शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मौका साधलाच, भारताचा आफ्रिकेवर दणदणीत विजय

By admin | Updated: February 22, 2015 18:40 IST

गोलंदाजांचा अचूक मारा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे वर्ल्डकपमध्ये भारताने अखेर दक्षिण आफ्रिकेचा १३० धावांनी पराभव केला.

ऑनलाइन लोकमत 
मेलबर्न, दि. २२ -  गोलंदाजांचा अचूक मारा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचे ३०८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेचा डाव १७७  धावांमध्येच संपुष्टात आला. 
रविवारी वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हे संघ आमने सामने होते. भारताने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. क्विंटन डी कॉक आणि हाशीम आमला हे सलामीवीर ४० धावांमध्येच तंबूत परतले. फाफ डू प्लेसिस ५५ धावा आणि कर्णधार ए.बी. डिव्हिलियर्सने ३० धावांची खेळी करत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र डिव्हिलियर्स धावबाद झाला. त्यावेळी आफ्रिकेची स्थिती ३ बाद १०८ अशी होती. त्यानंतर एकही फलंदाज फार काळ तग धरु शकला नाही व आफ्रिकेचा डाव १७७ धावांमध्येच संपुष्टात आला. भारतातर्फे आर. अश्विनने ३, मोहित शर्मा व मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन तर रविंद्र जडेजाने एक विकेट घेतली. 
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवनची १३७ धावांची दमदार खेळी, अजिंक्य रहाणेच्या तडाखेबाज ७९ धावा आणि विराट कोहलीची ४६ धावांची खेळी या आधारे भारताने ५० षटकांत ७ गडी गमावत ३०७ धावा केल्या. सुरेश रैना, रोहित शर्मा, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा हे अपयशी ठरल्याने भारताचा डाव ३०७ धावांवर रोखण्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आले. आफ्रिकतर्फे मॉर्ने मॉर्कलने दोन तर इम्रान ताहीर, वॅन पार्नेल व डेल स्टेनने प्रत्येकी एक विकेट घेतली.  सामन्यात शतक ठोकणा-या शिखर धवनला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. 
विश्वचषकात भारत आणि आफ्रिकेविरोधात तीन वेळा आमने सामने आले होते. यातील तिन्ही सामन्यात आफ्रिकेचा विजय झाला होता. रविवारी भारताने आफ्रिकेची विजयी मालिका खंडीत केली.