शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारताची सुवर्ण झळाळी

By admin | Updated: July 22, 2016 05:30 IST

आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची भारताची सर्वाधिक आशा नेमबाजीमध्ये आहे.

आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची भारताची सर्वाधिक आशा नेमबाजीमध्ये आहे. २००८ साली ड्रॅगनच्या देशांत झालेल्या आॅलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने चिनी खेळाडू झु चिआनला मागे टाकून इतिहास घडवत भारताला पहिल्यांदाच आॅलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवून दिले. या एका सुवर्ण यशानंतर भारतातील नेमबाजी खेळाला वेगळेच वळण लागले. युवा खेळाडू मोठ्या संख्येने नेमबाजीकडे वळाल्याने भारतात या खेळाने चांगलाच जोर धरला.नेमबाजीच्या इतिहासातले पहिले आणि मानाचे पान लिहिले ते राजवर्धनसिंह राठोड यांनी. त्यांनी २००४ च्या अथेन्स स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळवून दिले होते. डबल ट्रॅप प्रकारांत नेमबाजीत कर्नल राठोड यांचा दबदबा काही औरच होता. आपल्या कौशल्याचा प्रयत्य त्यांनी दाखवला आणि १९६० च्या पॅरिस स्पर्धेनंतर म्हणजेच तब्बल ४४ वर्षांनी भारताला आॅलिम्पिक रौप्यपदक मिळवून दिले. राठोड यांनी अंतिम फेरीत ५० पैकी ४४ गुण मिळवत इतिहास लिहिला. भारताने आॅलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात २६ पदक मिळवली आहेत. त्यापैकी ४ पदक नेमबाजीने मिळवून दिली असून यामध्ये एक सुवर्ण, एक कांस्य आणि दोन रौप्यपदके आहेत.२००८ साली अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्ण पटकावल्यानंतर २०१२ लंडन आॅलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी पदकाची कमाई केली. नारंगने १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य, तर विजय कुमार याने २५ मीटर पिस्टल रॅपिड फायर प्रकारात रौप्यपदक पटकावले. गगनने २०१२ च्या लंडन स्पर्धेत ७०१.१ गुणांची कमाई करत कांस्यपदक पटकावले, तर रोमानियाच्या मॉल्डेवेन्यु एलिन जॉर्ज याने ७०२.१ गुणांसह सुवर्ण पटकावले. या दोन्ही खेळाडूंच्या गुणांमध्ये फारसे अंतर नव्हते. त्याचवेळी, सैन्यदलाचा खेळाडू असलेल्या विजयकुमार याने ६०० पैकी ५८५ गुणांची कमाई केली. त्याने ४० पैकी ३० निशाणे साधत पदक पटकावले. तर, सुवर्ण विजेत्या क्युबाच्या खेळाडूने ३४ निशाणे साधले. राजवर्धनसिंह राठोड नंतर आॅलिम्पिक पदक पटकावणारा विजय कुमार हा सैन्यदलाचा दुसरा नेमबाज ठरला. आता, रिओ स्पर्धेत भारतीय संघ एकूण १२ पदके मिळवू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात नेमबाजांचाही मोठा वाटा असेल. भारतीय संघात पदकाच्या सर्वाधिक आशा ‘गोल्डन बॉय’ अभिनव बिंद्राकडून आहेत. तसेच. कांस्यपदक विजेता गगन नारंग, हिना सिद्धु, जितू राय यांच्याकडूनही उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. - आकाश नेवे, जळगाव>इतिहासाची पाने उलगडताना1951 साली नॅशनल रायफल असोसिएशनची स्थापना, डॉ. जी.व्ही. मालवणकर पहिले अध्यक्ष1952 हेलसिंकी (फिनलॅण्ड) स्पर्धेत डॉ. हरिहर बॅनर्जी यांनी रायफल ३ पोझिशनन आणि प्रोन पोझिशन प्रकारात सहभाग नोंदवून आॅलिम्पिकमधील पहिला भारतीय खेळाडू म्हणून नाव कोरले1995साली पहिल्यांदाच सायप्रसमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा सहभागभारतीय संघ : जितू राय, अपूर्वी चंदेला, गगन नारंग, अभिनव बिंद्रा, गुरप्रीत सिंग, प्रकाश नंजप्पा, चैन सिंह, मिराज अहमद खान, हिना सिध्दू, कियान चेनई, अयोनिका पॉल, मानवजीतसिंग संधू.१९५२ हेलसिंकी आॅलिम्पिक स्पर्धाडॉ. हरिहर बॅनर्जी यांच्या रूपाने स्वतंत्र भारताचा पहिला नेमबाज म्हणून आॅलिम्पिकमध्ये सहभागी झाला. अवघ्या एक वर्षापूर्वी अस्तिवात आलेली रायफल शूटिंग असोसिएशन आणि परिस्थितीशी लढून डॉ. बॅनर्जी या स्पर्धेत सहभागी झाले. मात्र, याच खेळात आॅलिम्पिक सुवर्णपदक मिळण्यासाठी तब्बल २००८ सालपर्यंत वाट पहावी लागली.>बीजिंग आॅलिम्पिकया आॅलिम्पिकने भारतात ऐतिहासिक विक्रम घडला. हॉकीव्यतिरीक्त भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले होते. अभिनव बिंद्राचा १०.८ चा परफेक्ट शॉट आणि १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या या शिलेदाराने जगभरातील अनेक नामवंत खेळाडूंना मागे टाकत सुवर्णपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे, १९८०च्या मॉस्को आॅलिम्पिकनंतर भारताला पहिल्यांदाच सुवर्ण झळाळी लाभली. तसेच हे भारताचे पहिलेच वैयक्तिक आॅलिम्पिक सुवर्णपदक ठरले.