भारत विश्वकप फायनलमध्ये पोहोचणार: सुशील
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
नवी दिल्ली:
भारत विश्वकप फायनलमध्ये पोहोचणार: सुशील
नवी दिल्ली:भारत यंदाच्या विश्वकप फायनलमध्ये नक्की पोहोचेल, असा आशावाद दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून इतिहास रचणारा एकमेव भारतीय पहिलवान सुशील कुमार याने व्यक्त केला आहे़ सुशील स्वत: भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांचा मोठा चाहता आहे़ सुशील म्हणाला, भारतीय संघ सक्षम असून, जर देशातील जनतेचे आशीर्वाद त्यांच्यासोबत राहिल्यास संघ नक्कीच फायनलचा प्रवास पूर्ण करेल़