शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातून आयपीएल आऊट

By admin | Updated: April 28, 2016 04:47 IST

(आयपीएल) क्रिकेट सामने खेळविण्यापेक्षा, हे अन्यत्र खेळविणेच चांगले होईल, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर शिक्कामोर्तब केले.

नवी दिल्ली : तीव्र पाणीटंचाई आणि भीषण दुष्काळ असलेल्या महाराष्ट्रात, कडक निर्बंध घालून, भारतीय प्रीमियर लीगचे (आयपीएल) क्रिकेट सामने खेळविण्यापेक्षा, हे अन्यत्र खेळविणेच चांगले होईल, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यातील सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर शिक्कामोर्तब केले.‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या स्वयंसेवी संघटनेने केलेल्या रिट याचिकेवर उच्च न्यायालयाने ३० एप्रिलनंतरचे ‘आयपीएल’चे सामने महाराष्ट्राच्या बाहेर खेळविण्याचा आदेश दिला होता. मात्र, लगेच दुसऱ्या दिवशी न्यायालयाने या आदेशात सुधारणा करून १ मेचा सामना पुण्यात घेण्यास अनुमती दिली होती व त्यानंतरचे सामने महाराष्ट्राबाहेर नेण्यास सांगितले होते. याविरुद्ध मुंबई क्रिकेट संघटना व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने केलेली विशेष अनुमती याचिका सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर, न्या. आर. भानुमती व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठापुढे आली, तेव्हा दोन्ही याचिकाकर्त्यांच्या वतीने पी. चिदंबरम व अभिषेक मनु सिंघवी या ज्येष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती देण्याचा आग्रह धरला. सुरुवातीस पाण्याच्या वापरावर कडक निर्बंध घालून हे सामने राज्यात खेळू देण्यावर विचार करण्यास खंडपीठ अनुकूल असल्याचे दिसले, परंतु नंतर एकूण परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने दुष्काळी महाराष्ट्रात हे सामने न खेळवलेलेच अधिक चांगले, असे सांगून दोन्ही क्रिकेट संघटनांचे अपील फेटाळून लावले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>निर्बंधांपेक्षा प्रतिबंधच बराच्महाराष्ट्रात दुष्काळ असताना या सामन्यांसाठी खेळपट्ट्या व मैदाने तयार करण्यासाठी ६० लाख लीटर पाणी वापरले जाणार आहे, हे मूळ याचिकाकर्त्यांचे म्हणणे खरे आहे का, असे न्यायमूर्तींनी विचारले. यावर चिदंबरम यांनी सांगितले की, ‘दिवसाला १० हजार लीटर याप्रमाणे सहा दिवसांत ६० हजार लीटर पाणी मैदानांसाठी वापरले जाईल. च्शिवाय हे पिण्याचे पाणी नसेल, तर प्रक्रिया केलेले सांडपाणी असेल. ते टँकरने मैदानात आणले जाईल.’ हे ऐकून न्यायमूर्ती म्हणाले की, ‘तसे असेल तर आम्ही स्टेडियमचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यास महापालिकांना सांगू व थेंबभरही पिण्याचे पाणी वापरले जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने लक्ष ठेवण्यास स्थानिक न्यायाधीशांना सांगू.’