शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

भारत-विंडीज अंतिम सामना

By admin | Updated: February 12, 2016 00:50 IST

शमर स्प्रिंगरच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर वेस्ट इंडीजने गुरुवारी रोमहर्षक लढतीत बांगलादेशाला तीन गड्यांनी पराभूत करून १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

मिरपूर : शमर स्प्रिंगरच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर वेस्ट इंडीजने गुरुवारी रोमहर्षक लढतीत बांगलादेशाला तीन गड्यांनी पराभूत करून १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. निर्णायक लढत १४ फेब्रुवारी रोजी तीन वेळेचा चॅम्पियन भारताविरुद्ध होणार आहे.विंडीजपुढे विजयासाठी २२७ धावांचे लक्ष्य होते. स्प्रिंगरने ८८ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ६२ धावा ठोकल्या. कर्णधार शिमरान हेटमेयर याने ६० तसेच सलामीवीर गिडरोन पोप याने ३८ धावांचे योगदान दिले. विंडीजने ४८.४ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात २३० धावा करून दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. त्याआधी बांगलादेशाने ५० षटकांत सर्व बाद २२६ धावा केल्या. कर्णधार मेहदी हसन मिराज ६०, मोहंमद सैफुद्दीन ३६ आणि जोएराज शेख याने ३५ धावा केल्या. विंडीजकडून किमोपॉल याने २० धावांत ३ व स्प्रिंगर तसेच शेमार होल्डर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. विंडीजने चांगली सुरुवात केली; पण नियमित फरकाने फलंदाज बाद होत गेल्यामुळे लक्ष्य गाठणे कठीण झाले होते. स्प्रिंगरने एक टोक सांभाळून विंडीजला विजय मिळवून दिला.भारताने पहिल्या उपांत्य सामन्यात लंकेचा ९७ धावांनी पराभव करून चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. भारत-विंडीज संघ कुठल्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १९८३नंतर प्रथमच परस्परांपुढे येणार आहेत. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने त्या वेळी वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात क्लाईव्ह लॉईडच्या संघावर लॉडर््स येथे ४३ धावांनी ऐतिहासिक विजय नोंदविला होता. १९ वर्षांखालील गटात भारत-विंडीजदरम्यान आतापर्यंत ९ सामने खेळले गेले. त्यांतील ७ सामने भारताने जिंकले आहेत. विंडीजला २ सामन्यांत विजय मिळाला.