शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

भारताची सुवर्ण झळाळी

By admin | Updated: July 22, 2016 05:30 IST

आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची भारताची सर्वाधिक आशा नेमबाजीमध्ये आहे.

आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची भारताची सर्वाधिक आशा नेमबाजीमध्ये आहे. २००८ साली ड्रॅगनच्या देशांत झालेल्या आॅलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने चिनी खेळाडू झु चिआनला मागे टाकून इतिहास घडवत भारताला पहिल्यांदाच आॅलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवून दिले. या एका सुवर्ण यशानंतर भारतातील नेमबाजी खेळाला वेगळेच वळण लागले. युवा खेळाडू मोठ्या संख्येने नेमबाजीकडे वळाल्याने भारतात या खेळाने चांगलाच जोर धरला.नेमबाजीच्या इतिहासातले पहिले आणि मानाचे पान लिहिले ते राजवर्धनसिंह राठोड यांनी. त्यांनी २००४ च्या अथेन्स स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळवून दिले होते. डबल ट्रॅप प्रकारांत नेमबाजीत कर्नल राठोड यांचा दबदबा काही औरच होता. आपल्या कौशल्याचा प्रयत्य त्यांनी दाखवला आणि १९६० च्या पॅरिस स्पर्धेनंतर म्हणजेच तब्बल ४४ वर्षांनी भारताला आॅलिम्पिक रौप्यपदक मिळवून दिले. राठोड यांनी अंतिम फेरीत ५० पैकी ४४ गुण मिळवत इतिहास लिहिला. भारताने आॅलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात २६ पदक मिळवली आहेत. त्यापैकी ४ पदक नेमबाजीने मिळवून दिली असून यामध्ये एक सुवर्ण, एक कांस्य आणि दोन रौप्यपदके आहेत.२००८ साली अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्ण पटकावल्यानंतर २०१२ लंडन आॅलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी पदकाची कमाई केली. नारंगने १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य, तर विजय कुमार याने २५ मीटर पिस्टल रॅपिड फायर प्रकारात रौप्यपदक पटकावले. गगनने २०१२ च्या लंडन स्पर्धेत ७०१.१ गुणांची कमाई करत कांस्यपदक पटकावले, तर रोमानियाच्या मॉल्डेवेन्यु एलिन जॉर्ज याने ७०२.१ गुणांसह सुवर्ण पटकावले. या दोन्ही खेळाडूंच्या गुणांमध्ये फारसे अंतर नव्हते. त्याचवेळी, सैन्यदलाचा खेळाडू असलेल्या विजयकुमार याने ६०० पैकी ५८५ गुणांची कमाई केली. त्याने ४० पैकी ३० निशाणे साधत पदक पटकावले. तर, सुवर्ण विजेत्या क्युबाच्या खेळाडूने ३४ निशाणे साधले. राजवर्धनसिंह राठोड नंतर आॅलिम्पिक पदक पटकावणारा विजय कुमार हा सैन्यदलाचा दुसरा नेमबाज ठरला. आता, रिओ स्पर्धेत भारतीय संघ एकूण १२ पदके मिळवू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात नेमबाजांचाही मोठा वाटा असेल. भारतीय संघात पदकाच्या सर्वाधिक आशा ‘गोल्डन बॉय’ अभिनव बिंद्राकडून आहेत. तसेच. कांस्यपदक विजेता गगन नारंग, हिना सिद्धु, जितू राय यांच्याकडूनही उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. - आकाश नेवे, जळगाव>इतिहासाची पाने उलगडताना1951 साली नॅशनल रायफल असोसिएशनची स्थापना, डॉ. जी.व्ही. मालवणकर पहिले अध्यक्ष1952 हेलसिंकी (फिनलॅण्ड) स्पर्धेत डॉ. हरिहर बॅनर्जी यांनी रायफल ३ पोझिशनन आणि प्रोन पोझिशन प्रकारात सहभाग नोंदवून आॅलिम्पिकमधील पहिला भारतीय खेळाडू म्हणून नाव कोरले1995साली पहिल्यांदाच सायप्रसमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा सहभागभारतीय संघ : जितू राय, अपूर्वी चंदेला, गगन नारंग, अभिनव बिंद्रा, गुरप्रीत सिंग, प्रकाश नंजप्पा, चैन सिंह, मिराज अहमद खान, हिना सिध्दू, कियान चेनई, अयोनिका पॉल, मानवजीतसिंग संधू.१९५२ हेलसिंकी आॅलिम्पिक स्पर्धाडॉ. हरिहर बॅनर्जी यांच्या रूपाने स्वतंत्र भारताचा पहिला नेमबाज म्हणून आॅलिम्पिकमध्ये सहभागी झाला. अवघ्या एक वर्षापूर्वी अस्तिवात आलेली रायफल शूटिंग असोसिएशन आणि परिस्थितीशी लढून डॉ. बॅनर्जी या स्पर्धेत सहभागी झाले. मात्र, याच खेळात आॅलिम्पिक सुवर्णपदक मिळण्यासाठी तब्बल २००८ सालपर्यंत वाट पहावी लागली.>बीजिंग आॅलिम्पिकया आॅलिम्पिकने भारतात ऐतिहासिक विक्रम घडला. हॉकीव्यतिरीक्त भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले होते. अभिनव बिंद्राचा १०.८ चा परफेक्ट शॉट आणि १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या या शिलेदाराने जगभरातील अनेक नामवंत खेळाडूंना मागे टाकत सुवर्णपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे, १९८०च्या मॉस्को आॅलिम्पिकनंतर भारताला पहिल्यांदाच सुवर्ण झळाळी लाभली. तसेच हे भारताचे पहिलेच वैयक्तिक आॅलिम्पिक सुवर्णपदक ठरले.