शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

पाकच्या तुलनेत भारतीय संघ अधिक मजबूत : इरफान

By admin | Updated: February 11, 2015 01:38 IST

गतचॅम्पियन भारतीय संघ परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघापेक्षा अधिक मजबूत असून, विश्वकप स्पर्धेत १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या

नवी दिल्ली : गतचॅम्पियन भारतीय संघ परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघापेक्षा अधिक मजबूत असून, विश्वकप स्पर्धेत १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणा-या लढतीत टीम इंडिया नक्कीच बाजी मारेल, असे मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने व्यक्त केले. इरफान म्हणाला, ‘पाकच्या तुलनेत भारतीय संघ दमदार असल्यामुळे भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल. या लढतीत भारतच विजय मिळविणार, असा मला विश्वास आहे.’ २००७च्या विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा इरफान पुढे म्हणाला, ‘‘दडपणाखाली दर्जेदार कामगिरी करणे यशाचे गमक ठरेल. विश्वकप स्पर्धेत अधिक दडपण असते. सर्वांची नजर तुमच्यावर असते. प्रत्येक व्यक्ती याबाबत चर्चा करतो. ही स्पर्धा चार वर्षांतून एकदा होत असल्यामुळे दडपण चारपट अधिक असते.’’ इरफान पुढे म्हणाला, ‘‘ज्या वेळी मी विंडीजमध्ये होतो, त्या वेळी आमची तयारी चांगली झाली असल्याचे आम्हाला वाटत होते. पण, आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दडपण नेहमीच असते. पण, त्यानंतरही चमकदार कामगिरी करणे आवश्यक असते.’’टी-२० विश्वकप स्पर्धेत भारताच्या विजयी संघाचा सदस्य असलेल्या पठाणने पाकिस्तानविरुद्धच्या संस्मरणीय लढतीची आठवण करताना सांगितले, ‘भारत-पाक लढत नेहमीच विशेष असते. त्या वेळीही दडपण होते. विश्वकप स्पर्धेत दडपण अधिक वाढते. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वकप स्पर्धेत भारत-पाक सामना टाय झाला होता. आम्ही दडपण झुगारण्यासाठी प्रयत्नशील होतो. धोनी त्या वेळी कर्णधार होता. सर्व काही नवे होते. पाकविरुद्धच्या लढतीपूर्वी केवळ पाच मिनिटांची बैठक झाली होती. आम्ही दडपण न बाळगता केवळ खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करीत होतो. पण, अंतिम सामन्यात दडपण येतेच. मिस्बाहने तो फटका मारण्यापूर्वी सामना बरोबरीत होता. मी त्या लढतीत तीन बळी घेतले होते.’’सचिन तेंडुलकरयुगाची आठवण करताना इरफान म्हणाला, ‘‘विश्वकप स्पर्धा असो किंवा नसो, पण भारतीय संघ ज्या वेळी मैदानात उतरेल, त्या वेळी सचिनची उणीव नक्की भासेल. १९९२पासून सचिन सर्वच विश्वकप स्पर्धेत सहभागी झाला आहे. विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात त्याने सर्वाधिक धावा फटकाविल्या आहेत. सचिनबाबत बोलण्यासाठी मी खूप लहान व्यक्ती आहे.’’ (वृत्तसंस्था)