शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या चेंडूवर भारताचा पराभव, केदार जाधवची एकाकी झुंज

By admin | Updated: January 22, 2017 22:32 IST

मालिकेत निर्विवाद आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला ईडन गार्डन्सवर रंगलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने 5 धावांनी पराभव केला आहे

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. 22 - मालिकेत निर्विवाद आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाचा ईडन गार्डनवर रंगलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने 5 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडने दिलेल्या 322 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केदारने 90 धांवांची झुंजार खेळी केली, मात्र शेवटच्या षटकात 3 चेंडूवर सहा धावांची आवशकता असताना मोठा फटका मारण्याच्या नादात केदार बाद झाला आणि भारतावर पराभवचे संकट ओढावले. तीन सामन्याच्या मालिकेत भारताने इंग्लंडचा 2-1ने पराभव केला. 
 
नाणेफेक जिंकून विराटने इंग्लड संघाला प्रथम फंलदाजीसाठी आंमत्रीत केलं होत. पहिल्या दोन सामन्यांनंतर कोलकाता वनडेत देखील तीनशेहून अधिक धावांचा पाऊस पडला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लड संघाने जेसन रॉय(65), बेअरस्टो (56 ), स्टोक्स नाबाद 57 आणि कर्णधार मॉर्गन (43) यांच्या फलंदाजीच्या बळावर 50 षटकात आठ बाद 321 धावा करत भारताला विजयासाठी 322 धावांचे आव्हान दिले होते.
 
इंग्लंडने दिलेले 322 धावांचे आव्हान पार करताना केदार जाधव(90) कर्णधार विराट कोहली (55), हार्दिक पांड्या (55) आणि युवराज सिंग(45) यांचे प्रयत्न विजयासाठी अपुरे पडले. 
 
त्यापुर्वी, प्रथम  करताना इंग्लंडच्या समामीवीरांनी सावध सुरुवात करताना पहिल्या 10 षटकात नाबाद 43 धावांची भागीदारी केली होती. 10 षटकानंतर जेसन रॉय आणि सॅंम बिलिंग्ज तडफदार फटक्यांनी धावा वसूल करण्यास सुरूवात केली. सलामीजोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना रवींद्र जडेजाने जेनिंग्जला बाद केले. त्यानंतर दुसरी विकेट देखील जडेजानेच घेतली. घातक जेसन रॉय(65) याचा जडेजाने त्रिफळा उडवून तंबूत धाडले. त्यानंतर कर्णधार मॉर्गन आणि बेअरस्टो यांनी चांगली फटकेबाजी करून डाव सावरला. पण पंड्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात मॉर्गन 43 धावांवर झेलबाद झाला. बेअरस्टोने अर्धशतक ठोकले खरे पण तो देखील 56 धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. जोस बटलरला (11) देखील पंड्याने माघारी धाडले. तर बुमराहने मोईन अली याला बाऊन्सवर झेलबाद करून बाद केले. अखेरच्या षटकात वोक्स 19 चेंडूत 34 धावा काडून धावबाद झाला. तर स्टोक्सने नाबाद 57 धावांची खेळी केली. 
 
भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमरा यांच्या अचूक माऱ्यासमोर वेगाने धावा जमवता न आल्याने पहिल्या दहा षटकात इंग्लंडला बिनबाद 43 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा वसूल केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने 3, जडेजाने 2 तर बुमराहने एका फलंदाजाला बाद केले.