शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

रहाणेसारखा ‘संयमी’ कर्णधार हे टीम इंडियाचे नशीब : चॅपेल

By admin | Updated: March 30, 2017 01:26 IST

‘अजिंक्य रहाणेसारखा संयमी वृत्तीचा कर्णधार उपलब्ध असणे हे टीम इंडियाचे नशीब म्हणावे लागेल. रहाणे स्वत:च्या

नवी दिल्ली : ‘अजिंक्य रहाणेसारखा संयमी वृत्तीचा कर्णधार उपलब्ध असणे हे टीम इंडियाचे नशीब म्हणावे लागेल. रहाणे स्वत:च्या स्टाईलने संघाचे नेतृत्व करतो, तर कोहलीच्या नेतृत्वाची स्टाईल त्यापेक्षा वेगळी आहे. अशा दोन्ही वृत्तीचे कर्णधार एकाच वेळी संघात असल्याने टीम इंडिया भाग्यवान आहे, असे आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी ‘क्रि कइन्फो’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.धरमशाला कसोटीत जखमी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. भारताने ही कसोटी आठ गड्यांनी जिंकून मालिका २-१ ने खिशात घातली. कसोटीत रहाणेने संयमाने नेतृत्व केले, शिवाय दुसऱ्या डावात आक्र मक फलंदाजी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.चॅपेल म्हणाले, ‘‘रहाणेने धरमशाला कसोटीत कर्णधार म्हणून खरोखर उत्कृष्ट कामगिरी केली. खऱ्या कर्णधाराची नेतृत्वाची पद्धत आपल्यापेक्षा खूप वेगळी असल्याची जेव्हा कल्पना तुम्हाला असते, अशा वेळी त्याची जागा भरून काढण्याचे मोठे आव्हानदेखील असते. आपण काय करावे? मुख्य कर्णधाराचीच पद्धत कायम ठेवून नेतृत्व करावे, की स्वत:च्या स्टाईलने नेतृत्व करावे, हा प्रश्न असतो. रहाणेने अतिशय सोप्या पद्धतीने सामना पार पाडला. शिवाय जिंकून दाखविला. यातून त्याच्या नेतृत्वगुणांचा परिचय घडला.’’रहाणेने दुसऱ्या डावात भारताचे दोन गडी स्वस्तात बाद झाल्यानंतरही आॅस्ट्रेलियन गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता, पहिल्या चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी केली. त्याने २७ चेंडूंत नाबाद ३८ धावा ठोकल्या. रहाणे कर्णधार म्हणून संयमी आहे. तो आपल्या फलंदाजीतून आक्र मकपणा दाखवून देतो. तुम्ही काय करीत आहात, यावर संघातील खेळाडूंचा तुमच्यावर पूर्ण विश्वास हवा आणि तुम्हाला फक्त चांगली खेळी साकारण्याची गरज असते. संघाचे मनोधैर्य यातून आपोआप उंचावते. कोहली आणि रहाणे यांचे कौशल्य भिन्न आहे. पण धरमशालात रहाणेने ज्या पद्धतीने नेतृत्व केले ते वाखाणण्याजोगे आहे, असेही चॅपेल म्हणाले.(वृत्तसंस्था)