शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

रिओ आॅलिम्पिकच्या खराब कामगिरीची चौकशी सुरू

By admin | Updated: September 9, 2016 00:12 IST

क्रीडा मंत्रालयाने रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीची ‘संपूर्ण समीक्षा’ सुरू केली

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीची ‘संपूर्ण समीक्षा’ सुरू केली असून, त्यांनी या खेळाच्या महाकुंभात सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून त्यांची प्रतिक्रिया आणि सूचनाही मागितल्या आहेत.गेल्या महिन्यात दोन आठवडे चालणाऱ्या या महाकुंभात भारताची कामगिरी निराशाजनक ठरली होती. भारतातर्फे फक्त पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये रौप्य आणि साक्षी मलिकने कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. क्रीडा मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात म्हटले, की क्रीडामंत्री विजय गोयल यांनी क्रीडा मंत्रालयांतर्गत भारताच्या रिओ आॅलिम्पिक २०१६ मधील कामगिरीची संपूर्ण समीक्षा करण्याचा निर्णय घेतला. क्रीडामंत्र्यांनी रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वैयक्तिकपणे पत्र लिहिले असून, त्यांच्याकडून प्रतिक्रिया आणि सूचना मागितल्या आहेत. खेळाडू कधीही वैयक्तिक अथवा मेलद्वारे आपल्या सूचना अथवा प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात, असेही त्यांनी कळवले आहे. या पत्रात क्रीडामंत्र्यांनी कामगिरी सुधारण्यावर भर दिला आहे. ज्यामुळे जागतिक पातळीवर खेळाडूंचा एक गट बनवला जाऊ शकेल आणि मूलभूत सुविधांना आणखी मजबूत केल्या जाऊ शकतील. रिओ आॅलिम्पिकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी आगामी तीन आॅलिम्पिक लक्षात घेऊन एक ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याची घोषणादेखील केली होती.गोयल यांच्या विभागाने निवेदनात लिहिले, ‘मंत्रालयाने भारतीय आॅलिम्पिक संघटनेलादेखील रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या कामगिरीच्या प्रतिक्रिया आणि भविष्यात कामगिरी उंचावण्यासाठी पावले उचलण्याविषयी माहिती देण्यास कळवले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया राष्ट्रीय क्रीडा महासंघाकडूनही मागविण्यात येणार आहेत. क्रीडामंत्री याविषयी आयओए आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाशी विस्तृत चर्चेसाठी बैठकही बोलावणार आहेत.’चौकशीसाठी मंत्रालयाचे काही अधिकारी साईच्या काही केंद्रांचा दौरादेखील करणार आहेत. ‘मंत्री काही अ‍ॅकॅडमी आणि साई केंद्राचादेखील दौरा करणार आहेत. ज्यामुळे खेळाडूंना ट्रेनिंगसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्यांच्या कामगिरीतील सुधारणेची माहिती मिळू शकेल. या महिन्याच्या १७ तारखेला ते हैदराबाद येथे गोपीचंद बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीचा दौरा करणार आहेत. जेथे ते खेळाडू, प्रशिक्षक आणि अन्य स्टाफशी चर्चा करतील. ते हैदराबाद येथील ‘साई’ केंद्राचादेखील दौरा करणार आहेत.’