शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
4
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
5
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
6
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
7
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
8
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
9
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
10
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
11
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
12
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
13
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
14
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
15
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
16
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
17
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
18
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
19
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
20
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

चौथ्या कसोटीत भारताला फारशी अडचण येणार नाही

By admin | Updated: March 24, 2017 23:41 IST

भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. आपली फलंदाजीही चांगली होत आहे. त्यामुळे, धरमशाळा येथे होणारा चौथा आणि अंतिम कसोटी

रोहित नाईक / मुंबईभारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. आपली फलंदाजीही चांगली होत आहे. त्यामुळे, धरमशाळा येथे होणारा चौथा आणि अंतिम कसोटी सामना जिंकण्यात भारताला फारशी अडचण येणार नाही असे मला वाटते,’ असा विश्वास भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.मुंबईत शुक्रवारी दिव्यांग खेळाडूंच्या आंतर विभागीय टी२० क्रिकेट स्पर्धेची घोषणा झाली. यावेळी वाडेकर यांनी आपले मत मांडले. संघाच्या कामगिरीबाबत त्यांनी सांगितले की, ‘भारताकडे सध्या खरंच खूप चांगली फलंदाजी आहे. कर्णधार विराट कोहली आणि इतर फलंदाज चांगली कामगिरी करीत असून संघाला बळकटी आणत आहेत. त्यामुळे, धरमशाला येथे होणाऱ्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताला खूप काही अडचणी येतील असे दिसत नाही. आपण नक्की विजयी होऊ.’या कसोटी सामन्यासाठी सर्वांचे लक्ष कर्णधार कोहलीकडे लागले आहे. खांदा दुखावल्याने त्याच्या खेळण्यावर शंका निर्माण झाल्याने असे झाल्यास संघाची धुरा अजिंक्य रहाणे सांभाळेल. कर्णधारपद रहाणेकडे आल्यास सचिन तेंडुलकरनंतरचा तो पहिलाच मुंबईकर कर्णधार ठरेल. याबाबत वाडेकर म्हणाले की, ‘कोहली वयाने फार मोठा नाही. त्याच्याकडे बरेच क्रिकेट शिल्लक आहे. अजिंक्य आणि विराट दोघेही चांगले मित्र आहेत. ते एकमेकांना कायम सांभाळून घेतात. फलंदाजी करताना हे दिसून येते. मला वाटते की, जोपर्यंत विराटकडे कर्णधारपद आहे तोपर्यंत अजिंक्यने घाई न करता थांबलेले चांगले, पण मुंबईकर असल्याने अजिंक्यकडेही जन्मजात नेतृत्वाचे गुण आहेत, असे मला वाटते. जर खरंच विराट चौथ्या सामन्यात खेळला नाही, तर अजिंक्य नक्कीच सहजपणे भारताचे नेतृत्व सांभाळेल यात शंका नाही.’