शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

भारताने दोन फिरकीपटू खेळवावे

By admin | Updated: June 11, 2017 00:34 IST

श्री लंकेच्या भारतावरील विजयामुळे ‘ब’ गटात चुरस निर्माण झाली. त्याआधी द.आफ्रिकेने लंकेला नमविले होते. भारतानेही पाकला पराभूत केले तेव्हा फारशी

- सौरव गांगुली लिहितात...श्री लंकेच्या भारतावरील विजयामुळे ‘ब’ गटात चुरस निर्माण झाली. त्याआधी द.आफ्रिकेने लंकेला नमविले होते. भारतानेही पाकला पराभूत केले तेव्हा फारशी चुरस पाहायला मिळाली नव्हती. पण बलाढ्य संघांविरुद्ध दोन्ही कमकुवत संघांनी तगडे आव्हान देत विजय मिळविताच ‘घड्याळाचे काटे उलटे फिरल्याचा’ भास झाला.एखादा दिवस ज्या संघाचा असेल तोच जिंकतो. लंकेने भारताविरुद्ध ही गोष्ट सिद्ध करून दाखविली. आव्हाने असतील तर टॅलेंटही सिद्ध होत जाते. लंकेकडून गुणातिलका, कुसाल मेंडिस, कुसाल परेरा आणि गुणरत्ने या युवा खेळाडूंनी काळाची गरज ओळखून खेळी केली. श्रीलंकेने या खेळाडूंची योग्य काळजी घेतल्यास भारतीय उपखंडात पुन्हा एकदा लंकेचा बलाढ्य संघ पुढे येऊ शकतो. प्रतिभावान असलेला अँजेलो मॅथ्यूज याने अगदी शांतचित्ताने विजयाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली, हे विसरता येणार नाही. पाटा खेळपट्टीवर लंकेच्या फलंदाजांनी भारतीय मात्रा निष्प्रभ ठरविला. त्यांनी चौकार-षटकार तर मारलेच, पण धावफलक सतत हलता ठेवला. दीर्घकाळानंतर लंकेच्या युवा संघाकडून अशी अप्रतिम कामगिरी घडली. या युवा खेळाडूंनी धावांचा डोंगर सर केला तरी स्वत:वर दडपण येऊ दिले नाही. त्यातही युवा फलंदाज मेंडिसची खेळी शैलीदार होती. या स्पर्धेच्या सुरुवातीपासून भारतीय संघात दोन फिरकीपटू खेळविण्याची मी सूचना करीत आलो आहे. भारताने पाकवर विजय नोंदविल्यानंतरही व्यवस्थापनाला मी दोन फिरकी गोलंदाज खेळविण्याचा आग्रह केला. इंग्लंडमधील खेळपट्ट्या पाटा आहेत. पावसानंतरही खेळपट्ट्यांचे स्वरूप फारसे बदलले नाही. माझ्या पूर्वानुभवानुसार भारताने अशा पाटा खेळपट्ट्यांवर दोन फिरकीपटू खेळवायलाच हवे. पाकिस्तानने द.आफ्रिकेच्या फलंदाजांना फिरकी माऱ्यात ज्याप्रकारे गुंतवून ठेवले ते डोक्यात ठेवून संघ निवडल्यास भारतीय फिरकीपटू त्यापेक्षा प्रभावीपणे प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण आणू शकतील. इंग्लंड-आॅस्ट्रेलिया, पाक-श्रीलंका आणि भारत-द.आफ्रिका हे सर्व सामने ‘करा ंिकंवा मरा’ असेच आहेत. दुसऱ्या शब्दात उपांत्यपूर्व लढती असेही म्हणता येईल. भारताविरुद्ध सामन्यात द.आफ्रिका फलंदाजीत नेहमीच वरचढ ठरतो. याशिवाय रबाडा, मोर्केल, मॉरिस आणि पार्नेल असे दिग्गज गोलंदाज संघात आहेत. माझ्यामते इम्रान ताहिर मात्र निर्णायक भूमिका बजावेल. भारतीय फलंदाजांनी त्याच्यापासून सावध असावे. भारताची फलंदाजी भक्कम आहेच. रोहित आणि धवन पुन्हा एकदा पाया मजबूत करू शकतील. त्यामुळे एखाद्या पराभवामुळे खचून जाण्याचे कारण नाही. संघाने पुन्हा आक्रमक खेळून विजयी वाटेवर परत यावे. मोठ्या सामन्यात विजय मिळविण्याचे तंत्र भारताला जमले असल्याने द.आफ्रिकेविरुद्ध विराट अ‍ॅन्ड कंपनी सरस कामगिरी करेल, असा मला विश्वास आहे. जाताजाता बांगला देशचेदेखील न्यूझीलंडवरील विजयासाठी अभिनंदन करतो.या विजयामुळे बांगला देशने काहीही अशक्य नाही, हाच आत्मविश्वास अन्य संघात जागविला, असे म्हणायला हरकत नाही.(गेमप्लान)