शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
5
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
6
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
7
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
8
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
9
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
10
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
11
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
12
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
13
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
14
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
15
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
16
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
17
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
18
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
19
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
20
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?

भारताची सुवर्ण झळाळी

By admin | Updated: July 22, 2016 05:30 IST

आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची भारताची सर्वाधिक आशा नेमबाजीमध्ये आहे.

आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची भारताची सर्वाधिक आशा नेमबाजीमध्ये आहे. २००८ साली ड्रॅगनच्या देशांत झालेल्या आॅलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने चिनी खेळाडू झु चिआनला मागे टाकून इतिहास घडवत भारताला पहिल्यांदाच आॅलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवून दिले. या एका सुवर्ण यशानंतर भारतातील नेमबाजी खेळाला वेगळेच वळण लागले. युवा खेळाडू मोठ्या संख्येने नेमबाजीकडे वळाल्याने भारतात या खेळाने चांगलाच जोर धरला.नेमबाजीच्या इतिहासातले पहिले आणि मानाचे पान लिहिले ते राजवर्धनसिंह राठोड यांनी. त्यांनी २००४ च्या अथेन्स स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळवून दिले होते. डबल ट्रॅप प्रकारांत नेमबाजीत कर्नल राठोड यांचा दबदबा काही औरच होता. आपल्या कौशल्याचा प्रयत्य त्यांनी दाखवला आणि १९६० च्या पॅरिस स्पर्धेनंतर म्हणजेच तब्बल ४४ वर्षांनी भारताला आॅलिम्पिक रौप्यपदक मिळवून दिले. राठोड यांनी अंतिम फेरीत ५० पैकी ४४ गुण मिळवत इतिहास लिहिला. भारताने आॅलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात २६ पदक मिळवली आहेत. त्यापैकी ४ पदक नेमबाजीने मिळवून दिली असून यामध्ये एक सुवर्ण, एक कांस्य आणि दोन रौप्यपदके आहेत.२००८ साली अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्ण पटकावल्यानंतर २०१२ लंडन आॅलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी पदकाची कमाई केली. नारंगने १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य, तर विजय कुमार याने २५ मीटर पिस्टल रॅपिड फायर प्रकारात रौप्यपदक पटकावले. गगनने २०१२ च्या लंडन स्पर्धेत ७०१.१ गुणांची कमाई करत कांस्यपदक पटकावले, तर रोमानियाच्या मॉल्डेवेन्यु एलिन जॉर्ज याने ७०२.१ गुणांसह सुवर्ण पटकावले. या दोन्ही खेळाडूंच्या गुणांमध्ये फारसे अंतर नव्हते. त्याचवेळी, सैन्यदलाचा खेळाडू असलेल्या विजयकुमार याने ६०० पैकी ५८५ गुणांची कमाई केली. त्याने ४० पैकी ३० निशाणे साधत पदक पटकावले. तर, सुवर्ण विजेत्या क्युबाच्या खेळाडूने ३४ निशाणे साधले. राजवर्धनसिंह राठोड नंतर आॅलिम्पिक पदक पटकावणारा विजय कुमार हा सैन्यदलाचा दुसरा नेमबाज ठरला. आता, रिओ स्पर्धेत भारतीय संघ एकूण १२ पदके मिळवू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात नेमबाजांचाही मोठा वाटा असेल. भारतीय संघात पदकाच्या सर्वाधिक आशा ‘गोल्डन बॉय’ अभिनव बिंद्राकडून आहेत. तसेच. कांस्यपदक विजेता गगन नारंग, हिना सिद्धु, जितू राय यांच्याकडूनही उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. - आकाश नेवे, जळगाव>इतिहासाची पाने उलगडताना1951 साली नॅशनल रायफल असोसिएशनची स्थापना, डॉ. जी.व्ही. मालवणकर पहिले अध्यक्ष1952 हेलसिंकी (फिनलॅण्ड) स्पर्धेत डॉ. हरिहर बॅनर्जी यांनी रायफल ३ पोझिशनन आणि प्रोन पोझिशन प्रकारात सहभाग नोंदवून आॅलिम्पिकमधील पहिला भारतीय खेळाडू म्हणून नाव कोरले1995साली पहिल्यांदाच सायप्रसमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा सहभागभारतीय संघ : जितू राय, अपूर्वी चंदेला, गगन नारंग, अभिनव बिंद्रा, गुरप्रीत सिंग, प्रकाश नंजप्पा, चैन सिंह, मिराज अहमद खान, हिना सिध्दू, कियान चेनई, अयोनिका पॉल, मानवजीतसिंग संधू.१९५२ हेलसिंकी आॅलिम्पिक स्पर्धाडॉ. हरिहर बॅनर्जी यांच्या रूपाने स्वतंत्र भारताचा पहिला नेमबाज म्हणून आॅलिम्पिकमध्ये सहभागी झाला. अवघ्या एक वर्षापूर्वी अस्तिवात आलेली रायफल शूटिंग असोसिएशन आणि परिस्थितीशी लढून डॉ. बॅनर्जी या स्पर्धेत सहभागी झाले. मात्र, याच खेळात आॅलिम्पिक सुवर्णपदक मिळण्यासाठी तब्बल २००८ सालपर्यंत वाट पहावी लागली.>बीजिंग आॅलिम्पिकया आॅलिम्पिकने भारतात ऐतिहासिक विक्रम घडला. हॉकीव्यतिरीक्त भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले होते. अभिनव बिंद्राचा १०.८ चा परफेक्ट शॉट आणि १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या या शिलेदाराने जगभरातील अनेक नामवंत खेळाडूंना मागे टाकत सुवर्णपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे, १९८०च्या मॉस्को आॅलिम्पिकनंतर भारताला पहिल्यांदाच सुवर्ण झळाळी लाभली. तसेच हे भारताचे पहिलेच वैयक्तिक आॅलिम्पिक सुवर्णपदक ठरले.