शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भारतीय महिलांचा दणदणीत विजय

By admin | Updated: November 11, 2016 00:59 IST

डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड (४/२१) आणि एकता बिस्त (३/१४) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६ विकेट्सने

विजयवाडा : डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड (४/२१) आणि एकता बिस्त (३/१४) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.गोकराजू लिआला गंगाराजू एसीए क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात विंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु, भारतीयांच्या अचूक माऱ्यापुढे त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. राजेश्वरी आणि एकता यांनी टिच्चून मारा करताना विंडीजच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. विंडीजचा डाव ४२.४ षटकांत केवळ १३१ धावांत संपुष्टात आला.यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारतीय महिलांची सुरुवातही अडखळती झाली. स्म्रिती मंधना (७), मोना मेशरम (२), दीप्ती शर्मा (१६) आणि हरमनप्रीत कौर (१) झटपट परतल्याने भारतीय संघाची एकवेळ १६.३ षटकांत ४ बाद ३६ धावा अशी बिकट अवस्था झाली होती. या वेळी विंडीजने जबरदस्त नियंत्रण मिळवले होते.परंतु, कर्णधार मिताली राजने आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर भारताची गाडी रुळावर आणली. दुसऱ्या टोकाकडून वेदा क्रिष्णमूर्तीनेही मितालीला चांगली साथ देताना निर्णायक नाबाद अर्धशतक झळकावले. वेदाने ७० चेंडंूत ४ चौकार व २ षटकार खेचताना नाबाद ५२ धावा काढल्या. तर, मितालीने ९१ चेंडंूत ६ चौकारांसह नाबाद ४६ धावांची खेळी केली. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ९७ भागीदारी करून विंडीजच्या आशा संपुष्टात आणल्या. भारताने ३९.१ षटकांत ४ फलंदाज गमावून १३३ धावा काढल्या. तत्पूर्वी, राजेश्वरी आणि एकता यांनी ठराविक अंतराने दिलेल्या धक्क्यानंतर विंडीजची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. यष्टिरक्षक फलंदाज मेरिस्सा अग्युल्लेरिया हिने नाबाद राहताना सर्वाधिक ४२ धावा काढले. तर, सलामीवीर हायली मॅथ्यूसने २४ धावांची खेळी केली. (वृत्तसंस्था) संक्षिप्त धावफलक :वेस्ट इंडीज : ४२.२ षटकांत सर्व बाद १३१ धावा (मेरिस्सा अग्युल्लेरिया ४२, हायली मॅथ्यूसने २४; राजेश्वरी गायकवाड ४/२१, एकता बिस्त ३/१४) पराभूत वि. भारत : ३९.१ षटकांत ४ बाद १३३ धावा (वेदा क्रिष्णमूर्ती नाबाद ५२, मिताली राज नाबाद ४६; शकेरा सेलमन २/११)