शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

भारत-पाक लढत ईडनवर

By admin | Updated: March 10, 2016 03:30 IST

टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान ही ‘हायव्होल्टेज’ लढत आता धरमशालाऐवजी कोलकाता येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी सर्व तर्कविर्तकांना पूर्णविराम देत सामना हलविण्याची घोषणा केली

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान ही ‘हायव्होल्टेज’ लढत आता धरमशालाऐवजी कोलकाता येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी सर्व तर्कविर्तकांना पूर्णविराम देत सामना हलविण्याची घोषणा केली. हा सामना दि. १९ मार्च रोजी ईडन गार्डनवर खेळविला जाईल.आयसीसी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले की, सामना ठरलेल्या दिवशीच कोलकाता येथे होईल. सामन्याच्या आयोजनावरून राजकीय वातावरण तापल्यामुळे वाद उद्भवला होता. माजी सैनिकांनी सामन्याच्या आयोजनास तीव्र विरोध दर्शविताच हिमाचल सरकारनेदेखील सामन्याला सुरक्षा पुरविण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर पाक सरकारने भारतात संघ पाठविणे लांबणीवर टाकले. शिवाय, सामन्याचे स्थळ बदलविण्याचा आयसीसीकडे आग्रह धरला होता. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार पाक संघ बुधवारी भारतात दाखल होणार होता.पाकच्या सुरक्षा पथकाने धरमशाला येथील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सामना हलविण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. सुरक्षेच्या कारणांमुळे हा सामना कोलकाता येथे हलविण्यात येत असल्याचे सांगून रिचर्डसन पुढे म्हणाले, ‘‘हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांच्या वक्तव्यानंतर परिस्थिती चिघळली. सामन्यादरम्यान निदर्शने होण्याचे आणि व्यत्यय येण्याचे संकेत मिळाल्याने आमच्या चिंतेत भर पडली होती. सामना हलविण्याच्या निर्णयाने चाहत्यांची घोर निराशा होईल, याची आम्हाला जाणीव आहे; पण सुरक्षेचा मुद्दा सर्वाेपरी असल्याने अन्य पर्याय नव्हता.’’ पीसीबीनेदेखील मंगळवारी आयसीसीला पत्र लिहून सामन्याचे पर्यायी स्थळ कोलकाता अथवा मोहाली असावे, असे सुचविले होते. आम्ही हा सामना कोलकाता येथे घेणार असल्याची सूचना पीसीबीला दिली आहे. पीसीबी ही माहिती पाक सरकारला कळविणार आहे. भारतात पाहुण्या संघांना सुरक्षा देणे ही सर्वच राज्य शासनांची जबाबदारी आहे. सर्वच राज्य सरकारांनी तसे आश्वासन दिले असल्याचे रिचर्डसन यांनी स्पष्ट केले.या निर्णयानंतर बीसीसीआय किंवा एचपीसीएला दंडात्मक शिक्षा दिली जाईल का, असा सवाल करताच रिचर्डसन यांनी ‘नो’ असे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘भारत मोठे आणि किचकट राष्ट्र आहे. प्रत्येक आयसीसी स्पर्धेदरम्यान संकटे येतात. कोलकाता येथे सामना आयोजित करण्याचा निर्णय सर्वोत्कृष्ट आहे. चिंता आधी व्यक्त केली असती, तर आयोजनाला पुरेसा वेळ मिळू शकला असता. आठ ठिकाणी ५९ सामने आयोजित करायचे आहेत. त्यात महिला विश्वचषकाचाही समावेश आहे. कुठल्याही राज्य संघटनेविरुद्ध शिस्तभंगाची करवाई करणे अतिघाईचे ठरेल. सामना झालाच नसता, तर कारवाईचा विचार होऊ शकला असता.’’ (वृत्तसंस्था)> धरमशाला वादासाठी वीरभद्रसिंह जबाबदार : ठाकूरनवी दिल्ली : भारत-पाकदरम्यान १९ मार्च रोजी धरमशाला येथे आयोजित विश्वचषक टी-२० सामन्याचा वाद चिघळविण्यास आणि शंकास्पद वातावरण निर्माण करण्यास हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह हेच दोषी असल्याचा आरोप बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी केला आहे.पाक बोर्डाने सुरक्षेचे कारण पुढे करीत संघ भारतात पाठविणे लांबणीवर टाकल्यानंतर ठाकूर म्हणाले, ‘या स्थितीस हिमाचल सरकार कारणीभूत आहे. पीसीबीने आता सामना अन्य कुठल्या तरी ठिकाणी हलविण्याची मागणी पुढे केली आहे.’ हिमाचलमधून भाजप खा. असलेले ठाकूर म्हणाले, ‘न्यायालयाच्या निर्देशानंतरही राज्यातील परिस्थिती चांगली नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हेतूवर मला शंका येते. सामन्याच्या नऊ दिवस आधी तुम्ही सामना होऊ शकत नाही, असे बोलत आहात. कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री असे बेजबाबदार वक्तव्य करणार नाही.’सामन्याचे स्थळ बदलण्याविषयी विचारताच खा. ठाकूर म्हणाले, ‘पाक आणि आयसीसी स्थितीचे आकलन करतील. मी हेच सांगेन की, हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी जगाला चुकीचे संकेत दिले. विश्वचषकाच्या नऊ दिवसांआधी असे वक्तव्य टाळता आले असते. यामुळे राज्याची आणि देशाची प्रतिमा खालावते.’