शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातून आयपीएल आऊट

By admin | Updated: April 28, 2016 04:47 IST

(आयपीएल) क्रिकेट सामने खेळविण्यापेक्षा, हे अन्यत्र खेळविणेच चांगले होईल, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर शिक्कामोर्तब केले.

नवी दिल्ली : तीव्र पाणीटंचाई आणि भीषण दुष्काळ असलेल्या महाराष्ट्रात, कडक निर्बंध घालून, भारतीय प्रीमियर लीगचे (आयपीएल) क्रिकेट सामने खेळविण्यापेक्षा, हे अन्यत्र खेळविणेच चांगले होईल, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यातील सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर शिक्कामोर्तब केले.‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या स्वयंसेवी संघटनेने केलेल्या रिट याचिकेवर उच्च न्यायालयाने ३० एप्रिलनंतरचे ‘आयपीएल’चे सामने महाराष्ट्राच्या बाहेर खेळविण्याचा आदेश दिला होता. मात्र, लगेच दुसऱ्या दिवशी न्यायालयाने या आदेशात सुधारणा करून १ मेचा सामना पुण्यात घेण्यास अनुमती दिली होती व त्यानंतरचे सामने महाराष्ट्राबाहेर नेण्यास सांगितले होते. याविरुद्ध मुंबई क्रिकेट संघटना व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने केलेली विशेष अनुमती याचिका सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर, न्या. आर. भानुमती व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठापुढे आली, तेव्हा दोन्ही याचिकाकर्त्यांच्या वतीने पी. चिदंबरम व अभिषेक मनु सिंघवी या ज्येष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती देण्याचा आग्रह धरला. सुरुवातीस पाण्याच्या वापरावर कडक निर्बंध घालून हे सामने राज्यात खेळू देण्यावर विचार करण्यास खंडपीठ अनुकूल असल्याचे दिसले, परंतु नंतर एकूण परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने दुष्काळी महाराष्ट्रात हे सामने न खेळवलेलेच अधिक चांगले, असे सांगून दोन्ही क्रिकेट संघटनांचे अपील फेटाळून लावले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>निर्बंधांपेक्षा प्रतिबंधच बराच्महाराष्ट्रात दुष्काळ असताना या सामन्यांसाठी खेळपट्ट्या व मैदाने तयार करण्यासाठी ६० लाख लीटर पाणी वापरले जाणार आहे, हे मूळ याचिकाकर्त्यांचे म्हणणे खरे आहे का, असे न्यायमूर्तींनी विचारले. यावर चिदंबरम यांनी सांगितले की, ‘दिवसाला १० हजार लीटर याप्रमाणे सहा दिवसांत ६० हजार लीटर पाणी मैदानांसाठी वापरले जाईल. च्शिवाय हे पिण्याचे पाणी नसेल, तर प्रक्रिया केलेले सांडपाणी असेल. ते टँकरने मैदानात आणले जाईल.’ हे ऐकून न्यायमूर्ती म्हणाले की, ‘तसे असेल तर आम्ही स्टेडियमचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यास महापालिकांना सांगू व थेंबभरही पिण्याचे पाणी वापरले जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने लक्ष ठेवण्यास स्थानिक न्यायाधीशांना सांगू.’