरसे ४२, वृद्धिमान साहा झे. थिरिमाने गो. वंडरसे ०३, रविचंद्रन अश्विन झे. थरंगा गो. रजिता २३, हरभजन सिंग त्रि. गो. गमागे १५, अमित मिश्रा झे. थिरिमाने गो. रजिता ००, भुवनेश्वर कुमार नाबाद ०९. अवांतर (३०). एकूण ८८.१ षटकांत सर्वबाद ३५१. श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादश :धनंजय डिसिल्वा त्रि. गो. ईशांत ००, कौशल सिल्वा पायचित गो. ईशांत ००, लाहिरू थिरिमाने झे. राहुल गो. ईशांत ०५, उपुल थरंगा पायचित गो. ईशांत ००, मिलिंद श्रीवर्धना झे. साहा गो. अ‍ॅरोन ३२, कौशल परेरा त्रि. गो. ईशांत ००, स्नेहन जयसूर्या झे. साहा गो. अ‍ॅरोन ०७, निरोशान डिकवाला त्रि. गो. अश्विन ४१, धनुष्का गुणतिलका झे. उमेश गो. अश्विन २८, निसला थराका पायचित गो. हरभजन ०२, के. रजिता नाबाद ००. अवांतर (६). एकूण ३१ षटकांत सर्वबाद १२१. भारत दुसरा डाव :रोहित शर्मा पायचित गो. फर्नांडो ०८, विराट कोहली झे. पथिरना गो. रजिता १८, वृद्धिमान साहा पायचित गो. फर्नांडो ०१, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ३१, लोकेश राहुल खेळत आहे ४७. अवांतर (७). एकूण ४० षटकांत ३ बाद ११२.(वृत्तसंस्था)