शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

भारताने दोन फिरकीपटू खेळवावे

By admin | Updated: June 11, 2017 00:34 IST

श्री लंकेच्या भारतावरील विजयामुळे ‘ब’ गटात चुरस निर्माण झाली. त्याआधी द.आफ्रिकेने लंकेला नमविले होते. भारतानेही पाकला पराभूत केले तेव्हा फारशी

- सौरव गांगुली लिहितात...श्री लंकेच्या भारतावरील विजयामुळे ‘ब’ गटात चुरस निर्माण झाली. त्याआधी द.आफ्रिकेने लंकेला नमविले होते. भारतानेही पाकला पराभूत केले तेव्हा फारशी चुरस पाहायला मिळाली नव्हती. पण बलाढ्य संघांविरुद्ध दोन्ही कमकुवत संघांनी तगडे आव्हान देत विजय मिळविताच ‘घड्याळाचे काटे उलटे फिरल्याचा’ भास झाला.एखादा दिवस ज्या संघाचा असेल तोच जिंकतो. लंकेने भारताविरुद्ध ही गोष्ट सिद्ध करून दाखविली. आव्हाने असतील तर टॅलेंटही सिद्ध होत जाते. लंकेकडून गुणातिलका, कुसाल मेंडिस, कुसाल परेरा आणि गुणरत्ने या युवा खेळाडूंनी काळाची गरज ओळखून खेळी केली. श्रीलंकेने या खेळाडूंची योग्य काळजी घेतल्यास भारतीय उपखंडात पुन्हा एकदा लंकेचा बलाढ्य संघ पुढे येऊ शकतो. प्रतिभावान असलेला अँजेलो मॅथ्यूज याने अगदी शांतचित्ताने विजयाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली, हे विसरता येणार नाही. पाटा खेळपट्टीवर लंकेच्या फलंदाजांनी भारतीय मात्रा निष्प्रभ ठरविला. त्यांनी चौकार-षटकार तर मारलेच, पण धावफलक सतत हलता ठेवला. दीर्घकाळानंतर लंकेच्या युवा संघाकडून अशी अप्रतिम कामगिरी घडली. या युवा खेळाडूंनी धावांचा डोंगर सर केला तरी स्वत:वर दडपण येऊ दिले नाही. त्यातही युवा फलंदाज मेंडिसची खेळी शैलीदार होती. या स्पर्धेच्या सुरुवातीपासून भारतीय संघात दोन फिरकीपटू खेळविण्याची मी सूचना करीत आलो आहे. भारताने पाकवर विजय नोंदविल्यानंतरही व्यवस्थापनाला मी दोन फिरकी गोलंदाज खेळविण्याचा आग्रह केला. इंग्लंडमधील खेळपट्ट्या पाटा आहेत. पावसानंतरही खेळपट्ट्यांचे स्वरूप फारसे बदलले नाही. माझ्या पूर्वानुभवानुसार भारताने अशा पाटा खेळपट्ट्यांवर दोन फिरकीपटू खेळवायलाच हवे. पाकिस्तानने द.आफ्रिकेच्या फलंदाजांना फिरकी माऱ्यात ज्याप्रकारे गुंतवून ठेवले ते डोक्यात ठेवून संघ निवडल्यास भारतीय फिरकीपटू त्यापेक्षा प्रभावीपणे प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण आणू शकतील. इंग्लंड-आॅस्ट्रेलिया, पाक-श्रीलंका आणि भारत-द.आफ्रिका हे सर्व सामने ‘करा ंिकंवा मरा’ असेच आहेत. दुसऱ्या शब्दात उपांत्यपूर्व लढती असेही म्हणता येईल. भारताविरुद्ध सामन्यात द.आफ्रिका फलंदाजीत नेहमीच वरचढ ठरतो. याशिवाय रबाडा, मोर्केल, मॉरिस आणि पार्नेल असे दिग्गज गोलंदाज संघात आहेत. माझ्यामते इम्रान ताहिर मात्र निर्णायक भूमिका बजावेल. भारतीय फलंदाजांनी त्याच्यापासून सावध असावे. भारताची फलंदाजी भक्कम आहेच. रोहित आणि धवन पुन्हा एकदा पाया मजबूत करू शकतील. त्यामुळे एखाद्या पराभवामुळे खचून जाण्याचे कारण नाही. संघाने पुन्हा आक्रमक खेळून विजयी वाटेवर परत यावे. मोठ्या सामन्यात विजय मिळविण्याचे तंत्र भारताला जमले असल्याने द.आफ्रिकेविरुद्ध विराट अ‍ॅन्ड कंपनी सरस कामगिरी करेल, असा मला विश्वास आहे. जाताजाता बांगला देशचेदेखील न्यूझीलंडवरील विजयासाठी अभिनंदन करतो.या विजयामुळे बांगला देशने काहीही अशक्य नाही, हाच आत्मविश्वास अन्य संघात जागविला, असे म्हणायला हरकत नाही.(गेमप्लान)