शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

युवा खेळाडूंसाठी आयपीएल दहावे पर्व ठरले चांगले व्यासपीठ

By admin | Updated: May 23, 2017 04:34 IST

गेल्या काही आठवड्यांमध्ये सतत प्रवास, हॉटेलच्या रूममध्ये ‘चेक इन व चेक आऊट’ करणे, उष्ण वातावरण आणि स्टेडियमच्या प्रवेशद्वारावरील प्रेक्षकांची गर्दी याला सामोरे जावे लागले

रवी शास्त्री लिहितात...गेल्या काही आठवड्यांमध्ये सतत प्रवास, हॉटेलच्या रूममध्ये ‘चेक इन व चेक आऊट’ करणे, उष्ण वातावरण आणि स्टेडियमच्या प्रवेशद्वारावरील प्रेक्षकांची गर्दी याला सामोरे जावे लागले असले तरी मला काहीच थकवा आलेला नाही. कारण यंदाचे आयपीएलचे पर्व युवा खेळाडूंसाठी मोठे व्यासपीठ ठरले आहे. रोमांचक अंतिम लढतीमुळे एका शानदार स्पर्धेची सांगता झाली. अनेक युवा खेळाडू या व्यासपीठामुळे पुढे आले आणि योग्य दिशेने मार्गस्थ झाले. भविष्यात काही खेळाडू निश्चितच पुढेही जातील, असा विश्वास आहे. यंदा अफगाणिस्तानच्या दोन खेळाडूंनी या स्पर्धेत छाप सोडली. जवळजवळ चार दशकांपासून युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जात असलेल्या देशात बंदुकीच्या फैरी व बॉम्ब यांच्या सान्निध्यात वाढलेल्या या खेळाडूंनी जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवले. राशिद व नबी आपल्या देशातील लोकांसाठी प्रेरणास्रोत बनले. सुनील नरेनने सलामीवीर म्हणून श्वास रोखण्यास भाग पाडले. सरळ बॅटने मारलेले त्याचे फटके, पुढे सरसावत त्याचे आक्रमक फटके प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे समीकरण बिघडविण्यास कारणीभूत ठरले. दुसऱ्या कुठल्या संघाने याचा विचार केला नाही, हे विशेष. उदाहरण द्यायचे झाल्यास नमन ओझाचे देता येईल. पारंपरिक फलंदाजीचे चांगले उदाहरण म्हणजे हाशिम आमला व केन विल्यम्सन यांच्या फलंदाजीमध्ये दिसले. त्यांनी टी-२० क्रिकेटमध्ये स्वत:चा जम बसविताना खोऱ्याने धावा वसूल केल्या. स्टीव्ह स्मिथ क्षेत्ररक्षकांचे कडे भेदण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसून आले. ख्रिस गेल व एबी डिव्हिलियर्स यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. एम. एस. धोनी व विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंना फॉर्मात बघण्याचे सुख आपल्याला अनुभवता आले नाही. युवराजबाबतही असेच म्हणता येईल. प्रदीर्घ कालावधीच्या सत्रात काही भारतीय खेळाडू अपेक्षांसह खेळताना दिसले. सात आठवड्यांच्या या स्पर्धेनंतर आयपीएलला जगातील सर्वोत्तम स्पोर्टिंग लीगपैकी एक का म्हटले, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. (टीसीएम)