शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

भारताची भिस्त फलंदाजांवर

By admin | Updated: August 15, 2014 00:27 IST

विराट कोहलीने सलग दुसऱ्या दिवशीही सरावामध्ये घाम गाळला. प्रशिक्षक डंकन फ्लेचरही यावेळी त्याला मार्गदर्शन करीत असल्याचे चित्र दिसले

लंडन : विराट कोहलीने सलग दुसऱ्या दिवशीही सरावामध्ये घाम गाळला. प्रशिक्षक डंकन फ्लेचरही यावेळी त्याला मार्गदर्शन करीत असल्याचे चित्र दिसले. उजव्या यष्टिबाहेरचे चेंडू खेळण्याचा कोहलीने कसून सराव करीत शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. गत दोन कसोटी सामन्यांचा अनुभव लक्षात घेता उजव्या यष्टिबाहेरचा चेंडूवरचा फटका खेळण्याचा मोह भारतीय संघासाठी आत्मघातकी ठरला आहे. जेम्स अ‍ॅन्डरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांनी भारतीय फलंदाजांच्या स्विंग व सीम मारा खेळण्याचा उणिवा स्पष्ट केल्या. मॅन्चेस्टरमध्ये भारताचे दोन्ही डाव ९० षटकांत आटोपले. यावरुन भारतीय संघ एकाच दिवशी दोनदा बाद झाल्याचे स्पष्ट झाले. मालिकेत २-१ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला शुक्रवारपासून प्रारंभ होणाऱ्या पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. भारताच्या प्रत्येक फलंदाजाने इंग्लंडच्या माऱ्याला यशस्वपणे तोंड देण्याचे धैर्य दाखविले तर भारताला अनुकुल निकाल मिळविता येईल. मुरली विजय व गौतम गंभीर यांच्यावर संघाला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी आहे. गेल्या आठ कसोटी सामन्यांत भारताला एकदाही अर्धशतकी सलामी मिळाली नाही. त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. विजयने या मालिकेत सुरुवातीपासून खेळपट्टीवर तळ ठोकण्याची तयारी दर्शविली आहे. अनुभवी गंभीरने जर लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल.भारताची आघाडीची फळी अपयशी ठरत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मधल्या फळीतील व तळाच्या फलंदाजांच्या साथीने डाव सावरण्याचे धैर्य दाखविले आहे. भारताने या कसोटी सामन्यात पाच गोलंदाजांना खेळविण्याचा निर्णय घेतला तर आर. अश्विन व भुवनेश्वर कुमार यांच्याकडून फलंदाजीतही उपयुक्त योगदान मिळेल, अशी आशा आहे. सन्माजनक धावसंख्येची मजल मारल्यानंतर गोलंदाजांना त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. लॉर्डस्वर कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना ७४ धावांच्या मोबदल्यात ७ बळी घेण्याची कामगिरी करणाऱ्या ईशांत शर्माच्या पुनरागमनामुळे संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. त्याला भुवनेश्वर कुमारची योग्य साथ लाभेल अशी आशा आहे. त्याच्या जोडीला वरुण अ‍ॅरोनसारख्या वेगवान गोलंदाजाला इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची संधी राहिल. ओव्हलच्या खेळपट्टीवर अखेरच्या दोन दिवसांमध्ये फिरकीपटूंची कामगिरी महत्त्वाची ठरण्याची शक्यता लक्षात घेता अश्विनला छाप सोडण्याची संधी आहे.